शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

लोकल धावूनही कोरोना नियंत्रणात , किंचित रुग्णवाढीबरोबरच बरे होणारेही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 00:01 IST

Palghar : वसई-विरार वगळता १ ते १३ फेब्रुवारीदरम्यान पालघरमध्ये १०९ रुग्ण आढळले आहेत, तर वसई-विरारमध्ये याच कालावधीत १९० रुग्ण नव्याने आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- जगदीश भोवड/हितेन नाईक

पालघर : सरकारने मुंबईत  १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेसाठी का होईना, पण सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू केल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला असून अनेक जण आता नोकरीधंद्यानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत. त्याच वेळी कोरोना नियंत्रणात असल्याचेही आढळले आहे. दरम्यान, रुग्णांच्या संख्येत गेल्या १३ दिवसांत किंचित वाढ होत असतानाच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. वसई-विरार वगळता १ ते १३ फेब्रुवारीदरम्यान पालघरमध्ये १०९ रुग्ण आढळले आहेत, तर वसई-विरारमध्ये याच कालावधीत १९० रुग्ण नव्याने आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच जिल्ह्यामध्ये गेल्या १३ दिवसांत २९९ नवीन रुग्ण आढळले आहेत. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सध्या कोरोना नियंत्रणात आहे. शनिवारी वसई-विरारमध्ये २४, तर जिल्ह्याच्या अन्य भागांत १७ रुग्ण आढळले. मात्र पाच तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. पालघर तालुक्यामध्ये मात्र अद्यापही अधूनमधून रुग्ण आढळतच आहेत. त्याच वेळी वसई-विरारमध्येही नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या किंचित वाढताना दिसत आहे. पालघरसह सात तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत ८३ रुग्ण दाखल असून वसई-विरारमध्ये १७३ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.वसई-विरारमध्ये आजवर २९ हजार ९५६ रुग्ण आढळले असून दुर्दैवाने ८९४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, मात्र त्याच वेळी २८ हजार ८८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, वसई-विरारमध्ये गेल्या १३ दिवसांत २५० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर पालघरसह सात तालुक्यांमध्ये आजवर १५ हजार ५३५ रुग्ण आढ‌ळले असून ३०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १५ हजार १४८ रुग्ण या जीवघेण्या आजारातून बरे झाले आहेत.एका परिसरातून दुसरीकडे जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच लोकलमधील गर्दीमुळे शारीरिक अंतर कमी झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा काही प्रमाणात वाढू लागली आहे, असे बोलले जात आहे. तसेच मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. पालघर जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण चांगले असून राज्यात पहिल्या तीन क्रमांकात पालघर जिल्हा आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन आठवड्यांत वातावरणात सतत बदल होत आहेत. त्यातून ताप, सर्दी-खोकला, अंगदुखीच्या रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे, असे डाॅक्टरांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण फार वाढले नसले तरी आम्ही सतर्क आहोत. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. तसेच सध्या ताप, सर्दी, खोकला हे आजार बदलत्या हवामानामुळे निर्माण झाले असून साथीच्या आजाराचा कुठलाही धोका नाही. याचा कोरोनाशी काही संबंध नाही.- डॉ. अनिल थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर