शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

पोलीस आयुक्तालय होऊन देखील भूमिपुत्रांच्या तक्रारींवर कारवाईस पोलिसांची टाळाटाळ    

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:44 IST

मीरा भाईंदर मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याच्या तसेच गैरप्रकाराने जमिनी बळकावल्याच्या अनेक तक्रारी असून देखील मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात त्यांना न्याय दिला जात नसल्याचा संताप स्थानिकांच्या संघटनांनी व्यक्त केला आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याच्या तसेच गैरप्रकाराने जमिनी बळकावल्याच्या अनेक तक्रारी असून देखील मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात त्यांना न्याय दिला जात नसल्याचा संताप स्थानिकांच्या संघटनांनी व्यक्त केला आहे . पोलीस आयुक्तालय झाल्याने आणि त्यातही आयुक्त पदी सदानंद दातेंसारखे ज्येष्ठ अधिकारी लाभून देखील भूमिपुत्रांना न्याय मिळत नसेल तर आयुक्तालय चुलीत घालायचे का ? असा सवाल ह्या संघटनांनी केला आहे . 

मीरा भाईंदर मधील बहुतांश जमिनी ह्या स्थानिक आदिवासी , आगरी , कोळी , ख्रिस्ती व सोमवंशीय पाठारे समाजाच्या होत्या व आहेत . मुंबईला लागून असल्याने मीरा भाईंदर मधील जमिनींना सोन्याचे भाव आले आणि राजकारण्यांसह बिल्डरांनी जमिनी घेण्याचा सपाटा लावला . परंतु काही राजकारणी - बिल्डरांनी भूमिपुत्रांच्या अज्ञानतेचा , विश्वासाचा गैरफायदा घेत खोट्या स्वाक्षऱ्या करणे , नियमबाह्य अनोंदणीकृत मुखत्यार पत्र , बनावट कागदपत्रे , अधिकाऱ्यांच्या संगनमताने परस्पर जमीन व्यवहाराची नोंदणी करून घेणे आदी प्रकार केले . काहींनी बळजबरी कब्जा केला . कावडी मोलाने जमिनी घ्या पासून अनेकांना मोबदला सुद्धा दिला गेला नाही अश्या तक्रारी आहेत. 

हे सर्व करताना काही राजकारणी व बिल्डरांनी पोलीस आणि पालिका प्रशासनाला हाताशी धरून भूमिपुत्रांच्या तक्रारीना केराची टोपली दाखवली . अगदी पोलीस ठाण्या पासून पोलीस आयुक्तां पर्यंत तक्रारी होऊन देखील कार्यवाही केली जात नाही . गुन्हे दाखल केले जात नाहीत . संबंध नसलेले तांत्रिक मुद्दे मुद्दाम उपस्थित केले जातात . जास्तच पाठपुरावा भूमिपुत्र करत असेल तर थातुर मातुर कार्यवाही दाखवून बोळवण केली जाते असे आरोप होत आहेत .   

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा हाताशी धरून सर्रास बांधकाम परवानग्या मिळवल्या जातात व बांधकामे केली जातात. टीडीआर घेतला . स्वतः करोडो रुपयांची माया गोळा करताना ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या भूमिपुत्रांना मोबदला दिला नाही. दिलाच तर तो कवडीमोलाने दिला . पोलीस आणि पालिका स्तरावर अनेक तक्रारी होत असून देखील भूमिपुत्रां ऐवजी भूमाफियांना पाठीशी घालण्याचे काम ह्या यंत्रणा करत असल्याचे आरोप गंभीर आहेत . 

ऍड . सुशांत पाटील ( सचिव,  आगरी एकता समाज ) - पोलीस जर राजकारणी व धनदांडग्याची चाकरी करत भूमिपुत्रांवर अन्याय करणे थांबवणार नसतील तर भुमीपुत्रांसाठी रस्त्यावर उतरू. कायदा हातात घेऊ . आणि त्याची जबाबदारी पोलिसांची असेल .  पोलीस आयुक्तालय झाले आणि दातें सारखे ज्येष्ठ अनुभवी आयुक्त लाभले जेणे करून भूमिपुत्रांना सुद्धा न्याय मिळेल अशा आशा होत्या . पण त्या फोल ठरल्या असून पोलीस आयुक्तालय चुलीत घालायचे काय ? 

सचिन घरत ( पदाधिकारी - स्थानिक भूमिपुत्र संघटना आणि मराठी एकीकरण समिती ) - काही पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी भूमिपुत्रांना न्याय देण्या ऐवजी काही राजकारणी व बिल्डरांच्या घरी पाणी भरत भूमिपुत्रांवर अन्याय करून त्यांना नागवले आहे . त्यांना देशोधडीला लावले आहे . या विरोधात पालिका आयुक्तांना निवेदने दिली असून पोलीस आयुक्तांना सुद्धा भेटणार आहोत . अन्यथा पोलीस व पालिके विरुद्ध आंदोलने करू . 

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर