शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डेक्कन क्विनने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशाचा मृत्यु; प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 21:33 IST

रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रथमोपचाराची सोय करावी

डोंबिवली: पुणे रेल्वे स्थानकातुन नेहमी प्रमाणे सकाळी 7.15 वाजता सुटणारी पुणे मुंबई दख्खनची राणी (12124) लोणावळा रेल्वे स्थानकातुन सुटत असतानाच अचानक गाडीतील D2 डब्यातील अंदाजे ५० वर्ष वय असलेल्या डि. एम. जैन नामक प्रवाशास तीव्र ह्रदय विकाराचा झटका आला. त्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांनी गाडीची साखळी खेचुन गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु, गाडी काही थांबली नाही, म्हणुन प्रवाशांनी गाडीची साखळी खेचुनच ठेवली, गाडीची साखळी खेचुन ठेवल्यामुळे गाडी खंडाळा रेल्वे स्थानकात थांबली. परंतु, तोपर्यंत खुप उशिर झाला होता. 

ह्रदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या रेल्वे प्रवाशाने प्राण सोडले होते. सदर घटना गाडीतील प्रत्यक्षदर्शींनी आपल्या समोरच घडल्याचे कळविले. गाडीची साखळी लोणावळा रेल्वे स्थानकात खेचली होती. जर, त्याच क्षणी गाडी लोणावळा रेल्वे स्थानकात थांबवली गेली असती तर कदाचित प्रवाशाचे प्राण वाचले असते असेही गाडीतील काही प्रवाशांनी सांगितले. गाडीची साखळी खेचुन देखील गाडी थांबली नाही ह्याचा अर्थ गाड्यांची व्यवस्थित देखभाल दुरुस्ती योग्य प्रकारे होत नाही, देखभाल दुरुस्तीच्या केवळ तारखाच बदलल्या जातात असे वाटते किंवा साखळी खेचुनही गाडी थांबवायची नाही अशा सुचनाच गाडीच्या इंजिन चालकास तर दिल्या गेल्या नाहीत ना हे ही तपासणे गरजेचे आहे. कारण, कित्येक वेळा अडचणीच्या समयी गाडीची साखळी खेचुन देखील गाडी थांबत नाही असेही काही प्रवाशांचे म्हणणे आहे. 

वातानुकूलित डब्यांमध्ये जसे मदतनीस (Attendance) असतात त्याप्रमाणे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये देखील प्रथमोपचार करणारे मदतनीस हवेत. जेणेकरून प्रवासादरम्यान अशाप्रकारे गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर निदान एखाद्या प्रवाशाचे प्राण तरी वाचतील. तरी, मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या जिविताचा व सुरक्षेचा विचारविनिमय करुन योग्य ती उपाययोजना करावी. हि नम्र विनंती असल्याचे कर्जत प्रवासी संघटनेचे प्रभाकर गंगावणे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेPuneपुणेdombivaliडोंबिवलीDeathमृत्यूpassengerप्रवासी