शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

धोकादायकमधील रहिवासी वाऱ्यावर

By admin | Updated: March 18, 2017 03:54 IST

अनधिकृत आणि धोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची गरज नसल्याचे नव्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आल्याने त्याचा फटका रहिवाशांना

ठाणे : अनधिकृत आणि धोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची गरज नसल्याचे नव्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आल्याने त्याचा फटका रहिवाशांना बसणार आहे. या निर्णयामुळे एप्रिल-मे महिन्यात पाडण्यात येणाऱ्या इमारतीतील रहिवासी वाऱ्यावर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांच्यात खळबळ उडाली आहे.मुंब्य्रातील शीळफाटा येथील लकी कम्पाउंड दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाल्याने अनधिकृतसोबतच धोकादायक इमारतींचा प्रश्नही चर्चेत आला. अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी नगरविकास विभागातील अपर मुख्य सचिवांची समिती स्थापन केली होती. तिने विविध उपाययोजना सुचवतानाच अनधिकृत इमारत धोकादायक झाल्यास त्यामधील रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची महापालिकेची जबाबदारी नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या इमारती पावसाळ््यापूर्वी धोकादायक ठरवून रिकाम्या केल्या जातील किंवा पाडल्या जातील, त्यातील रहिवाशांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. अनधिकृत इमारतीमधून रहिवाशांना बाहेर काढल्यानंतर त्यांना महापालिकेचे कोणतेही हमीपत्र मिळणार नसल्याने त्यांचा राहत्या घरावरील ताबाही जाईल. त्यामुले महापालिकेकडून सध्या सुरू असलेल्या सर्व्हेत शेकडो इमारती अतिधोकादायक ठरण्याची शक्यता आहे. पावसाळ््यात धोका होऊ नये, म्हणून या इमारती पाडल्या जाण्याचीच दाट शक्यता आहे. तशी तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या समितीने धोकादायक इमारतीची वर्गवारी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढून ती इमारत तोडण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारच्या सौम्य धोरणाचा फायदा घेऊन काही बांधकाम व्यावसायिकांकडून अनधिकृत इमारतींमध्ये रहिवाशांना घुसवले जाते. अशा प्रकारे रहिवासी राहत असले तरी त्या हयगय न करता अशा इमारतीही तोडण्याची सूचना करण्यात आली आहे. महापालिकांनी आपली जबाबदारी न झटकता नियमानुसार बांधण्यात आलेल्या इमारतीची यादी महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. त्या यादीत नसलेल्या इमारती आपोआपच बेकायदा ठरतील. ते पाहता परीक्षा संपताच हा मुद्दा शहरात तापण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी) इमारतींची संख्या यंदा वाढण्याची चिन्हे- ठाण्यात गेल्या वर्षी केलेल्या सर्व्हेत सुमारे ८९ इमारती या अतिधोकादायक होत्या. त्या गेल्या वर्षभरात महापालिकेकडून पाडण्यात आल्या आहेत. परंतु, नव्याने आता सर्व्हे सुरू करण्यात आला असून यामध्ये यंदा धोकादायक इमारतीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. - अनेक इमारती कोसळण्याच्या बेतात असतानाही जीवावर उदार होऊन रहिवासी येथे राहत असतात. पर्यायी जागा नसल्याने तसेच मालकी हक्क जाऊ नये, यासाठी हा प्रयत्न असतो. परंतु, आता या इमारतीवर कारवाई करण्यास महापालिकेकडून तत्काळ पुढाकार घेतला जाणार असल्याने शेकडो रहिवाशांसमोर त्यांच्या राहत्या घराचा प्रश्न उभा राहणार आहे.- दरम्यान, ठाणे महापालिकेच्या परिसरातील धोकादायक इमारतीचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार, प्रभागानुसार या संबंधित इमारतीवर कारवाई केली जाणार आहे. या रहिवाशांना कोणतीही पर्यायी व्यवस्था दिली जाणार नाही. - तसेच जीवितहानी टाळणे, हे प्रमुख लक्ष्य असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. एखाद्या इमारतीवर कारवाईचा निर्णय झाल्यानंतर संबंधित इमारत तोडण्याचा निर्णय तत्काळ अमलात आणला जाणार आहे.