शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

अंबरनाथ, बदलापूर रेल्वेस्थानकात नेहमीप्रमाणे गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:41 AM

अंबरनाथ, बदलापूर : संचारबंदी लागू असतानाही रेल्वे प्रशासनाला कोणतेही आदेश न आल्याने कोणताही कर्मचारी थेट रेल्वे प्रवास करीत ...

अंबरनाथ, बदलापूर : संचारबंदी लागू असतानाही रेल्वे प्रशासनाला कोणतेही आदेश न आल्याने कोणताही कर्मचारी थेट रेल्वे प्रवास करीत होता. अशा परिस्थितीत अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकात नेहमीप्रमाणेच गर्दी दिसत होती. संचारबंदीचा कोणताही परिणाम रेल्वेसेवेवर झाला नाही.

राज्य सरकारचे आदेश रेल्वे प्रशासनाला न आल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू केले नव्हते. सकाळी सहापासून नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ रेल्वेस्थानक परिसरात होती. हीच परिस्थिती बदलापूर रेल्वेस्थानकातही निर्माण झाली होती. एकही पोलीस कर्मचारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासत नव्हता. प्रत्येकासाठी रेल्वेस्थानकाचे मार्ग खुले होते. त्यामुळे रेल्वेस्थानक आणि लोकलमधील गर्दीवर संचारबंदीचा कोणताही परिणाम झाला नाही.

दुसरीकडे, रस्त्यावरील वाहतुकीवरही कोणताही परिणाम संचारबंदीचा झालेला दिसला नाही. बेशिस्तपणे नागरिक कसलीही पर्वा न करता आपली खासगी वाहने घेऊन घराबाहेर पडली होती. वाहनचालकांवर शिस्तीचा कोणताही परिणाम होत नसल्याने अखेर सकाळी १० वाजता अंबरनाथमधील सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि पूर्व भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे हे नाकाबंदीचे नियंत्रण करीत होते. प्रत्येक वाहनचालकांची विचारपूस करूनच त्यांना पुढे सोडले जात असल्याने काहीकाळ अंबरनाथ पश्चिम भागात वाहतूककोंडी झाली होती. मात्र, नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याची बाब समोर आली. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात भाजी मंडईमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ दिसत होती. त्या ठिकाणी कोणतेही नियम न पाळता भाजीविक्रेते व्यवसाय करीत होते.