शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

देखभाल दुरुस्ती कंत्राटाचा आज फैसला; परिवहन समितीच्या भूमिकेकडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:41 IST

अपेक्षित उत्पन्न न वाढल्याचा ठपका

कल्याण : वार्षिक देखभाल दुरुस्ती कंत्राटाचे (एएमसी) तीन कोटी रुपयांचे बील केडीएमटीकडून थकल्याने कंत्राटदार काम करण्यास इच्छुक नाही. त्यामुळे त्याने कंत्राट बंद करण्यासंदर्भात केडीएमटीला आगाऊ नोटीस दिली आहे. मात्र, कंत्राट देऊनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही, असा ठपका उपक्रमाने ठेवला आहे. दरम्यान कंत्राट सुरू ठेवायचे की नाही? त्याचबरोबर कंत्राटदाराच्या थकीत बिलांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत उपक्रमाने प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत समिती कोणती भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे.

केडीएमटीने जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या १०८ बस व पूर्वीच्या टाटा मेक २० मोठ्या बस, अशा एकूण १२८ बसच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट मे. डिझेल कमर्शियल कॉर्पाेरेशन यांना दिले आहे. तीन वर्षांसाठी दिलेले हे कंत्राट १ मार्च २०१९ पासून सुरू झाले. यात वाहक स्वत:चे आणि चालक कंत्राटदारातर्फे उपलब्ध करून या बस मार्गावर चालविण्यास सुरुवात झाली होती. कंत्राटदाराला १२८ बसपैकी सुस्थितीतील ९५ बस दुरुस्तीसाठी उपक्रमाकडून दिल्या गेल्या होत्या. त्याचा लाभ प्रारंभी उपक्रमाला झाला. परंतु, त्यानंतर मात्र अपेक्षित उत्पन्न वाढले नाही, असे उपक्रमाचे म्हणणे आहे. बसच्या दुरुस्तीसाठी पुरेसा तांत्रिक कर्मचारी कंत्राटदाराकडून उपलब्ध नसणे, सुट्या भागांचा अभाव, बसचे ब्रेकडाउन होण्याचे वाढते प्रमाण आदी कारणांमुळे मार्गावरील फेऱ्या पूर्ण होत नसल्याने प्रवाशांमध्ये घट झाली आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर झाल्याकडे उपक्रमाने लक्ष वेधले आहे.

दरम्यान, कंत्राट सुरू होऊन सहा महिने उलटले असून, उपक्रमाने कंत्राटदाराची बिले अदा केलेली नाहीत. त्यात एएमसी अंतर्गत दुरुस्तीसाठी बºयाचशा बस उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत कंत्राट ३० नोव्हेंबरपासून बंद करण्याचे पत्र मे. डिझेल कमर्शियल कॉर्पाेरेशनने उपक्रमाला दिले आहे. यावर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंत्राट बंद न करता सुरू ठेवणेबाबत उपक्रमाने कंत्राटदाराला कळविले आहे. परंतु, कंत्राटदाराचे पत्र पाहता मध्यंतरी सभापती मनोज चौधरी यांनी गणेशघाट आगारात विशेष बैठक घेऊन यापुढे देखभाल दुरुस्ती उपक्रमातील कर्मचाऱ्यांकडून करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंत्राट बंद झाल्यावर पुढचे नियोजन कसे करायचे यासंदर्भात चौधरी यांनी ही बैठक घेतली होती. त्यामुळे शुक्रवारी होणाºया समितीच्या सभेत सभापतींसह अन्य सदस्य एएमसी कंत्राटसंदर्भात कोणता निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाहतूक कोंडीही प्रवासी घटण्याला कारणीभूत

पत्रीपूल आणि दुर्गाडी पुलावर होणाºया वाहतूककोंडीमुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याचे उपक्रमाचे म्हणणे आहे. जादा उत्पन्न मिळवून देणारे मार्ग म्हणून पनवेल, वाशी, मलंगगड आणि भिवंडी, याकडे पाहिले जाते. परंतु, वाहतूककोंडीमुळे या मार्गावर बसच्या फेºया कमी झाल्या. दैनंदिन उत्पन्न एक लाखांपर्यंत तरी वाढले असते तर कंत्राटदाराची बिले देणे शक्य झाले असते पण तसे न झाल्याने कंत्राटदाराच्या बिलांची थकबाकी वाढत गेली. सध्या तीन कोटींच्या आसपास ही रक्कम पोहोचली असून कंत्राटदाराला काम करणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार