शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

ढोल-ताशा पथक आणि आयोजकांतच वादाचे ढोल

By admin | Updated: March 22, 2017 01:31 IST

आवाजाच्या मर्यादेचे निर्बंध लागू झाल्याने गुढीपाडव्याच्या यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथक सहभागी करुन न घेण्याचा निर्णय

प्रज्ञा म्हात्रे / ठाणेआवाजाच्या मर्यादेचे निर्बंध लागू झाल्याने गुढीपाडव्याच्या यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथक सहभागी करुन न घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतल्याने स्वागतयात्रेच्या मुख्य आकर्षणावरच गदा येणार आहे. या निर्णयावर पथकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आमचीच जाण्याची इच्छा नसल्याची टीका केली आहे. ही पथकेचनसतील, तर यात्रेला शोभा राहणार नाही. त्यामुळे स्वागतयात्रेत ढोल-ताशा असलाच पाहिजे, असा हट्ट ठाण्यातील तरुणांनी धरल्याने वादाचे ढोल आतापासूनच वाजू लागले आहेत.त्यातच यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्याची जबाबदारी यात्रेच्या आयोजकांची नसेल तर आमची असेल अशी हमी सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघटनेने द्यावी, असेही आयोजकांचे म्हणणे असल्याने तोही वादाचा मुद्दा ठरणार असून त्याचा परिणाम संस्थांच्या सहभागावर होण्याची भीती वर्तवली जात आहे. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गेल्या १५ वर्षांपासून ठाण्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वागतयात्रा आयोजित केली जाते. अलिकडच्या काही वर्षांत आयोजकांनी ढोल-ताशा पथकांनाही स्वागतयात्रेत सहभागी करुन घेण्यास सुरूवात केली. ढोल-ताशांचे वादन तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याने हे वादन गर्दीचे केंद्र ठरू लागले. पारंपरिक वेशभूषेत होणारे हे वादन हा स्वागतयात्रांचा ‘यूएसपी’ बनला. यंदा मात्र आवाजाच्या मर्यादेच्या बंधनांमुळे पथकांना सहभागी करुन घेतले जाणार नसल्याचा निर्णय आयोजकांनी सध्या तरी घेतला आहे. याबाबत आम्ही बैठका घेऊ, अशी सारवासारवही लगेचच त्यांनी केली. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून हा निर्णय घेताना आयोजकांनी नीट विचार केलेला नाही. चित्ररथ पाहायला जितकी गर्दी होत नाही, तितके ठाणेकर ढोल-ताशा पथकांचे वादन पाहण्यासाठी जमतात. पण आयोजकांचेच नियोजनच ढिसाळ असल्याने आम्हाला सहभागी होण्याची इच्छा उरली नसल्याचा संताप काही ढोल-ताशा पथकांनी व्यक्त केला. स्वागतयात्रेत पथक असायलाच हवे. ध्वनीप्रदुषण तर दोन माणसांमधल्या संभाषणाने देखील होत असते. त्याचा किती बाऊ करायचा? त्यामुळे आयोजकांवर आम्ही खरोखर नाराज आहोत. ही तर ‘गरज सरो, वैद्य मरो,’ अशी अवस्था झाल्याचे काही पथकांनी लक्षात आणून दिले. स्वागतयात्रेतील ढोल- ताशा पथकांचे वादन पाहण्यासाठी आम्ही येत असतो. चार तासांच्या वादनाने असे किती ध्वनीप्रदूषण होणार आहे? इतर वेळी होणाऱ्या आवाजांचा, वाहनांच्या कर्कश हॉर्नचा त्रास होत नाही का? असा खडा सवाल करून मराठमोळ््या सणानिमित्त काढल्या जाणाऱ्या या स्वागतयात्रेत पारंपरिक वाद्य असलेले ढोल-ताशा पथक नक्कीच असले पाहिजे. ते असेल तरच या स्वागतयात्रेला काही अर्थ आहे, अशी भावना ठाण्यातील तरुणांनी व्यक्त केल्याने आयोजकांची पुरती कोंडी झाली आहे.