शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

उपमहापौर भालेरावांचा उपोषणाचा इशारा; उल्हासनगरात रंगला आयुक्त विरुद्ध उमपहापौर सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 17:01 IST

Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेला प्रथमच अतिरिक आयुक्त म्हणून करुणा जुईकर तर अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, प्रियंका राजपूत व सुभाष जाधव असे चार उपायुक्त मिळाले.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका उपयुक्तांना सोपविलेल्या विभागात आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप उपमहापौर भगवान भालेराव यांनी करून उपायुक्त अशोक नाईकवाडे व प्रियंका राजपूत यांच्याकडील काही विभाग काढण्याची लेखी मागणी केली. याप्रकारने महापालिकेत आयुक्त विरुद्ध उपमहापौर असा सामना रंगल्याची चर्चा आहे. 

उल्हासनगर महापालिकेला प्रथमच अतिरिक आयुक्त म्हणून करुणा जुईकर तर अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, प्रियंका राजपूत व सुभाष जाधव असे चार उपायुक्त मिळाले. उपायुक्त दर्जाचे चार अधिकारी मिळाल्याने महापालिकेत पारदर्शक व चांगले काम होणार असे वाटत होते. मात्र उपमहापौर भगवान भालेराव यांनी उपायुक्त यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागात आयुक्तांनी दुजाभाव करून काही उपयुक्तांना चांगले तर काहींना कमी दर्जाचे विभाग दिल्याचा आरोप केला. 

उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्याकडील शिक्षण विभाग व महिला बालकल्याण विभाग तसेच उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभाग व भांडार विभाग काढून घेण्याची लेखी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. २९ जुलैच्या दुपार पर्यंत सोपविलेल्या विभाग काढला नाहीतर, उपमहापौर दालना बाहेर उपोषण करण्याचा इशारा भालेराव यांनी आयुक्तांना दिला आहे. 

महापालिका उपयुक्त कडील सोपविलेल्या विभागावरून आयुक्त डॉ राजा दयानिधी व उपमहापौर भगवान भालेराव एकमेका विरोधात उभे ठाकल्याचे चित्र शहरात निर्माण झाले. कोरोना महामारीच्या काळात महापालिकेत कार्यरत असलेले एकमेव उपायुक्त मदन सोंडे यांनी चमकदार कामगिरी केली. मात्र त्यांना बाजूला सारून कमी महत्त्वाचे विभाग दिल्याचा आरोप भालेराव यांनी केला. 

तसेच विभाग सोपविताना वरिष्ठ श्रेणीचा विचार केला नाही. असेही ते म्हणाले. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी हे बहुतांश नगरसेवक, पत्रकार, नागरिक, पालिका अधिकारी यांना भेटत नसल्याने, त्यांच्या विरोधात शहरात रोष निर्माण झाल्याचा आरोपही उपमहापौर भगवान भालेराव यांनी केला. उपमहापौरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने व आरोपाने महापालिकेतील वातावरण ढवळून निघाले आहे. 

हे तर प्रशासकीय कामकाज - आयुक्त डॉ. दयानिधीमहापालिका सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना विविध विभागाचा पदभार सोपविणे, हे प्रशासकीय नियमित काम आहे. उपमहापौर भगवान भालेराव यांचे उपोषण व उपयुक्तांकडे सोपविलेल्या बाबतचे पत्र मिळाले असून नियमानुसार काय कारवाई होते. त्यानुसार कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर