शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

उड्डाणपुलाच्या उतारावरील नाल्याची उघडी जाळी वाहतुकीसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:10 PM

अंबरनाथमध्ये अपघाताची शक्यता; नाल्यावरील लोखंडी पट्टीचे काम निकृष्ट

- पंकज पाटील बदलापूर : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या उतारावर तयार केलेला नाला आता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यावर उड्डाणपूल आणि रस्ता यांच्या मध्यभागी हा नाला बांधण्यात आला आहे. या नाल्यावरील लोखंडी पट्टीचे काम निकृष्ट झाल्याने आता सर्व पट्टी निघाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे चाक या पट्टीमध्ये अडकत आहे. या नाल्याच्या कामाला वर्षही उलटत नाही, तोच नाला धोकादायक झाल्याने आता नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.हुतात्मा चौकातील रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यावर तो रस्ता उड्डाणपूल रस्त्याला जोडण्यात आला. पालिकेच्या अभियंत्यांच्या चुकीमुळे रस्त्याचा उतार जास्त करण्यात आला. त्यामुळे उड्डाणपूल आणि रस्ता यांच्यात खोल खड्डा निर्माण झाला. त्यातच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी नाला तयार करण्यात आला. सर्वाधिक वाहतूक ज्या रस्त्यावर सातत्याने होत असते, त्याच रस्त्यावर नाला तयार करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. आरसीसी नाला तयार करून त्यावर लोखंडी जाळी बसवण्यात आली. ती जाळी निकृष्ट असल्याने आता त्या नाल्यावरील लोखंडी जाळी आणि त्यावरील पट्टी निघाली आहे. अनेक ठिकाणी थेट लोखंडी पट्टी वाहनांच्या चाकांमध्ये अडकत आहेत. तर, काहींच्या थेट गाडीच्या बोनेटला अडकत आहे. या रस्त्यावरून मोठे वाहन गेल्यावर नाल्यावरील पट्टी वाहनाच्या दाबामुळे वर येत आहे, वर आलेली पट्टी ही लहान गाड्यांमध्ये अडकत आहे. अनेक दुचाकीस्वारांना त्याचा फटका सहन करावा लागला आहे. नाल्यावरील लोखंडी रॉड आणि त्यावरील पट्टी ही एका वर्षातच धोकादायक झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली जात आहे.दुसरीकडे या नाल्याच्या दोन्ही बाजूला निर्माण झालेला उतार कमी करण्यासाठी पुन्हा काँक्रिटचे काम करण्याची गरज व्यक्त होत आहे. अनावश्यक असा उतार तयार केल्याने उड्डाणपुलाला जोडणारा रस्ता हा धोकादायक बनला आहे. यासंदर्भात आधीच तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीकडे पालिकेने दुर्लक्ष केले. रस्त्याचे काम करतानाच त्याची कल्पना नागरिकांनी दिली होती. पालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने उड्डाणपुलाचा रस्ता धोकादायक झाला आहे. अवघ्या २० मीटरच्या रस्त्याचा उतार चुकल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.संबंधित नाल्यावरील पट्टीची दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. नाल्यावरील पट्टी दुरुस्त करण्यायोग्य नसल्यास ती बदलण्यात येईल.- देविदास पवार, मुख्याधिकारी

टॅग्स :Accidentअपघात