शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

निर्णय देण्यास पालिका प्रशासनाकडून विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:36 IST

नगरसेवकपद रद्दबाबत झाली सुनावणी, शेवटची संधी दिली जाणार

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सात नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठीच्या प्रलंबित तक्रारींवर सात महिन्यांनी शुक्रवारी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सुनावणी घेतली. त्यात लवकरच शेवटची संधी म्हणून एक अंतिम सुनावणी घेण्याचे सांगण्यात आले. तर, सुनावणी लवकर आटोपून निर्णय देण्यास मुद्दाम विलंब लावला जात असल्याचा सूर तक्रारदारांनी लावला आहे.मीरा रोडच्या साईबाबानगर येथे पती दीपकने बेकायदा बांधकाम केले म्हणून भार्इंदर पूर्व प्रभाग-५ मधील भाजपा नगरसेविका मेघना रावल यांचे पद रद्द करण्याबद्दल झालेल्या सुनावणीवेळी रावल या हजर होत्या. तर, सुनावणीची माहितीच आपल्याला दिली नव्हती, असे तक्रारदार इरबा कोनापुरे यांनी सांगत आपण हजर राहू शकलो नसल्याचे स्पष्ट केले. रावल व आपले म्हणणे आधीच सादर केले असताना अजून निर्णय मात्र दिला जात नसल्याबद्दल कोनापुरे यांनी नाराजी व्यक्त केली. याआधी सात महिन्यांपूर्वी सुनावणी घेण्यात आली होती. नगरसेवकांना वाचवण्यासाठी पालिका वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत यात मोठा आर्थिक गैरव्यवहार तर झाला नाही ना, अशी शंका तक्रारदार घेत आहेत.भाजपा नगरसेविका नीला सोन्स व विजय राय यांनी आजच्या सुनावणीला दांडी मारत पत्र देऊन पुढची तारीख मागितली. मीरा रोडच्या कनकिया भागात सोन्स व राय यांनी कार्यालय, वाचनालयाचे बेकायदा बांधकाम केल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार आहे. तक्रारदार ब्रिजेश शर्मा व रोलन मिरांडा मात्र उपस्थित होते.पेणकरपाडा येथील सरकारी जमिनीवरील बेकायदा पक्ष कार्यालयाचे बांधकाम केल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक परशुराम म्हात्रे सुनावणीला आले नसले, तरी त्यांनी आपले लेखी म्हणणे आधीच दिले आहे. शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील उपस्थित होत्या. पाटील यांनी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत पडताळणी करा, असे म्हटले. त्यांनी लेखी म्हणणे सादर केले. तक्रारदार भरत मोकल यांनी २०१६ पासून आपण तक्रार करत असताना आधीही सुनावणी घेऊन नगरसेवकांना पाठीशी घातले जात असल्याचे नमूद केले.काँग्रेस समर्थक नगरसेवक राजीव मेहरा यांनी माहिती लपवल्याने पद रद्द करण्याची तक्रार करणारे पराभूत उमेदवार साबीर शेख व साजी आयपी उपस्थित होते. तिघांचेही म्हणणे आधीच दिलेले आहे. पण, अजून निर्णय झालेला नाही. काँग्रेसचे नरेश पाटील यांनी सुनावणीवेळी आपले वकील नसल्याचे सांगत पुढील तारीख मागितली. वेगवेगळी जन्मतारीख आणि शिक्षणाच्या माहितीतली तफावतप्रकरणी पद रद्द करा, अशी भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ. सुरेश येवले यांची तक्रार आहे.लेखी दिले, आता निर्णय द्याएकूणच सर्व सुनावण्या झाल्या असल्या, तरी कोणी हजर तर कोणी गैरहजर असल्याने आणखी एक शेवटची सुनावणी घेण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. स्वत: सचिव वासुदेव शिरवळकर यांनीही एक सुनावणी लवकरच घेतली जाईल, असे सांगितले. ज्यांची सुनावणी होऊन लेखी म्हणणे मांडले आहे, त्यासाठी सुनावणी न घेता निर्णय घेण्याची मागणीही काही तक्रारदारांनी केली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक