शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
Delhi Blast : "आम्ही गेट उघडला आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
4
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
5
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
8
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
9
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
10
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
11
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
12
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
13
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
14
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
15
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
16
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
17
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
18
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
19
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
20
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जिल्हह्यातील २८० हेक्टरवरील फळबांगाचे नुकसान

By सुरेश लोखंडे | Updated: March 21, 2023 19:37 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वारा सुटत आहे. यास अनुसरून मंगळवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान ...

ठाणे: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वारा सुटत आहे. यास अनुसरून मंगळवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याभरातील २७३ हेक्टरवरील फळपिकांसह सात हेक्टरवरील बागायती आदी तब्बल २८० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शासनाच्या अर्थ सहाय्याची अपेक्षा आहे.

सततच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील वादळीवारा व पाऊस पडत आहे. आज सकाळी सरासरी ७.६० मिमी पाऊस जिल्ह्यात पडला. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात १२ मिमी, तर या खालोखाल अंबरनाथला ९.४० मिमी,कल्याण, उल्हासनगरला प्रत्येकी पाच मिमी. शहपूरला व मुरबाडला प्रत्येकी एक मिमी पाऊस पडला आहे. आजच्या या पावसासह काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८८५ शेतकऱ्यांच्या २८० हेक्टरवरील आंब्यासह फळबागांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आलेली आहे. यानुकसानीमुळे तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचा आंदाज व्यक्त केला जात आहे. या अवकाळी पावसामुळे अचानक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांच्यात चिंततेचे वातावरण तयार झाले आहे. या नुकसानीस अनुसरून शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

या अवकाळी पावसामुळे जिल्हह्यातील कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील ७.४० हेक्टर बागायतीचे नुकसा झाले आहे. याचा ४९ शेतकºयांना फटका बसला आहे. यामध्ये कल्याणच्या एका शेतकºयांचे शेतीचे नुकसान झाले. तर अंबरनाथमधील ४८ शेतकऱ्यांच्या सात हेक्टरमधील बागायतीचे नुकसान झाले आहे. ३३ टक्केपेक्षा या शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तर आंब्या सारख्या फळपिकाखाली २७३ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या या ८३६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. भिवंडीच्या ३१६ शेतकऱ्यांचे सर्वाधिक ११७ हेक्टरचे नुकसान नोंद झाले आहे. तर मुरबाडच्या १७३ शेतकऱ्यांचे ४३.४० हेक्टर, अंबरनाथ तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांचे ५३ हेक्टर, शहापूरच्या १८९ शेतकऱ्यांचे ५३.४२ हेकटरवरील नुकसानीची व मीरा भाईंदरच्या एका शेतकऱ्याचे तीन हेक्टरवरील फळबागाच्या नुकसानीची नोंद घेण्यात आलेली आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस