शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

ISIS मध्ये भरती होण्यासाठी घर सोडून पळून गेलेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 09:34 IST

इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू झाला आहे. 2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होते.

ठळक मुद्देइसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होतेसीरियामध्ये लढत असताना फरहादचा मृत्यू झाला असून, लवकरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती फोनवर बोलणा-या व्यक्तीने दिली

कल्याण - इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू झाला आहे. 2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होते. फरहादचे वडिल तनवीर शेख यांनी मंगळवारी संध्याकाळी एका अज्ञात नंबरवरुन फोन आला होता. यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांना तुमचा मुलगा आता जिवंत नाही असं सांगितलं. संभाषणाची सुरुवात समोरच्या व्यक्तीने आधी इंग्रजीत केली, नंतर हिंदीत बोलण्यास सुरुवात केली अशी माहिती तनवीर शेख यांनी दिली आहे. सीरियामध्ये लढत असताना फरहादचा मृत्यू झाला असून, लवकरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती फोनवर बोलणा-या व्यक्तीने दिली. 

'यापुढे मी सहन करु शकत नसल्याने, मी फोन पत्नीकडे दिला', असं तनवीर यांनी सांगितलं. 'फोनवर बोलणा-या व्यक्तीने आपली ओळख उघड केली नाही. फोन करण्यासाठी त्याने इंटरनेट प्रोटोकॉल क्रमांकाचा वापर केला होता', अशी माहिती तनीवर यांनी दिली आहे.

2014 मध्ये चौघे तरुण बेपत्ता झाल्यापासून तपास करणा-या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकासोबत (एटीएस) ही माहिती शेअर करण्यात आली आहे. 'आम्ही आमचा फोन क्रमांकही एनआयएला दिला आहे जेणेकरुन सीरिया किंवा इराकमधील भारतीय अधिका-यांशी बातचीत केल्यानंतर मिळालेली माहिती ते आमच्यापर्यंत पोहचवू शकतील', असं तनवीर शेख बोलले आहेत. अधिका-यांकडून माहितीला दुजोरा मिळाल्यानंतरच फरहादवर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आहे. 

ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे की, 'फरहाद बेपत्ता झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आलेल्या बाजारपेठ पोलीस ठाण्यातच तनवीर शेख यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आम्ही आधीच एनआयए आणि एटीएसला यासंबंधी कळवलं आहे'.

नोव्हेंबर 2014 रोजी अमन नदीम तांडेल याच्या कुटुंबियांनाही अशाच प्रकारे एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन मृत्यू झाल्याचं कळवलं होतं. इसीसच्या एका व्हिडीओत अमन दिसला होता, ज्यामध्ये तो गुजरात, काश्मीर आणि मुझफ्परनगरमधील मुस्लिमांच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी देत होता. 

यानंतर जानेवारी 2015 मध्ये साहिन टंकीच्या खास मित्राला अज्ञात कॉलरकडून त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. 2014 मध्ये टंकीने बेपत्ता झालेल्यांपैकी एक अरीब माजिदच्या कुटुंबियांना फोन करुन सीरियामध्ये अरीब शहीद झाल्याचं सांगितलं होतं. पण नंतर ही माहिती खोटी असल्याचं स्पष्ट झालं होतं. दोन महिन्यानंतर अरीब माजिदने स्वत:ची सुटका करुन घेत इसीसच्या तावडीतून पळ काढला आणि तुर्कीश अधिका-यांसमोर आत्मसमर्पण केलं. नंतर एनआयएने त्याला अटक केली. 

टॅग्स :ISISइसिसTerrorismदहशतवादkalyanकल्याण