शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालय होऊन देखील भूमिपुत्रांच्या तक्रारींवर कारवाईस पोलिसांची टाळाटाळ    

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:44 IST

मीरा भाईंदर मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याच्या तसेच गैरप्रकाराने जमिनी बळकावल्याच्या अनेक तक्रारी असून देखील मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात त्यांना न्याय दिला जात नसल्याचा संताप स्थानिकांच्या संघटनांनी व्यक्त केला आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याच्या तसेच गैरप्रकाराने जमिनी बळकावल्याच्या अनेक तक्रारी असून देखील मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात त्यांना न्याय दिला जात नसल्याचा संताप स्थानिकांच्या संघटनांनी व्यक्त केला आहे . पोलीस आयुक्तालय झाल्याने आणि त्यातही आयुक्त पदी सदानंद दातेंसारखे ज्येष्ठ अधिकारी लाभून देखील भूमिपुत्रांना न्याय मिळत नसेल तर आयुक्तालय चुलीत घालायचे का ? असा सवाल ह्या संघटनांनी केला आहे . 

मीरा भाईंदर मधील बहुतांश जमिनी ह्या स्थानिक आदिवासी , आगरी , कोळी , ख्रिस्ती व सोमवंशीय पाठारे समाजाच्या होत्या व आहेत . मुंबईला लागून असल्याने मीरा भाईंदर मधील जमिनींना सोन्याचे भाव आले आणि राजकारण्यांसह बिल्डरांनी जमिनी घेण्याचा सपाटा लावला . परंतु काही राजकारणी - बिल्डरांनी भूमिपुत्रांच्या अज्ञानतेचा , विश्वासाचा गैरफायदा घेत खोट्या स्वाक्षऱ्या करणे , नियमबाह्य अनोंदणीकृत मुखत्यार पत्र , बनावट कागदपत्रे , अधिकाऱ्यांच्या संगनमताने परस्पर जमीन व्यवहाराची नोंदणी करून घेणे आदी प्रकार केले . काहींनी बळजबरी कब्जा केला . कावडी मोलाने जमिनी घ्या पासून अनेकांना मोबदला सुद्धा दिला गेला नाही अश्या तक्रारी आहेत. 

हे सर्व करताना काही राजकारणी व बिल्डरांनी पोलीस आणि पालिका प्रशासनाला हाताशी धरून भूमिपुत्रांच्या तक्रारीना केराची टोपली दाखवली . अगदी पोलीस ठाण्या पासून पोलीस आयुक्तां पर्यंत तक्रारी होऊन देखील कार्यवाही केली जात नाही . गुन्हे दाखल केले जात नाहीत . संबंध नसलेले तांत्रिक मुद्दे मुद्दाम उपस्थित केले जातात . जास्तच पाठपुरावा भूमिपुत्र करत असेल तर थातुर मातुर कार्यवाही दाखवून बोळवण केली जाते असे आरोप होत आहेत .   

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा हाताशी धरून सर्रास बांधकाम परवानग्या मिळवल्या जातात व बांधकामे केली जातात. टीडीआर घेतला . स्वतः करोडो रुपयांची माया गोळा करताना ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या भूमिपुत्रांना मोबदला दिला नाही. दिलाच तर तो कवडीमोलाने दिला . पोलीस आणि पालिका स्तरावर अनेक तक्रारी होत असून देखील भूमिपुत्रां ऐवजी भूमाफियांना पाठीशी घालण्याचे काम ह्या यंत्रणा करत असल्याचे आरोप गंभीर आहेत . 

ऍड . सुशांत पाटील ( सचिव,  आगरी एकता समाज ) - पोलीस जर राजकारणी व धनदांडग्याची चाकरी करत भूमिपुत्रांवर अन्याय करणे थांबवणार नसतील तर भुमीपुत्रांसाठी रस्त्यावर उतरू. कायदा हातात घेऊ . आणि त्याची जबाबदारी पोलिसांची असेल .  पोलीस आयुक्तालय झाले आणि दातें सारखे ज्येष्ठ अनुभवी आयुक्त लाभले जेणे करून भूमिपुत्रांना सुद्धा न्याय मिळेल अशा आशा होत्या . पण त्या फोल ठरल्या असून पोलीस आयुक्तालय चुलीत घालायचे काय ? 

सचिन घरत ( पदाधिकारी - स्थानिक भूमिपुत्र संघटना आणि मराठी एकीकरण समिती ) - काही पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी भूमिपुत्रांना न्याय देण्या ऐवजी काही राजकारणी व बिल्डरांच्या घरी पाणी भरत भूमिपुत्रांवर अन्याय करून त्यांना नागवले आहे . त्यांना देशोधडीला लावले आहे . या विरोधात पालिका आयुक्तांना निवेदने दिली असून पोलीस आयुक्तांना सुद्धा भेटणार आहोत . अन्यथा पोलीस व पालिके विरुद्ध आंदोलने करू . 

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर