शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

प्रचार करायचा की, लग्नाला हजेरी लावायची?; लोकप्रतिनिधी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:47 IST

निवडणुकीचा आणि लग्नाचा हंगाम एकत्र आल्याने वाढली डोकेदुखी

ठाणे : ऐरवी ढुंकुनही न पाहणारे राजकीय नेते निवडणूक जवळ आली की मतदारांच्या घराचे अक्षरश: उंबरे झिजवतात. त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात वाटेकरू होऊ पाहतात. कारण, तो त्यांचा हुकुमी जनसंपर्काचा एक भाग असतो. लग्न ही त्यातील एक महत्त्वाची घटना. विभागाचे नगरसेवक किंवा आमदारांनी लग्नाला हजेरी लावली की, त्या कुटुंबालाही समाधान वाटते. त्यामुळेच राजकीय नेते मतदारसंघातील लग्न सहसा चुकवत नाहीत. यंदा मात्र ऐन निवडणुकीच्या हंगामात सलग लग्नाचे मुहूर्त आल्याने नेत्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. निवडणुकीचा प्रचार करायचा की, लग्नाला हजेरी लावायची, असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.मुंबई-ठाणे परिसरांत येत्या २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहेत. त्याचा प्रचार सध्या ऐन भरात आला आहे. त्यात सलग लग्नाचे मुहूर्त आल्याने राजकीय नेत्यांची पंचाईत होऊ लागली आहे. लोकसभेनंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका येणार आहेत. त्यामुळे लोकसभेचा प्रचार करताकरता विद्यमान आमदारांना आपल्या भवितव्याचीही काळजी आहे. लग्नसोहळा हा राजकीय नेत्यांना लोकांच्यात मिसळण्याची मोठी संधी असते. लोकप्रतिनिधी ती साधतात. एकाच दिवशी अनेक मुहूर्त असले, तरी त्यातील काहींना हळदी समारंभाला, काहींच्या लग्नाला तर काही ठिकाणी पूजेला हजेरी लावण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करतात. यंदा निवडणुकीच्या १० दिवस आधी जवळपास दररोज लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे या लग्नकार्याच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना तोंड द्यावे लागणार असल्याने विद्यमान आमदारसुद्धा या लग्नावळीला जातीने हजेरी लावताना दिसू लागले आहेत.मतदानापर्यंत लग्नाचे ३१ मुहूर्तसर्वसाधारणपणे शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्या की, लग्नाचे मुहूर्त ठरवले जातात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मुहूर्त आहेत. निवडणूक काळात तर हे प्रमाण अधिक आहे. १९ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान लग्नाचे तब्बल ३१ मुहूर्त आहेत. २१ आणि २५ एप्रिलचा अपवाद वगळता दररोज ते आहेत. त्यामुळे लगीनसराईत मतदार व्यस्त होणार असल्याने त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्याची कसरतही नेते मंडळींना करावी लागणार आहे.धार्मिक कार्यक्रमांनाही भेटीहनुमान जयंती आणि त्याच दिवशी आलेल्या गुड फ्रायडेच्या निमित्ताने ठाण्यातील उमेदवारांनी अनेक चर्चना भेटी दिल्या होत्या. तर, हनुमान जयंतीनिमित्ताने ज्याज्या ठिकाणी भंडारा ठेवला होता, त्यात्या ठिकाणी सुमारे एक ते दोन हजारांचा जमाव हजर असतो. अशा ठिकाणीही उमेदवारांनी हजेरी लावल्याचे दिसून आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019marriageलग्न