शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

डम्पिंग ग्राउंडविरोधात अंबरनाथमध्ये रहिवाशांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 02:54 IST

अंबरनाथ नगरपालिके चे बेकायदा डम्पिंग ग्राउंड तत्काळ बंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिके चे बेकायदा डम्पिंग ग्राउंड तत्काळ बंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, मागणीचा विचार होत नसल्याने रहिवाशांनी संघर्ष समिती स्थापन करून डम्पिंगविरोधात निदर्शने सुरू केली आहे. रविवारी सुटीचा दिवस साधत शेकडो नागरिकांनी डम्पिंगविरोधात निदर्शने केली. यापुढे या डम्पिंगवर एकही गाडी येऊ देऊ नये, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.अंबरनाथ फॉरेस्टनाका येथे पालिकेचे डम्पिंग ग्राउंड असून २५ वर्षांपासून याच ठिकाणी शहरातील कचरा डम्प केला जात आहे. मात्र, वर्षभरापासून या डम्पिंगवर लागणारी आग नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. सतत हा प्रकार घडत असल्याने दुर्गंधी आणि डम्पिंगच्या धुराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या डम्पिंगविरोधात ग्रीन सिटी, हरिओम पार्क आणि मोरिवली पार्क भागातील रहिवासी एकवटले असून त्यांनी डम्पिंगविरोधात संघर्ष समिती तयार केली आहे. या समितीच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहे.या आंदोलनाचा एक भाग म्हणून रविवारी सर्व नागरिकांनी एकत्रित येत डम्पिंग ग्राउंडला आणि त्या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचºयाला कडाडून विरोध केला. डम्पिंगवर कचरा टाकू देणार नाही, अशी ठाम भूमिका या संघर्ष समितीमार्फत घेण्यात आली. संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो रहिवासी सहभागी झाले होते. राजकीय पक्षांची मदत न घेता नागरिकांनी एकत्रित येऊन या डम्पिंग ग्राउंडवर निदर्शने केली. डम्पिंगविरोधात घोषणा देत हातात फलक घेऊन नागरिकांनी प्रशासनाचा निषेध केला.मुळात ज्या सोसायट्यांना या डम्पिंगचा त्रास होत आहे त्या सोसायटीने आपला लढा सुरू करताना हे डम्पिंग ग्राउंड अनधिकृत असल्याचे कारण पुढे केले आहे. डम्पिंगचे आरक्षण ज्या जागेवर आहे, त्याच ठिकाणी कचरा हलवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. पालिकेमार्फत सुरू असलेले डम्पिंग बेकायदा असल्याने पालिकेने या ठिकाणी कचरा टाकू नये, अशी भूमिका निदर्शनकर्त्यांनी घेतली आहे. मोरिवलीपाड्यातूनच हे आंदोलनकर्ते डम्पिंगपर्यंत पोहोचले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.>ग्राउंड अजूनही पेटलेलेडम्पिंगवरील त्रासाची जाणीव पालिकेला झाल्यावर पालिकेने त्या ठिकाणी मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, त्रास अजूनही कमी झालेला नाही. निदर्शने सुरू असतानाही डम्पिंग पेटलेले होते. त्यामुळे पालिकेकडून योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

टॅग्स :agitationआंदोलन