शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

भिवंडीतील कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील धोकादायक इमारत कोसळली, सुदैवाने जिवीतहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:47 PM

भिवंडी: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील दोन मजली इमारत काल रात्री दरम्यान कोसळली.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.या घटनेने ग्रामिण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यालगत कारीवली ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या संख्येने अनाधिकृत बांधकाम झाले असून अनेक बांधकामे निकृष्ट दर्जाच्या बनलेली आहेत. भिवंडी-वसई ...

ठळक मुद्देकारीवली ग्रामपंचायत हद्दीतील व्यावसायीक इमारत कोसळलीग्रामिण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवरकामगार इमारतीबाहेर पडल्याने प्राणहानी नाही

भिवंडी: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील दोन मजली इमारत काल रात्री दरम्यान कोसळली.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.या घटनेने ग्रामिण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यालगत कारीवली ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या संख्येने अनाधिकृत बांधकाम झाले असून अनेक बांधकामे निकृष्ट दर्जाच्या बनलेली आहेत. भिवंडी-वसई रोडवरील बहात्तर गाळ्याजवळ जे.व्ही.सी. कंपाऊण्ड येथील प्रियांका कॉम्प्लेक्स या निकृष्ट बांधकाम असलेल्या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील कामगारांना काल मंगळवार रोजी सकाळपासून भिंतीवरील प्लास्टर सुटून माती पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी आपल्या कारखाना मालकांना सांगून ते इमारतीतील गोदाम व कारखान्याच्या इमारतीबाहेर पडले. ही इमारत रेवाभाई मेहता या विकासकाने बनवून त्यामधील व्यावसायीक व गोदामांची विक्री केली,अशी माहिती सिध्देश शहा या कारखानदाराने दिली. इमारत कमकुवत झाल्याची तक्रार गाळेधारक व व्यावसाईक यांनी विकासकडे करूनही त्यांनी दखल घेतली नाही. गेली चार दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने काल मंगळवारी दिवसभर पाणी व माती इमारतीमध्ये पडू लागले होती. त्यामुळे सदर इमारत धोकादायक झाल्याने इमारतीतील व्यावसायीकांनी काल रात्री भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीसांनी सुरू असलेल्या पावसात कमकुवत झालेल्या इमारतीची पहाणी केली असता त्यांच्या समोर इमारतीचा काही भाग ढासळला. या घटनेची माहिती पोलीसांनी पालिकेच्या आपत्कालीन विभाग व आग्निशामक दलास माहिती दिली. दरम्यान इमारतीचा बरासचा भाग सुरू असलेल्या पावसामुळे काल रात्रीदरम्यान कोसळला असून कोणतीही प्राणहानी झाली नाही. सदर इमारतीच्या कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसून इमारतीचा उरलेले धोकादायक बांधकाम आपत्ती व्यवस्थापनाकडून तोडला जाणार आहे,अशी माहिती कारखानदारांनी दिली.

टॅग्स :BhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना