शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

केमिकल कारखान्यावर कारवाईची मागणी उल्हासनगरातील वालधुनी नदीच्या पाण्याला दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 6:14 PM

 उल्हासनगरच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी शहराची जीवनवाहिनी ऐवजी शाप ठरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे

 सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रातून दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री सुटलेल्या दुर्गंधीने नदी किनाऱ्यावरील नागरिकांना डोकेदुखी, उलट्या व श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. नदी पात्रात केमिकल युक्त सांडपाणी सोडण्यात आल्याने, परिसरात दुर्गंधी सुटल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केली.

 उल्हासनगरच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी शहराची जीवनवाहिनी ऐवजी शाप ठरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नदी पात्रात दुसरी कडून आणलेली केमिकल युक्त सांडपाणी नदीत सर्रासपणे सोडले जात असल्याने, यापूर्वी टँकरचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच नदी किनाऱ्यावरील अंबरनाथ येथील केमिकल कारखाने सांडपाणी सोडले जात असल्याने, प्रदूषण मंडळाने यापूर्वीच काही कारखान्यांना नोटिसा देऊन गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री नदी पात्रातून उग्र दर्प येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येऊन अनेक नागरिक रस्त्यावर आले. नागरिकांना श्वास घेण्यास, डोकेदुखी व उलट्या आदींचा त्रास झाल्याने संताप व्यक्त होत असून कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

वालधुनी नदीतील दर्पमुळे नागरिक त्रस्त असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिका, पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची मागणी नगरसेवक सविता तोरणे-रगडे, गजानन शेळके व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केली. तसेच नदी किनारी रात्रीची गस्त घातल्यास टँकरने नदी पात्रात केमिकल सोडणाऱ्यावर वचक बसणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी पात्रात केमिकल सोडणाऱ्यावर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर