शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जेमतेम चार महिन्यांतच डांगे यांची झाली बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 01:12 IST

लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींमुळे मंगळवारी त्यांची तडकाफडकी बदली केली गेली, अशी चर्चा आहे. आयुक्तपदी सनदी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती केली आहे.

धीरज परब मीरा रोड : अवघ्या चार महिन्यांपूर्वी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या चंद्रकांत डांगे यांच्या विरोधात काही लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींमुळे मंगळवारी त्यांची तडकाफडकी बदली केली गेली, अशी चर्चा आहे. आयुक्तपदी सनदी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती केली आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. राज्यात भाजप सत्तेत असताना तत्कालीन आ. नरेंद्र मेहता हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मर्जीतला आयुक्त मिळावा म्हणून शिफारस करीत. पण मर्जीतला आयुक्त मिळाला नाही की त्याच्या विरोधात मोहीम उघडत. डॉ. नरेश गीते यांनी दबाव झुगारल्याने त्यांना मेहता व स्थानिक भाजपचा विरोध सहन करावा लागला होता. तब्बल १६ महिने तग धरल्यावर गीतेंची बदली झाली व बी. जी. पवार आले. ते तीन महिनेही राहिले नाहीत. त्यांच्या जागी मेहतांच्या मर्जीतले बालाजी खतगावकर आले. परंतु मेहता आणि त्यांच्या कंपनीच्या वादांमुळे खतगावकर चांगलेच गोत्यात आले. भाजपची राज्यातील सत्ता गेल्यावर फेब्रुवारीमध्ये खतगावकरही गेले आणि १५ फेब्रुवारी रोजी डांगे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांचे जवळचे आयुक्त म्हणून डांगे यांची चर्चा झाली.डांगे यांनी पालिकेत येताच मेहतांना धक्के देण्यास सुरुवात केली. झंकार कंपनी समोरील बेकायदा गाळे पाडायला लावल्यानंतर मेहतांच्या घर योजनेतील वाढीव बेकायदा बांधकामावरही कारवाईचा बडगा उगारला. पण न्यायालयाने स्थगिती दिल्याने कारवाई थांबली.पालिका कारभारातही डांगे हे मेहता व समर्थकांचा हस्तक्षेप खपवून घेत नव्हते. पालिकेतील सत्ताधारी भाजपशी दोन हात करताना डांगे यांना शिवसेना नेतृत्वाची व स्थानिक लोकप्रतिनिधींची साथ मिळवता आली नाही, अशी चर्चा आहे.आ. प्रताप सरनाईक यांनी डांगे यांच्यावर मनमानी कारभारासह लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचे आरोप लेखी पत्राद्वारे केले होते.पालिकेतील आयुक्त आपल्या मर्जीतला हवा यावरुन शिवसेनेतील दोन दिग्गज नेत्यांमध्ये सुप्त स्पर्धा असल्याची चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात सुरु होती. एका विकासकाला टीडीआर देण्याच्या प्रकरणावरुन वाद वाढल्याचेही बोलले जात होते.>‘अनलॉक १’ नंतर कोरोनाबाधितांची शहरात वाढली संख्याडांगे यांची फेब्रुवारीत नियुक्ती झाली व मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. परंतु ‘अनलॉक १’नंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन अपयशी ठरल्याची झोड उठू लागली.त्यातच मंगळवारी अचानक महापालिका आयुक्तपदी डॉ. विजय राठोड यांची नियुक्तीची घोषणा केली गेली. डॉ. राठोड यांना त्वरित आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगितले आहे.डॉ. राठोड हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते. ते थेट सनदी अधिकारी असून पालिका आयुक्तपदी झालेली ही त्यांची दुसरी नियुक्ती असल्याचे सांगण्यात आले.>चंद्रकांत डांगे यांच्या बदलीचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्याबद्दल वाद नव्हता. सनदी अधिकारी द्या अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यांच्या बदलीशी संबंध नाही. कोरोनाच्या संसर्ग वाढल्याने बदली केली असावी. नवीन आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे. शहराला कोरोनापासून मुक्त करावे.- आ. प्रताप सरनाईक, शिवसेना

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक