शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

भिवंडीत मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; दीड लाखांचे १३ मोबाईल जप्त

By नितीन पंडित | Updated: April 20, 2024 16:50 IST

मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दीड लाखांचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले.

नितीन पंडित, भिवंडी: शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दीड लाखांचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.रिझवान उर्फ रिज्जो नबी इनामदार असे अटक आरोपीचे नाव आहे.

एका हॉटेलमध्ये टेबलावर राहिलेला मोबाईल चोरी केल्याची घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असता या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथक करीत असताना सीसीटिव्ही च्या माध्यमातून रिझवान उर्फ रिज्जो नबी इनामदार या संशयित मोबाईल चोरट्यास नवीबस्ती परिसरातून अटक केली.

त्याच्या कडे कडून तपास केला असता हॉटेल मधील मोबाईल चोरी सह वर्तक नगर पोलिस ठाणे हद्दीत २०२२ मध्ये केलेल्या घरफोडीतील १२ मोबाईल सुध्दा हस्तगत केले असून आरोपी कडून एकूण १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे १३ मोबाईल जप्त करण्यात यश मिळवले आहे.विशेष म्हणजे अटक केलेला गुन्हेगार रिझवान उर्फ रिज्जो नबी इनामदार यावर चोरी, जबरी चोरी अशा पद्धतीचे भिवंडी,ठाणे,कल्याण व मुंबई या परिसरात एकूण २१ गुन्ह्याची नोंद आहेत अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस