शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

coronavirus: मजूर गावाला गेल्याने धान्य गोदामातच, रेशनिंग दुकानांवर तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 02:16 IST

- अनिकेत घमंडी डोंबिवली : मे महिन्यातील तांदूळ आणि गहू घेण्यासाठी पूर्वेतील १०८ आणि पश्चिमेतील ५६ शिधावाटप दुकानांवर केशरी ...

- अनिकेत घमंडीडोंबिवली : मे महिन्यातील तांदूळ आणि गहू घेण्यासाठी पूर्वेतील १०८ आणि पश्चिमेतील ५६ शिधावाटप दुकानांवर केशरी कार्डधारक गर्दी करत आहेत. मात्र, धान्य मिळत नसल्याने काही ठिकाणी लाभार्थी आणि दुकानदारांमध्ये वादावादी होत आहे. ठिकठिकाणच्या गोदामांमध्ये धान्यसाठा मुबलक आला असला तरी तो शिधावाटप दुकानांपर्यंत पोहोचवण्यासाठी मजूरच नसल्याने सगळा घोळ निर्माण झाला आहे.पूर्वेत ४१ हजार ३०० आरसी तर, ३६ हजार ६०० केशरी कार्डधारक आहेत. त्या तुलनेत पश्चिमेत कमी लाभार्थी आहेत. पूर्वेकडील शिधावाटप अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉकडाउनच्या काळात लाभार्थ्यांपर्यंत धान्य देण्यासाठी सरकारच्या नियोजनानुसार ७३ ट्रक धान्य एप्रिलमध्ये आले. मे महिन्याचेही धान्य भिवंडी परिसरातील गोदामांमध्ये आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने धान्य वितरणाचा वेग पूर्व आणि पश्चिमेत मंदावला आहे. आतापर्यंत या महिन्याच्या सुरुवातीलाच जे धान्य यायला हवे होते, ते पूर्णपणे आलेले नाही. १३ मेपर्यंत ७३ पैकी २० ट्रक धान्य यायचे बाकी होते. केशरी कार्डधारकांना जे धान्य मिळणार होते त्यासाठीही ४२ ट्रक धान्य येणार होते, परंतु, ३१ ट्रक आतापर्यंत आले आहेत. चार दिवसांमध्ये ते धान्य येईल असे सांगितले जात असले तरी लाभार्थ्यांची समजूत घालताना दुकानचालकांच्या नाकीनऊ येत आहेत. परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल व सगळ्यांना धान्य मिळेल, याबाबतचे आदेशही संबंधितांना दिल्याचे सांगण्यात आले.उडवाउडवीची उत्तरेतुकारामनगर भागातील लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मंजूर असलेले धान्यही मिळत नसल्याने त्यांनी दुकानदाराकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी दाद कोणाकडे मागायची, असा सवाल नगरसेवक नितीन पाटील यांनी केला आहे. त्यासंदर्भात शिधावाटप अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे ते म्हणाले. तक्रार नोंदवण्यासाठी तक्रारवही मागितली असता दुकानदार टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली