शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

प्रचार करायचा की, लग्नाला हजेरी लावायची?; लोकप्रतिनिधी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:47 IST

निवडणुकीचा आणि लग्नाचा हंगाम एकत्र आल्याने वाढली डोकेदुखी

ठाणे : ऐरवी ढुंकुनही न पाहणारे राजकीय नेते निवडणूक जवळ आली की मतदारांच्या घराचे अक्षरश: उंबरे झिजवतात. त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात वाटेकरू होऊ पाहतात. कारण, तो त्यांचा हुकुमी जनसंपर्काचा एक भाग असतो. लग्न ही त्यातील एक महत्त्वाची घटना. विभागाचे नगरसेवक किंवा आमदारांनी लग्नाला हजेरी लावली की, त्या कुटुंबालाही समाधान वाटते. त्यामुळेच राजकीय नेते मतदारसंघातील लग्न सहसा चुकवत नाहीत. यंदा मात्र ऐन निवडणुकीच्या हंगामात सलग लग्नाचे मुहूर्त आल्याने नेत्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. निवडणुकीचा प्रचार करायचा की, लग्नाला हजेरी लावायची, असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.मुंबई-ठाणे परिसरांत येत्या २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहेत. त्याचा प्रचार सध्या ऐन भरात आला आहे. त्यात सलग लग्नाचे मुहूर्त आल्याने राजकीय नेत्यांची पंचाईत होऊ लागली आहे. लोकसभेनंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका येणार आहेत. त्यामुळे लोकसभेचा प्रचार करताकरता विद्यमान आमदारांना आपल्या भवितव्याचीही काळजी आहे. लग्नसोहळा हा राजकीय नेत्यांना लोकांच्यात मिसळण्याची मोठी संधी असते. लोकप्रतिनिधी ती साधतात. एकाच दिवशी अनेक मुहूर्त असले, तरी त्यातील काहींना हळदी समारंभाला, काहींच्या लग्नाला तर काही ठिकाणी पूजेला हजेरी लावण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करतात. यंदा निवडणुकीच्या १० दिवस आधी जवळपास दररोज लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे या लग्नकार्याच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना तोंड द्यावे लागणार असल्याने विद्यमान आमदारसुद्धा या लग्नावळीला जातीने हजेरी लावताना दिसू लागले आहेत.मतदानापर्यंत लग्नाचे ३१ मुहूर्तसर्वसाधारणपणे शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्या की, लग्नाचे मुहूर्त ठरवले जातात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मुहूर्त आहेत. निवडणूक काळात तर हे प्रमाण अधिक आहे. १९ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान लग्नाचे तब्बल ३१ मुहूर्त आहेत. २१ आणि २५ एप्रिलचा अपवाद वगळता दररोज ते आहेत. त्यामुळे लगीनसराईत मतदार व्यस्त होणार असल्याने त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्याची कसरतही नेते मंडळींना करावी लागणार आहे.धार्मिक कार्यक्रमांनाही भेटीहनुमान जयंती आणि त्याच दिवशी आलेल्या गुड फ्रायडेच्या निमित्ताने ठाण्यातील उमेदवारांनी अनेक चर्चना भेटी दिल्या होत्या. तर, हनुमान जयंतीनिमित्ताने ज्याज्या ठिकाणी भंडारा ठेवला होता, त्यात्या ठिकाणी सुमारे एक ते दोन हजारांचा जमाव हजर असतो. अशा ठिकाणीही उमेदवारांनी हजेरी लावल्याचे दिसून आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019marriageलग्न