शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

मीरारोडच्या कॉस्मोपॉलिटन शाळेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:33 IST

मीरारोड येथील शीतलनगर परिसरात असलेल्या कॉस्मोपॉलिटन या खाजगी शाळेने दोन विद्यार्थ्यांचे अर्धवट शिक्षण थांबवून त्यांना शाळेतून परस्पर काढून टाकल्याने त्याविरोधात त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या भार्इंदर शाखेच्या पदाधिका-यांनी बुधवारी पालिका मुख्यालयाजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन केले.

भाईंदर - मीरारोड येथील शीतलनगर परिसरात असलेल्या कॉस्मोपॉलिटन या खाजगी शाळेने दोन विद्यार्थ्यांचे अर्धवट शिक्षण थांबवुन त्यांना शाळेतून परस्पर काढून टाकल्याने त्याविरोधात त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या भार्इंदर शाखेच्या पदाधिका-यांनी बुधवारी पालिका मुख्यालयाजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी प्रशासनाकडे त्या शाळेची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली.या शाळेने सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात राज्य सरकारच्या कायद्यान्वये किमान १५ टक्के वाढ करणे अपेक्षित असतानाही सुमारे ४० टक्के वाढ केली. यामुळे इयत्ता दुसरीत शिकणारा आसिफ शेख व इयत्ता चौथीच शिकणारी त्याची बहिण आयेशा यांच्या पालकांनी बेकायदेशीरपणे वाढ केलेली फी भरण्यास नकार दिला. यामुळे शाळेने त्या विद्यार्थ्यांना थकीत फी त्वरीत भरण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केले. यानंतर सहामाही परिक्षेनंतर त्यांना परस्पर शाळेतुन काढले. याविरोधात त्या विद्यार्थ्यांची आई निशाद यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्याशी संलग्न असलेल्या अनुदानित बचाव समितीच्या माध्यामातुन राज्य सरकारच्या शिक्षण उपसंचालकांकडे शाळेच्या मनमानी कारभारविरोधात १७ आॅक्टोबरला तक्रार केली. शिक्षण उपसंचालक (मुंबई विभाग) डॉ. बी. बी. चव्हाण यांनी २६ आॅक्टोबरला शाळेच्या मुख्याध्यापिका निलम पाठक यांना पत्र पाठवुन त्या विद्यार्थ्यांना त्वरीत शाळेत नियमित करुन त्याचा अहवाल ७ नोव्ह्रंबरपर्यंत विभागाला पाठविण्याचे आदेश दिले. त्याचे पालन न केल्यास बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील नियम १२ नुसार कलम १२(३) व १८(३) अन्वये शाळेची मान्यताच रद्द करण्याचा इशारा दिला. परंतु, शाळेने त्याची दखल न घेता त्याला केराची टोपली दाखविली. त्याची तक्रार निशाद यांनी पुन्हा शिक्षण उपसंचालकांकडे केली असता त्यांनी १३ नोव्हेंबरला पुन्हा शाळेच्या मुख्याध्यापकांसह मीरा-भार्इंदर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांना पत्र पाठविले. त्यात दोन दिवसांत कार्यवाहीच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. अन्यथा शाळेची मान्यताच रद्द करण्याची कार्यवाही सुरु करण्याचा इशारा देण्यात आला. त्यालाही शाळेने दाद न दिल्याने अखेर भाकपाच्या भार्इंदर शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर सामंत यांच्या नेतृत्वाखाली त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी पालिका मुख्यालयाजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन छेडले. त्यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त दिपक पुजारी यांना निवदेन देऊन शाळेची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली. त्यावर उपायुक्तांनी शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या अहवालात शाळेची प्राथमिक चौकशी केल्याचे स्पष्ट केले असुन शाळेची मान्यता रद्द करण्यास हरकत नसल्याचे नमुद केल्याने त्यानुसार वरीष्ठ विभागाला तसे कळविण्यात येणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यानंतर ते आंदोलन मागे घेतल्याचे अ‍ॅड. सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर