शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

तौत्के वादळ सोमवारी धडकण्याच्या शक्यतेने भाईंदरच्या उत्तन किनारपट्टीवर धोक्याची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 16:54 IST

समुद्रात घोंगावत असलेले तौक्ते चक्रीवादळाचा भाईंदरच्या उत्तन - पाली - चौक ह्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्याना  फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे

मीरारोड - समुद्रात घोंगावत असलेले तौक्ते चक्रीवादळाचा भाईंदरच्या उत्तन - पाली - चौक ह्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्याना  फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे . महापालिका ,  पोलीस व महसूल प्रशासन आपत्ती निवारणासाठी सज्ज झाले आहे . तर उत्तनची एक मच्छीमार बोट समुद्रात अडकली आहे . 

समुद्रात  निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ मुळे शनिवार पासूनच ढगाळ पावसाळी  वातावरण आहे . शनिवारी रात्री पाऊस व वाऱ्याने हजेरी लावली . वाऱ्याच्या जोरा मुळे भाईंदर व मीरारोड भागात ३ झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत . उत्तन , पाली व चौक ह्या समुद्र किनारी असलेल्या कोळीवाड्याना वादळाचा तडाखा बसणार अशी शक्यता आहे . वादळी वाऱ्याच्या अनुषंगाने ह्या भागातील झाडांच्या फांद्यांची महापालिकेने छाटणी केली आहे .

 मच्छीमार आणि नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे . समुद्र किनाऱ्यावरच्या मच्छीमारांना घरे रिकामी करून नातलगांच्या घरी तूर्तास आसरा घेण्यास सांगितले आहे . पत्र्याची तुरळक घरे असली तरी त्यांना वादळाने पत्रे उडून जीवित वा वित्त हानी होऊ नये ह्यासाठी खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत .  

अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी प्रशांत कापडे व तलाठी यांनी उत्तन परिसराचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना चालवल्या आहेत . किनारपट्टी वरील तीन चर्चच्या आवारातील सभागृह  केंद्र सुरु करण्यात आली आहेत . महापालिकेने अग्निशमन दलास तैनात केले असून तीन रुग्णवाहिका , अग्निशामक वाहने , जेसीबी तसेच आपत्ती व्यवस्थापनाची वाहने - यंत्र साहित्य सज्ज ठेवले आहे . नागरिकांना हलवण्यासाठी परिवहन सेवेच्या २ बस ठेवण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी सुद्धा नागरिकांना धोक्याच्या सूचना सातत्याने देऊन सतर्क  आवाहन केले आहे . पोलीस पथके सतत गस्त घालत आहेत असे पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी सांगितले . समुद्रात गेलेल्या सर्वच मच्छीमार बोटी किनाऱ्यावर सुरखरूप आल्या असून पाली येथील न्यू हेल्प मेरी हि मच्छीमार बोट मात्र समुद्रात अडकली आहे.

डायमंड मिरांडा यांच्या मच्छीमार बोटीवर त्यांचा मुलगा जस्टिन हा नाखवा असून खलाशी सह एकूण ९ जण बोटीवर आहेत . शनिवारी सकाळी ८ वाजता किनाऱ्यावरील  कुटुंबियांशी जस्टिन यांनी संपर्क केला होता . परंतु त्या नंतर रविवारी दुपार पर्यंत संपर्कच न झाल्याने चिंतेचे वातावरण होते. पोलीस आणि मच्छिमार नेत्यांनी या प्रकरणी तटरक्षक दलास  त्या बोट व त्यावरील ९ जणांचा शोध घेण्याची विनंती करण्यात आली.

त्यानंतर तटरक्षक दलाने समुद्रात बेपत्ता बोटीचा शोध सुरु केला . मात्र रविवारी दुपारी समुद्रातील ओएनजीसीच्या एका बंद रिंग वर बोटीने   घेतल्याचे समजले आणि सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला . बोट रिंग ला बांधून बोटीवरील सर्व ९ जणांना हेलिकॉप्टरने आणण्याचे प्रयत्न चालले होते असे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो म्हणाले. तौक्ते वादळ सोमवारी सकाळी जास्त वेगाने उत्तन भागात धडकण्याची शक्यता आहे . रविवारी रात्री पासूनच वादळाचा तडाखा बसण्याची चिन्हे आहेत . त्यामुळे महसूल , पोलीस व पालिका प्रशासन आधी पासूनच ह्या भागात तैनात झाले आहे. कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळcycloneचक्रीवादळ