शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

माजी सरपंचाने विविध योजनासाठी केली शासनाची फसवणूक जिल्हाधिका-याकडे कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:22 IST

भिवंडी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सुपेगाव मधील माजी सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी व सदस्य रोहिणी रोहिदास मढवी या दाम्पत्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक लक्ष्मण राऊत यांनी जिल्हाधिका-यांकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.शासनाच्या शहापूर येथील आदिवासी विकास ...

ठळक मुद्देआदिवासींच्या सामुहिक विवाहामध्ये कन्यादान योजनेच्या लाभासाठी भाऊ-बहिणीचा दोनदा विवाहयोजनेच्या लाभासाठी दुस-यांदा लग्नाचा फार्ससुपेगाव तत्कालिन सरपंचाच्या भ्रष्ट कामांत सदस्य बहिणीचा सहभाग

भिवंडी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सुपेगाव मधील माजी सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी व सदस्य रोहिणी रोहिदास मढवी या दाम्पत्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक लक्ष्मण राऊत यांनी जिल्हाधिका-यांकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.शासनाच्या शहापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया मार्फत आदिवासींच्या सामुहिक विवाहामध्ये कन्यादान योजना राबविली जाते. सुपेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी आणि ग्रामपंचायत सदस्या रोहिणी रोहिदास मढवी हे पतीपत्नी असुन यांचे लग्न ३ फेब्रुवारी २००४ मध्ये झाले आहे.त्यांच्या विवाहाची ही नोंद सुपेगाव ग्रामपंचायतीतील रजीस्टर मध्ये केली आहे.तसेच त्यांना कुमार नयन व कुमारी हर्षाली असे दोन आपत्य देखील आहेत. तरी देखील या दाम्पत्याने या कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ मार्च २०१२मध्ये सामुहिक सोहळ्यात सहभागी होऊन याच दिवशी लग्न झाल्याचे कागदोपत्री सत्यप्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हीट) प्रकल्प अधिका-यांकडे सादर केले आणि या योजनेमार्फत मिळणारा आर्थिक लाभ घेतला. तसेच माजी सरपंच रोहिदास मढवी यांची बहिण तथा माजी ग्रामपंचायत सदस्या कलावती रामचंद्र मढवी यांचे लग्न पुंडासच्या स्वप्नील गोपाळ भाईर यांच्या बरोबर २००७ मध्ये झाला.त्याची नोंद सुपेगाव ग्रामपंचायत रजीस्टरमध्ये आॅक्टोबर २०११ मध्ये करण्यात आली आहे. तसेच त्यांनी १८ मे २०१२ रोजी सामुहिक सोहळ्यात सहभागी होऊन या दिवशी लग्न झाल्याचे प्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हीट) कन्यादान योजनेचा आर्थिक लाभ मिळण्यासाठी शहापूर प्रकल्प अधिका-यांकडे सादर करून लाभ घेतला आहे. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन या दाम्पत्यांनी सत्यप्रतिज्ञापत्रात लिहून दिल्याप्रमाणे दंडनीय कारवाई करावी,अशी लेखी मागणी अशोक राऊत यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.त्याचप्रमाणे हे सामुहिक कुटूंब असुन त्यांची शिधापत्रीका एकत्र आहे. असे असताना शासनाच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामिण योजनेंतर्गत वैयक्तीक शौचालयासाठी तत्कालीन सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी याने कागदपत्रे रंगविली. तसेच सरपंच पदाचा गैरफायदा घेऊन खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करून शासनाचा निधी हडप केला,असा आरोप देखील अशोक राऊत यांनी जिल्हाधिकाºयांकडे केलेल्या आपल्या पत्रात केला आहे.या घटनेने परिसरांत खळबळ माजली असुन जिल्हाधिका-यांकडून होणा-या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीcrimeगुन्हे