शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

देखभाल दुरुस्ती कंत्राटाचा आज फैसला; परिवहन समितीच्या भूमिकेकडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:41 IST

अपेक्षित उत्पन्न न वाढल्याचा ठपका

कल्याण : वार्षिक देखभाल दुरुस्ती कंत्राटाचे (एएमसी) तीन कोटी रुपयांचे बील केडीएमटीकडून थकल्याने कंत्राटदार काम करण्यास इच्छुक नाही. त्यामुळे त्याने कंत्राट बंद करण्यासंदर्भात केडीएमटीला आगाऊ नोटीस दिली आहे. मात्र, कंत्राट देऊनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही, असा ठपका उपक्रमाने ठेवला आहे. दरम्यान कंत्राट सुरू ठेवायचे की नाही? त्याचबरोबर कंत्राटदाराच्या थकीत बिलांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत उपक्रमाने प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत समिती कोणती भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे.

केडीएमटीने जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या १०८ बस व पूर्वीच्या टाटा मेक २० मोठ्या बस, अशा एकूण १२८ बसच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट मे. डिझेल कमर्शियल कॉर्पाेरेशन यांना दिले आहे. तीन वर्षांसाठी दिलेले हे कंत्राट १ मार्च २०१९ पासून सुरू झाले. यात वाहक स्वत:चे आणि चालक कंत्राटदारातर्फे उपलब्ध करून या बस मार्गावर चालविण्यास सुरुवात झाली होती. कंत्राटदाराला १२८ बसपैकी सुस्थितीतील ९५ बस दुरुस्तीसाठी उपक्रमाकडून दिल्या गेल्या होत्या. त्याचा लाभ प्रारंभी उपक्रमाला झाला. परंतु, त्यानंतर मात्र अपेक्षित उत्पन्न वाढले नाही, असे उपक्रमाचे म्हणणे आहे. बसच्या दुरुस्तीसाठी पुरेसा तांत्रिक कर्मचारी कंत्राटदाराकडून उपलब्ध नसणे, सुट्या भागांचा अभाव, बसचे ब्रेकडाउन होण्याचे वाढते प्रमाण आदी कारणांमुळे मार्गावरील फेऱ्या पूर्ण होत नसल्याने प्रवाशांमध्ये घट झाली आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर झाल्याकडे उपक्रमाने लक्ष वेधले आहे.

दरम्यान, कंत्राट सुरू होऊन सहा महिने उलटले असून, उपक्रमाने कंत्राटदाराची बिले अदा केलेली नाहीत. त्यात एएमसी अंतर्गत दुरुस्तीसाठी बºयाचशा बस उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत कंत्राट ३० नोव्हेंबरपासून बंद करण्याचे पत्र मे. डिझेल कमर्शियल कॉर्पाेरेशनने उपक्रमाला दिले आहे. यावर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंत्राट बंद न करता सुरू ठेवणेबाबत उपक्रमाने कंत्राटदाराला कळविले आहे. परंतु, कंत्राटदाराचे पत्र पाहता मध्यंतरी सभापती मनोज चौधरी यांनी गणेशघाट आगारात विशेष बैठक घेऊन यापुढे देखभाल दुरुस्ती उपक्रमातील कर्मचाऱ्यांकडून करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंत्राट बंद झाल्यावर पुढचे नियोजन कसे करायचे यासंदर्भात चौधरी यांनी ही बैठक घेतली होती. त्यामुळे शुक्रवारी होणाºया समितीच्या सभेत सभापतींसह अन्य सदस्य एएमसी कंत्राटसंदर्भात कोणता निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाहतूक कोंडीही प्रवासी घटण्याला कारणीभूत

पत्रीपूल आणि दुर्गाडी पुलावर होणाºया वाहतूककोंडीमुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याचे उपक्रमाचे म्हणणे आहे. जादा उत्पन्न मिळवून देणारे मार्ग म्हणून पनवेल, वाशी, मलंगगड आणि भिवंडी, याकडे पाहिले जाते. परंतु, वाहतूककोंडीमुळे या मार्गावर बसच्या फेºया कमी झाल्या. दैनंदिन उत्पन्न एक लाखांपर्यंत तरी वाढले असते तर कंत्राटदाराची बिले देणे शक्य झाले असते पण तसे न झाल्याने कंत्राटदाराच्या बिलांची थकबाकी वाढत गेली. सध्या तीन कोटींच्या आसपास ही रक्कम पोहोचली असून कंत्राटदाराला काम करणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार