शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कर्करोग निदानाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर - डॉ. अनिल हेरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 04:04 IST

दिवस सुरू झाला की, प्रत्येकालाच घड्याळाच्या काट्यावर धावावे लागते. प्रवासातील दगदग, खाण्यापिण्याची हेळसांड ही दिनचर्या बनली असून आरोग्याकडे लक्ष देण्यास कुणाकडेच वेळ नाही.

- मुरलीधर भवारकल्याण - दिवस सुरू झाला की, प्रत्येकालाच घड्याळाच्या काट्यावर धावावे लागते. प्रवासातील दगदग, खाण्यापिण्याची हेळसांड ही दिनचर्या बनली असून आरोग्याकडे लक्ष देण्यास कुणाकडेच वेळ नाही. धकाधकीच्या या आयुष्यात अनेक गंभीर आजारांना आपण जवळ करत आहोत. काही वर्षांपूर्वी क्वचित आढळणाऱ्या कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. देशात आजघडीला जवळपास १२ लाख कर्करुग्ण आहेत. कर्करोग निदानपद्धती प्रगत झाली असली, तरी ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही. त्यामुळे हा खर्च आवाक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत कर्करोगसर्जन डॉ. अनिल हेरूर यांनी व्यक्त केले.जागतिक कर्करोग दिन सोमवारी असून त्या पार्श्वभूमीवर डॉ. हेरूर यांनी सांगितले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी केवळ टाटा कर्करोग रुग्णालय आहे. कर्करोगावर तीन प्रकारे उपचार होतात. शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी हे उपचार आहेत. टाटा कर्करोग रुग्णालयात रेडिएशनसाठी केवळ चार मशीन आहेत. या रुग्णालयात वर्षाला ३२ ते ४० हजार कर्करुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णालयातील यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. तसेच कर्करोगग्रस्तांना रेडिएशन घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यांचा नंबर यावा लागतो. मुंबई उपनगरांचा विचार केला, तर मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत रेडिएशन उपचारासाठी एकही यंत्र नाही. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एक तरी रेडिएशन मशीन सरकारच्या आरोग्य विभागाने पुरवली पाहिजे. त्यामुळे कर्करुग्णांना टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही, असे डॉ. हेरूर म्हणाले.सरकारला ते शक्य नसल्यास आरोग्य क्षेत्रातील सेवाभावी सामाजिक संस्थांच्या मदतीने अशी मशीन खरेदी करावी. अन्यथा, सीएसआर फंडातून कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करून कर्करुग्णांना दिलासा द्यावा, अशी सूचनाही डॉ. हेरूर यांनी केली आहे.हेरूर म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोग हा कोणालाही होऊ शकतो. शहरी व ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येतात. महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण, तर पुरुषांमध्ये तोंड आणि फुफफुसाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. संपूर्ण भारताचा विचार केल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. वर्षाला दोन लाख ५० हजार कर्करुग्ण आढळून येत असून १५ टक्क्यांनी वाढले आहेत. कर्करोगाचे निदान वेळीच झाले, तर ९० टक्के कर्करुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होऊ शकते, असे डॉ. हेरूर यांनी सांगितले.व्यसन न केल्यास कर्करोग टाळणे शक्य !मद्य, तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने तोंड आणि आतड्याचा कर्करोग होतो. व्यसने टाळल्यास कर्करोग टाळता येऊ शकतो. अतिलठ्ठपणामुळे महिलांना स्तनांचा, तर पुरुषांना आतड्याचा कर्करोग होतो.अन्नभेसळीमुळे पित्ताशय, आतड्याचा कर्करोग होऊ शकतो. कर्करोग रोखण्यासाठी जनजागृती केली पाहिजे.त्याची लक्षणे समजावून सांगितली पाहिजेत. त्याचा योग्य प्रचार-प्रसार झाल्यास कर्करोगावर मात करणे शक्य आहे, असे मत डॉ. हेरूर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :cancerकर्करोगPuneपुणे