शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अपहरण केलेल्या दोन मुलींसह तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 23:47 IST

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासह तिघांचे अपहरण करणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने पनवेल (नवी मुंबई) मधून अटक केली आहे.

ठाणे : अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासह तिघांचे अपहरण करणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने पनवेल (नवी मुंबई) मधून अटक केली आहे. या तिन्ही मुलांना तसेच त्यांचे अपहरण करणाºया दोघांना अशा पाच जणांना बुधवारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून दोन अल्पवयीन मुली आणि तीन मुलांचे अपहरण झाल्याचा गुन्हा ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी दाखल झाला. ही मुले मुंबई परिसरात असल्याची माहिती कैम्पियरगंज (उत्तर प्रदेश) पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मृत्युंजयकुमार पांडेय यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे या अपहरण प्रकरणात मदतीची मागणी केली. त्यानुसार, गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाला ही मदत करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिले होते. आपल्या खब-यांच्या आधारे तसेच मोबाइल टॉवरच्या माध्यमातून ही मुले पनवेल, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील बांधकाम साइटवर असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. ते पनवेलच्या कच्छी मोहल्ला भागात असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर या मुलांना ८ नोव्हेंबर रोजी ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यांच्यापैकी प्रद्युम्न ऊर्फ विद्यासागर मोहनलाल निषाद (२१) हा गेल्या तीन वर्षांपासून पनवेल येथे सेंट्रिंगचे काम करत होता. तो अधूनमधून त्याच्या सोनौरा (जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) या गावी जात होता. त्याच काळात त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले. तसेच त्याचा मित्र अखिलेश जनार्दन निषाद (१९) याचेही त्याच गावातील अन्य एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. प्रद्युम्न आणि अखिलेश यांनी आपसात संगनमत करून या गावातील दोन मुली आणि त्यांच्यापैकी एका मुलीचा १६ वर्षांचा भाऊ यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून ३१ आॅक्टोबर रोजी त्यांचे अपहरण करून त्यांना पनवेलच्या कच्छी मोहल्ला भागातील एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये आणून ठेवले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी कैम्पियरगंजचे उपनिरीक्षक मृत्युंजयकुमार पांडेय आणि त्यांच्या पथकाच्या ताब्यात या पाचही मुलांना बुधवारी दिले.

टॅग्स :Crimeगुन्हा