शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

मुरबाड रोडमार्गे कल्याण मेट्रोचा मार्ग वळवावा, भाजपचे खासदार कपिल पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 20:40 IST

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी किल्ला, खडकपाडा, मुरबाड रोड मार्गे एपीएमएसी असा वळवावा, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज केली.

कल्याण - ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी किल्ला, खडकपाडा, मुरबाड रोड मार्गे एपीएमएसी असा वळवावा, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, रुपेश म्हात्रे, भिवंडीचे महापौर जावेद दळवी, उपमहापौर मनोज काटेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी खासदार पाटील यांनी कल्याण मेट्रोचा मार्ग वळविण्याची आग्रही मागणी केली.

कल्याण शहराचा विस्तार होत असून, खडकपाडा व मुरबाड रस्त्यावर हजारो नागरीक राहत आहेत. सद्यस्थितीत कल्याण मेट्रो दुर्गाडीहून सहजानंद चौकातून थेट एपीएमसीत जाणार आहे. त्यामुळे या मेट्रोचा नवे कल्याण मानल्या जाणाऱ्या भागातील हजारो नागरिकांना फायदा होणार नाही. त्यामुळे सहजानंद चौकाऐवजी खडकपाडा, मुरबाड रोडमार्गे एपीएमसीमध्ये मेट्रोचा मार्ग वळविल्यास हजारो प्रवाशांचा फायदा होईल. त्यामुळे मेट्रोचा मार्ग बदलावा, अशी आग्रही मागणी खासदार पाटील यांनी केली. नव्या मार्गामुळे कल्याण शहरातील वाहतूककोंडीतूनही दिलासा मिळू शकेल, याकडे खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोच्या मार्गात हजारो रहिवाशी विस्थापित होत आहेत. त्यात काही घरे 100 वर्षांहूनही अधीक जुनी आहेत. त्यामुळे या विस्थापितांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणीही खासदार पाटील यांनी केली. भिवंडीतून जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गामुळे कल्याण रोडवरील दुकानदार व रहिवाशी विस्थापित होणार आहेत. त्यांना न्याय देण्याचा आग्रह खासदार पाटील यांनी धरला.

टॅग्स :Metroमेट्रोkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीBJPभाजपा