शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

सीएसआरचा ६ लाख शिक्षकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 23:24 IST

कोट्यवधीची वार्षिक उलाढाल असलेल्या बड्या उद्योजकांनी सामाजिक दायित्व जपण्यासाठी पुढे यावे आणि त्यांच्या नफ्याचा दोन टक्के भाग त्यांनी शालेय गुणवत्ता वाढीस खर्च करावा.

जान्हवी मोर्ये, ठाणेकोट्यवधीची वार्षिक उलाढाल असलेल्या बड्या उद्योजकांनी सामाजिक दायित्व जपण्यासाठी पुढे यावे आणि त्यांच्या नफ्याचा दोन टक्के भाग त्यांनी शालेय गुणवत्ता वाढीस खर्च करावा. त्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढून केलेल्या आवाहनाला उद्योजकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे एक लाख शाळांतील सहा लाख शिक्षकांना त्याचा लाभ होणार आहे. यात इन्फोसीस, अगस्त्या फाऊंडेशन, स्टेट बॅक आॅफ इंडिया, आयआयएम अहमदाबाद , रिलायन्स सारख्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यांनी शालेय गुणवत्ता वाढीसाठी कोट्यवधीचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिव रिना फणसेकर यांनी या संदर्भात ही माहिती दिली. राज्य सरकारने ९ जून २०१४ रोजी शालेय गुणवत्ता वाढीसाठी आवाहन केले. त्याला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.इन्फोसीस या आयटी कंपनीने अगस्त्या फाऊंडेशन या एनजीओ बरोबर सामंजस्यांचा करार केला आहे. तीन वर्षात ही कंपनी एक कोटीचा निधी शालेय गुणवत्ता वाढीवर खर्च करणार आहे. महाराष्ट्रातील सरकारी शाळांतील सुमारे १ हजार विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना बेंगलोर येथे इन्फोसीसच्या प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन विज्ञान विषय अधिक प्रभावीपणे कसा शिकवावा याचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे. स्टेट बॅक आॅफ इंडियाने १५०० चौरस फूटाच्या जागेत एक आदर्श प्रयोगशाळा उभारणार आहे. त्यासाठी अडीच कोटीचा निधी बँकेकडून दिला जाणार आहे. यासाठी देखील अगस्त्या फाऊंडेशन ही एनजीओ काम पाहणार आहे. तसेच आयआयएम अहमदाबाद सरकारी शाळांतील शिक्षकांना उत्कृष्ट व्यवस्थापन व आदर्श नोंदी कशा कराव्यात याबाबतचे प्रशिक्षण देणार आहे. शिक्षकांनी लावलेल्या नाविन्यपूर्ण शालेय प्रकल्पाचा शोध घेतला जाणार आहे. या शोधांचे सादरीकरण कसे करावे यांचे ही प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. राज्य व देशपातळीवरील नाविन्यपूर्ण शोध प्रकल्पांची एक ‘नॉलेज बँक’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाखांचा निधी वापरला जाणार आहे.रिलायन्स समूहदेखील १०० शाळांना इंटरनेटची सुविधा पुरविणार आहे. आतापर्यत विविध कंपन्यांनी एकूण चार कोटी रुपये शालेय गुणवत्ता वाढीवर खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास जातील. कारण कंपन्या बड्या आहेत. त्यांचे व्यवस्थापन उद्योग जगतात परफेक्ट आहे. त्यांच्याकडून कामगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम चालविले जातात. ते शैक्षणिक उपक्रमासाठीही परफेक्ट कार्यक्रम राबवितील, असा विश्वास फणसेकर यांनी व्यक्त केला. या उपक्र मातून जवळपास सहा लाख शिक्षक आणि एक लाखांहून अधिक शाळांना त्यांच्या गुणवत्ता वाढीस संधी मिळणार आहे. त्यासाठी सातारा येथील ग्राममंगल संस्थेने मनुष्यबळ पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय जेएसडब्ल्यू (जिंदाल ) उद्योगाला कोकणातील शालेय गुणवत्ता सुधारण्यात रस असल्याचा कल त्यांनी सरकारला कळविला आहे. शासनाच्या राज्यस्तरीय समितीतर्फे टाटा सारख्या बड्या उद्योगांना सीएसआरअंतर्गत योजनेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...समाप्त