शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

डोळखांबच्या हुंबचापाड्यातील महिलांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 02:04 IST

मूलभूत सुविधांपासून वंचित : पिण्यासाठी गढूळ पाणी, आरोग्याची समस्या

- वसंत पानसरे किन्हवली: धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांची ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. डोळखांब भागातील ढाढरे ग्रामपंचायत हद्दीतील हुंबाचापाडा या गावाची अवस्था भयानक असून गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. या गावात रस्ते, पाणी या जीवनावश्यक सुविधांअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.तालुक्यातील डोंगरभागावर वसलेले जेमतेम १५० लोकवस्तीचे हुंबाचापाडा हे गाव. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव शासकीय लालफितीमुळे शापित जीवन जगत आहे. गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना अर्धा किमी पायपीट करावी लागते. अनेकदा तर पाण्यासाठी दगडगोट्यांमध्ये आपला जीव धोक्यात घालावा लागतो. पाण्यासाठीची ही ससेहोलपट हुंबाचापाड्याच्या नशिबी अनेक वर्षांपासून आहे.शेती हे रोजगाराचे एकमेव साधन. पण, आता शेतीवर गुजराण होत नाही म्हणून अनेकजण मोलमजुरीसाठी अन्यत्र जातात. इथे येजा करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना आपल्या सामानाची नेआण स्वत:च करावी लागते. एवढेच नव्हे तर गावात जर कोणी आजारी पडले, तर रुग्णाला खांद्यावर उचलून ९०० मी. मुख्य रस्त्यावर आणून इतर वाहनांमधून दवाखाना गाठावा लागतो. रस्त्याअभावी हुंबाचापाडा गावाला या मरणयातना सोसाव्या लागत आहेत.पिण्याच्या पाण्यासाठी होणारे आमचे हाल अनेक वर्षांपासून कोणाला समजलेच नाही. गढूळ पाणी प्यावे लागते. गावात आरोग्य, शिक्षण, रस्त्यांची गैरसोय आहे. शासन, लोकप्रतिनिधी आमच्या समस्या जाणूनच घेत नाहीत. फक्त मतांचे जोगवे मागण्यासाठी येतात.बेलवली या गावातून आमची जुनी नळयोजना होती. तेव्हा पाण्याची एवढी टंचाई नव्हती. २००९ मध्ये आमची वेगळी पाइपलाइन मंजूर झाली. त्यावेळी विहीर मंजुरीसाठी प्रयत्नही केले होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या उदासीनपणामुळे नवीन विहीर न बांधता २००० मध्ये झालेल्या नादुरुस्त विहिरीवरूनच पाइपलाइन जोडली गेल्याने दोन वर्षांनंतर पाणी येणेच बंद झाले. त्यानंतर, २०१४ ला शासनस्तरावरून बेळवली-हुंबाचापाडा ही नळयोजना दुरु स्तीस काढली गेली आणि त्याला जोडलेली हुंबाचापाडा ही ९०० मी. पाइपलाइन कट करण्यात आल्याने आम्हाला टंचाई जाणवू लागली आहे.- कमल भोईर, उपसरपंच, ग्रा.पं. ढाढरेहुंबाचापाडा येथे पाण्याचा स्रोत नाही. बोअरवेलला पाणी कमी झाले असून तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही टँकरने पाणीपुरवठा करणार आहोत. परंतु, तांत्रिक अडचण अशी आहे की, टँकर जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करणे गरजेचे आहे.- एम. आव्हाड, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, शहापूर

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई