शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

"भिवंडीची बकाल शहर ओळख पुसण्यासाठी विकास आराखडा लोकाभिमुख असावा"

By नितीन पंडित | Updated: September 19, 2022 18:41 IST

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मनपा प्रशासनास सूचना

नितीन पंडित, भिवंडी: भिवंडी शहराची ओळख बकाल शहर म्हणून करून दिली जात असताना ती ओळख पुसण्यासाठी बनविला जाणार विकास आराखडा हा लोकाभिमुख असावा अशा सूचना केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मनपा प्रशासनास केल्या आहेत. सोमवारी महानगरपालिकेच्या २०२३ मध्ये बनविल्या जाणाऱ्या विकास आराखड्या संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. सेवा सप्ताह अंतर्गत भिवंडी महानगरपालिका मुख्यालयात भिवंडी विकास आराखडा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ,अति आयुक्त ओमप्रकाश दिवटे,शहर अभियंता एल पी गायकवाड,नगररचनाकार अनिल एलमाने,सहाय्यक संचालक नगररचना स्मिता कलकुटकी यांसह पालिका अधिकारी उपस्थित होते.

बऱ्याच वेळा प्रशासन विकास आराखडा कार्यालयात बसून बनवीत असते असे न करता नागरीकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब त्या विकास आराखड्यात असणे आवश्यक असून त्यासाठी नागरीकांना काय हवं आहे कोणत्या सुविधा हव्या आहेत यांच्या सूचना नागरिकांकडून घेऊन त्यावर प्रशासनाने काम करण्याची गरज आहे.तरच आपण शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात यशस्वी होऊ असे सांगत विकास आराखडा बनविताना शहराची जुनी दाटीवाटीचे बकाल शहर ओळख पुसून नवीन ओळख निर्माण करायची असेल तर शहरात उद्यान,क्रीडांगण,दळणवळण सुविधा,नाट्यगृह,पर्यटन यावर भर देणे गरजेचे आहे असे स्पष्ट करीत कपिल पाटील यांनी वऱ्हाळ तलाव सुशोभीकरण करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाच्या सीएसआर फंडातून १५ कोटी रुपये तलाव सुशोभीकरणासाठी उपलब्ध होणार असून,त्याच परिसरात सुसज्ज नाट्यगृह उभारण्यासोबत शहरात सुसज्य रुग्णालय,आंतरराष्ट्रीय क्रीडा खेळाडू निर्माण व्हावे यासाठी इनडोअर क्रीडांगण बनविण्यासाठी आराखड्यात प्राधान्य देण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी केल्या.

बैठकीच्या सुरूवातीला आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी कपिल पाटील यांचे स्वागत करीत यापूर्वी विकास आराखडा २००३ मध्ये बनविण्यात आले होता त्यानंतर २०२३ चा विकास आराखडा हा २०४२ ची लोकसंख्या दृष्टीक्षेपात ठेवून हा विकास आराखडा बनविण्याचे काम केले जात असल्याचे प्रास्ताविकात सांगितले .

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBhiwandiभिवंडीthaneठाणे