शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

ISIS मध्ये भरती होण्यासाठी घर सोडून पळून गेलेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 09:34 IST

इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू झाला आहे. 2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होते.

ठळक मुद्देइसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होतेसीरियामध्ये लढत असताना फरहादचा मृत्यू झाला असून, लवकरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती फोनवर बोलणा-या व्यक्तीने दिली

कल्याण - इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू झाला आहे. 2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होते. फरहादचे वडिल तनवीर शेख यांनी मंगळवारी संध्याकाळी एका अज्ञात नंबरवरुन फोन आला होता. यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांना तुमचा मुलगा आता जिवंत नाही असं सांगितलं. संभाषणाची सुरुवात समोरच्या व्यक्तीने आधी इंग्रजीत केली, नंतर हिंदीत बोलण्यास सुरुवात केली अशी माहिती तनवीर शेख यांनी दिली आहे. सीरियामध्ये लढत असताना फरहादचा मृत्यू झाला असून, लवकरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती फोनवर बोलणा-या व्यक्तीने दिली. 

'यापुढे मी सहन करु शकत नसल्याने, मी फोन पत्नीकडे दिला', असं तनवीर यांनी सांगितलं. 'फोनवर बोलणा-या व्यक्तीने आपली ओळख उघड केली नाही. फोन करण्यासाठी त्याने इंटरनेट प्रोटोकॉल क्रमांकाचा वापर केला होता', अशी माहिती तनीवर यांनी दिली आहे.

2014 मध्ये चौघे तरुण बेपत्ता झाल्यापासून तपास करणा-या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकासोबत (एटीएस) ही माहिती शेअर करण्यात आली आहे. 'आम्ही आमचा फोन क्रमांकही एनआयएला दिला आहे जेणेकरुन सीरिया किंवा इराकमधील भारतीय अधिका-यांशी बातचीत केल्यानंतर मिळालेली माहिती ते आमच्यापर्यंत पोहचवू शकतील', असं तनवीर शेख बोलले आहेत. अधिका-यांकडून माहितीला दुजोरा मिळाल्यानंतरच फरहादवर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आहे. 

ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे की, 'फरहाद बेपत्ता झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आलेल्या बाजारपेठ पोलीस ठाण्यातच तनवीर शेख यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आम्ही आधीच एनआयए आणि एटीएसला यासंबंधी कळवलं आहे'.

नोव्हेंबर 2014 रोजी अमन नदीम तांडेल याच्या कुटुंबियांनाही अशाच प्रकारे एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन मृत्यू झाल्याचं कळवलं होतं. इसीसच्या एका व्हिडीओत अमन दिसला होता, ज्यामध्ये तो गुजरात, काश्मीर आणि मुझफ्परनगरमधील मुस्लिमांच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी देत होता. 

यानंतर जानेवारी 2015 मध्ये साहिन टंकीच्या खास मित्राला अज्ञात कॉलरकडून त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. 2014 मध्ये टंकीने बेपत्ता झालेल्यांपैकी एक अरीब माजिदच्या कुटुंबियांना फोन करुन सीरियामध्ये अरीब शहीद झाल्याचं सांगितलं होतं. पण नंतर ही माहिती खोटी असल्याचं स्पष्ट झालं होतं. दोन महिन्यानंतर अरीब माजिदने स्वत:ची सुटका करुन घेत इसीसच्या तावडीतून पळ काढला आणि तुर्कीश अधिका-यांसमोर आत्मसमर्पण केलं. नंतर एनआयएने त्याला अटक केली. 

टॅग्स :ISISइसिसTerrorismदहशतवादkalyanकल्याण