शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

धरणाचे पाणी दूषित करणाऱ्या कारखान्यांविरोधात गुन्हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 6:40 AM

बरनाथमधील अधिकारी कार्यालयातून प्रभागातदेखील येत नाहीत. अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्यानेच शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि चिखलोली धरणाच्या दूषित पाण्याबाबत नियोजन करण्यासाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी काढलेला अंबरनाथ दौरा चांगलाच गाजला. आढावा बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. तर, दुसरीकडे चिखलोली धरणाची पाहणी करण्यासाठी गेलेले मंत्री खोत यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना थेट कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.चिखलोली धरणाच्या पाण्यातील प्रदूषणाचे वाढलेले प्रमाण आणि अंबरनाथ पश्चिम भागात दूषित पाणी पिऊन अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची पाहणी करण्यासाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा योजनेची माहिती घेतली. तसेच चिखलोली धरणाची पाहणी केली. धरणात शेवाळाचे आणि रासायनिक द्रव्यांचे वाढलेले प्रमाण यामुळे या धरणातील पाणी नागरिकांसाठी धोकादायक आहे. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल आल्याने पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे.धरणातील प्रदूषणाबाबत ठोस निर्णय घेताना खोत यांनी अधिकाºयांना लागलीच कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. धरणाच्या पात्रात जे रासायनिक कारखाने आहेत, त्यांच्यावर लगेच गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले. तसेच हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी घेण्याचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आहेत. धरणाचा पाहणी दौरा संपल्यावर खोत यांनी दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्या रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर पाणीसमस्येवर तोडगा काढण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.स्वामी समर्थ सभागृहात झालेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाणीसमस्येवर बोलताना सर्वात आधी काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी शहरातील पाणीसमस्या नेमकी काय आहे, याची जाणीव खोत यांना करून दिली. पाणीसमस्येवर तोडगा काढण्यासाठी मंत्रीमहोदय हे मुंबईहून अंबरनाथला येतात. मात्र, अंबरनाथमधील अधिकारी कार्यालयातून प्रभागातदेखील येत नाहीत. अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्यानेच शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. २०१३ ची वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यालादेखील जीवन प्राधिकरणाचे स्थानिक अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकाºयांनी काही मोजक्या बांधकाम व्यावसायिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचे आणि त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या सर्व बाबींची माहिती घेतल्यावर खोत यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. यानंतर फुलेनगरमधून बबन तांबे, जावसईमधून वसंत पाटील, बुवापाडातून निखिल वाळेकर, मनोज सिंह, सुरेंद्र यादव, शशांक गायकवाड यांनीदेखील या परिसरातील पाणीसमस्येवर आपले मत व्यक्त केले. पूर्व भागातील गढूळ पाण्याबाबत नगरसेवक राजू शिर्के, सुभाष साळुंखे, अनिता भोईर, रागिनी पवार, रोहिणी भोईर यांनीदेखील आपल्या समस्या मांडल्या. समस्यांचा पडलेला पाऊस आणि अधिकाºयांविषयी निर्माण झालेली नाराजी पाहिल्यावर खोत यांनी यासंदर्भात लागलीच मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याचे आश्वासन दिले. तसेच अपूर्ण राहिलेली योजना पूर्ण करण्यासंदर्भात योग्य त्या कार्यवाहीचे आदेश दिले.बदलापुरातील काही बांधकाम व्यावसायिकांनीदेखील नव्या जोडणीबाबत अधिकाºयांना निवेदन दिले. बदलापुरात बांधकाम व्यावसायिकांना नवीन कनेक्शन देताना अडवणूक होत असल्याचा आरोप शंकर भोईर यांनी असून त्यावर मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Damधरण