शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

ठाणे जिल्ह्यातील ५६६ घरांसह २३८ हेक्टरवरील आंबा-काजू, भाजीपाल्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला. जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी रात्रभर झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला. जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी रात्रभर झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तिघांच्या मृत्यूसह आठजण गंभीर जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे तर ५६६ घरांचे कमीअधिक नुकसान झाले. २३८ हेक्टरवरील आंबा, काजू, भात आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊन गेल्या ४८ तासांत तब्बल १६४ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे.

चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी वेगाने वाहत होता. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या २४ तासांत सरासरी ५३ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सात शाळांचे काहीअंशी नुकसान होऊन सात घरांचे पूर्णपणे नुकसान झाले. ५५९ घरांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान होऊन त्यावरील पत्रे उडाले, काही घरांच्या भिंती पडल्या, तर काहींना तडे गेले आहेत. घरांच्या या नुकसानीचा फटका तब्बल एक हजार ३०० रहिवाशांना बसला आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी २२ विजेचे खांब पडले आहेत. यापैकी शहापूरला १५ व कल्याणला सात खांब पडले. याशिवाय ९४३ झाडे ठिकठिकाणी उन्मळून पडले आहेत. यामध्ये अंबरनाथला सर्वाधिक २९३ झाडांचा समावेश आहे. ठाण्यातील २७९ झाडं, मीरा भाईंदरमधील १२७, उल्हासनगरमधील १२२, कल्याणमधील ७६, भिवंडीतील २८ आणि शहापूरच्या १२ झाडांना चक्रीवादळाने उपटून काढले. या व्यतिरिक्त हजारो झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यादरम्यान तिघांच्या मृत्यूसह आठजण गंभीर जखमी झाले. यापैकी सहाजण ठाणे शहरातील असून, भिवंडी आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

--------