शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जिल्हह्यातील २८० हेक्टरवरील फळबांगाचे नुकसान

By सुरेश लोखंडे | Updated: March 21, 2023 19:37 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वारा सुटत आहे. यास अनुसरून मंगळवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान ...

ठाणे: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वारा सुटत आहे. यास अनुसरून मंगळवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याभरातील २७३ हेक्टरवरील फळपिकांसह सात हेक्टरवरील बागायती आदी तब्बल २८० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शासनाच्या अर्थ सहाय्याची अपेक्षा आहे.

सततच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील वादळीवारा व पाऊस पडत आहे. आज सकाळी सरासरी ७.६० मिमी पाऊस जिल्ह्यात पडला. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात १२ मिमी, तर या खालोखाल अंबरनाथला ९.४० मिमी,कल्याण, उल्हासनगरला प्रत्येकी पाच मिमी. शहपूरला व मुरबाडला प्रत्येकी एक मिमी पाऊस पडला आहे. आजच्या या पावसासह काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८८५ शेतकऱ्यांच्या २८० हेक्टरवरील आंब्यासह फळबागांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आलेली आहे. यानुकसानीमुळे तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचा आंदाज व्यक्त केला जात आहे. या अवकाळी पावसामुळे अचानक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांच्यात चिंततेचे वातावरण तयार झाले आहे. या नुकसानीस अनुसरून शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

या अवकाळी पावसामुळे जिल्हह्यातील कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील ७.४० हेक्टर बागायतीचे नुकसा झाले आहे. याचा ४९ शेतकºयांना फटका बसला आहे. यामध्ये कल्याणच्या एका शेतकºयांचे शेतीचे नुकसान झाले. तर अंबरनाथमधील ४८ शेतकऱ्यांच्या सात हेक्टरमधील बागायतीचे नुकसान झाले आहे. ३३ टक्केपेक्षा या शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तर आंब्या सारख्या फळपिकाखाली २७३ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या या ८३६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. भिवंडीच्या ३१६ शेतकऱ्यांचे सर्वाधिक ११७ हेक्टरचे नुकसान नोंद झाले आहे. तर मुरबाडच्या १७३ शेतकऱ्यांचे ४३.४० हेक्टर, अंबरनाथ तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांचे ५३ हेक्टर, शहापूरच्या १८९ शेतकऱ्यांचे ५३.४२ हेकटरवरील नुकसानीची व मीरा भाईंदरच्या एका शेतकऱ्याचे तीन हेक्टरवरील फळबागाच्या नुकसानीची नोंद घेण्यात आलेली आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस