शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

आगळीवेगळी राखीपौर्णिमा : भावांनी बांधली बहिणींना राखी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:05 IST

कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे.

- निलेश धोपेश्वरकरठाणे : कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे. यामुळे जेव्हा एखादा पुरुष अडचणीत येतो, तेव्हा तो मदत मागण्यासाठी कुणाकडेही जात नाही. जर त्याने मदतीसाठी हात पुढे केला, तर त्याला कमकुवत ठरवले जाते. अशातून त्याला नैराश्य येते आणि तो थेट आत्महत्या करतो. पुरुषांत असे नैराश्य येऊ नये, याकरिता ‘वास्तव’ फाउंडेशन या पुरुषांच्या हक्काकरिता लढणाऱ्या संघटनेच्या पुरुष कार्यकर्त्यांनी गुरुवारी बहिणींना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मी जरी पुरुष असलो तरी संकटकाळी मला मदतीची गरज असताना तू माझ्या मदतीला धावून ये, असे वचन या भावांनी आपल्या बहिणींकडून घेतले.राखीपौर्णिमा हा बहीणभावाच्या पवित्र नात्यातील दिवस. बहीण आपल्या रक्षणासाठी भावाला राखी बांधते व संरक्षण करण्याचे वचन घेते. हीच आजवर चालत आलेली परंपरा आहे. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून वास्तव फाउंडेशन आगळ्यावेगळ्या पद्धतीने राखीपौर्णिमा साजरी करीत आहे. संकटाच्या काळात दुबळे ठरू नये, याकरिता कुणाचीही मदत न घेतल्याने अधिक अडचणीत येऊन पुरुषांनी आत्महत्या करू नये, याकरिता त्यांना मानसिक आधार व बळ मिळावे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.याबाबत, ‘वास्तव’ फाउंडेशनचे संस्थापक अमित देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, साधारण दोन ते तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. बहीण मला आणि मी बहिणीला राखी बांधतो. भावाने बहिणीला राखी बांधण्याबाबत वास्तव फाउंडेशनने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी भावांनी आपल्या बहिणीला राखी बांधून ‘तू माझे संरक्षण करू शकते’, असे वचन तिच्याकडून घेतले. पुरुषांच्या हक्कासाठी लढणाºया देशभरातील ३० संघटनांचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे सुरू असून तिथे गुरुवारी ४० पुरुषांनी पाच महिलांना राख्या बांधल्या. अधिवेशनात १५० पदाधिकारी सहभागी झाले आहेत.पुरूष एकटा नाही; हे सांगण्यासाठी केले राखीपौर्णिमेचे आयोजनपुरुषांच्या आत्महत्येमागे त्यांचे रक्षण करणारा कुणीच नाही, हे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व संकटांचा सामना एकाकी पुरुषानेच करायचा, ही विचारसरणी बदलण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने राखीपौर्णिमा साजरी करायचे ठरवले. पुरुष अडचणीत सापडला तर बहिणीकडे जा, ती नक्कीच मदत करेल, तू स्वत:ला कमकुवत समजू नको, असा संदेश देणे, हा या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे ते म्हणाले. यातून महिला सक्षम आहेत, हेही सांगितले जाते. पुरुषाला त्रास होतो, तेव्हा त्याला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ नसते. म्हणूनच, या राखीपौर्णिमेतून पुरुषालाही त्रास होतो, हे समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.हे तुझे आहे कर्तव्य : मुळात राखीपौर्णिमा उत्तर भारतातील सण आहे. आता महाराष्ट्रातही तो साजरा होऊ लागला आहे. पुरुष असल्याने तू संरक्षण करणे, हे तुझे कर्तव्य आहे, हेच अधोरेखित झाले आहे. पौराणिक काळात ब्राह्मण हे क्षत्रियांना राखी बांधून त्यांच्याकडून रक्षणाचे वचन घेत असल्याचे दाखले आहेत, याकडे देशपांडे यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनthaneठाणेcultureसांस्कृतिक