शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जिल्हह्यातील २८० हेक्टरवरील फळबांगाचे नुकसान

By सुरेश लोखंडे | Updated: March 21, 2023 19:37 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वारा सुटत आहे. यास अनुसरून मंगळवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान ...

ठाणे: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वारा सुटत आहे. यास अनुसरून मंगळवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याभरातील २७३ हेक्टरवरील फळपिकांसह सात हेक्टरवरील बागायती आदी तब्बल २८० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शासनाच्या अर्थ सहाय्याची अपेक्षा आहे.

सततच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील वादळीवारा व पाऊस पडत आहे. आज सकाळी सरासरी ७.६० मिमी पाऊस जिल्ह्यात पडला. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात १२ मिमी, तर या खालोखाल अंबरनाथला ९.४० मिमी,कल्याण, उल्हासनगरला प्रत्येकी पाच मिमी. शहपूरला व मुरबाडला प्रत्येकी एक मिमी पाऊस पडला आहे. आजच्या या पावसासह काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८८५ शेतकऱ्यांच्या २८० हेक्टरवरील आंब्यासह फळबागांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आलेली आहे. यानुकसानीमुळे तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचा आंदाज व्यक्त केला जात आहे. या अवकाळी पावसामुळे अचानक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांच्यात चिंततेचे वातावरण तयार झाले आहे. या नुकसानीस अनुसरून शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

या अवकाळी पावसामुळे जिल्हह्यातील कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील ७.४० हेक्टर बागायतीचे नुकसा झाले आहे. याचा ४९ शेतकºयांना फटका बसला आहे. यामध्ये कल्याणच्या एका शेतकºयांचे शेतीचे नुकसान झाले. तर अंबरनाथमधील ४८ शेतकऱ्यांच्या सात हेक्टरमधील बागायतीचे नुकसान झाले आहे. ३३ टक्केपेक्षा या शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तर आंब्या सारख्या फळपिकाखाली २७३ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या या ८३६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. भिवंडीच्या ३१६ शेतकऱ्यांचे सर्वाधिक ११७ हेक्टरचे नुकसान नोंद झाले आहे. तर मुरबाडच्या १७३ शेतकऱ्यांचे ४३.४० हेक्टर, अंबरनाथ तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांचे ५३ हेक्टर, शहापूरच्या १८९ शेतकऱ्यांचे ५३.४२ हेकटरवरील नुकसानीची व मीरा भाईंदरच्या एका शेतकऱ्याचे तीन हेक्टरवरील फळबागाच्या नुकसानीची नोंद घेण्यात आलेली आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस