शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

प्रचार करायचा की, लग्नाला हजेरी लावायची?; लोकप्रतिनिधी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:47 IST

निवडणुकीचा आणि लग्नाचा हंगाम एकत्र आल्याने वाढली डोकेदुखी

ठाणे : ऐरवी ढुंकुनही न पाहणारे राजकीय नेते निवडणूक जवळ आली की मतदारांच्या घराचे अक्षरश: उंबरे झिजवतात. त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात वाटेकरू होऊ पाहतात. कारण, तो त्यांचा हुकुमी जनसंपर्काचा एक भाग असतो. लग्न ही त्यातील एक महत्त्वाची घटना. विभागाचे नगरसेवक किंवा आमदारांनी लग्नाला हजेरी लावली की, त्या कुटुंबालाही समाधान वाटते. त्यामुळेच राजकीय नेते मतदारसंघातील लग्न सहसा चुकवत नाहीत. यंदा मात्र ऐन निवडणुकीच्या हंगामात सलग लग्नाचे मुहूर्त आल्याने नेत्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. निवडणुकीचा प्रचार करायचा की, लग्नाला हजेरी लावायची, असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.मुंबई-ठाणे परिसरांत येत्या २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहेत. त्याचा प्रचार सध्या ऐन भरात आला आहे. त्यात सलग लग्नाचे मुहूर्त आल्याने राजकीय नेत्यांची पंचाईत होऊ लागली आहे. लोकसभेनंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका येणार आहेत. त्यामुळे लोकसभेचा प्रचार करताकरता विद्यमान आमदारांना आपल्या भवितव्याचीही काळजी आहे. लग्नसोहळा हा राजकीय नेत्यांना लोकांच्यात मिसळण्याची मोठी संधी असते. लोकप्रतिनिधी ती साधतात. एकाच दिवशी अनेक मुहूर्त असले, तरी त्यातील काहींना हळदी समारंभाला, काहींच्या लग्नाला तर काही ठिकाणी पूजेला हजेरी लावण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करतात. यंदा निवडणुकीच्या १० दिवस आधी जवळपास दररोज लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे या लग्नकार्याच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना तोंड द्यावे लागणार असल्याने विद्यमान आमदारसुद्धा या लग्नावळीला जातीने हजेरी लावताना दिसू लागले आहेत.मतदानापर्यंत लग्नाचे ३१ मुहूर्तसर्वसाधारणपणे शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्या की, लग्नाचे मुहूर्त ठरवले जातात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मुहूर्त आहेत. निवडणूक काळात तर हे प्रमाण अधिक आहे. १९ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान लग्नाचे तब्बल ३१ मुहूर्त आहेत. २१ आणि २५ एप्रिलचा अपवाद वगळता दररोज ते आहेत. त्यामुळे लगीनसराईत मतदार व्यस्त होणार असल्याने त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्याची कसरतही नेते मंडळींना करावी लागणार आहे.धार्मिक कार्यक्रमांनाही भेटीहनुमान जयंती आणि त्याच दिवशी आलेल्या गुड फ्रायडेच्या निमित्ताने ठाण्यातील उमेदवारांनी अनेक चर्चना भेटी दिल्या होत्या. तर, हनुमान जयंतीनिमित्ताने ज्याज्या ठिकाणी भंडारा ठेवला होता, त्यात्या ठिकाणी सुमारे एक ते दोन हजारांचा जमाव हजर असतो. अशा ठिकाणीही उमेदवारांनी हजेरी लावल्याचे दिसून आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019marriageलग्न