शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

coronavirus: कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे भाईंदरमधील स्टील उद्योग चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 21:51 IST

coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रासह देशात कोरोनाने पुन्हा कहर माजवल्याने स्टील उद्योगावर अवलंबून असलेले व्यावसायिक व कामगार पुन्हा चिंतेत सापडले आहेत .

मीरारोड - भाईंदर मधील स्टील उद्योग हा देशभरात प्रसिद्ध आहे .  वर्षी कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा हळूहळू रुळावर येऊ पहात होता . परंतु महाराष्ट्रा सह देशात कोरोनाने पुन्हा कहर माजवल्याने स्टील उद्योगावर अवलंबून असलेले व्यावसायिक व कामगार पुन्हा चिंतेत सापडले आहेत . 

भाईंदर मधील स्टील उद्योग हा देशातील सर्वात मोठा स्टील उद्योग म्हणून ओळखला जात होता . परंतु मुंबईला लागून असल्याने वाढत्या शहरीकरणासह स्टील उद्योगाच्या वसाहतीं कडे पालिका व राजकारण्यांसह लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष चालवले . जेणे करून अनेक उद्योजक हे वसई व त्या पुढे थेट गुजरात पर्यंत स्थलांतरित झाले . 

भाईंदर मध्ये स्टीलची  पासून त्याचे बफिंग पोलीस करणे व त्याची घाऊक विक्री करणारे असे  सुमारे ३ हजार व्यावसायिक आहेत . ह्या स्टील व्यवसायात काम करणारे सुमारे २५ हजार कामगार आहेत . येथून देशभरात जाणाऱ्या स्टील भांड्यांच्या विक्री व्यवसायावर सुद्धा हजारो व्यापारी व कामगार अवलंबून आहेत . 

गेल्यावर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात स्टील उद्योग सुद्धा अडचणीत सापडला . लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांनी त्यांच्या कडील कामगारांना आपापल्या परीने  त्यांना शक्य तेवढा पगार दिला . त्यांना गावी जाण्यासाठी पैसे दिले . सप्टेंबर पासून पुन्हा व्यवसाय सुरु  झाल्या नंतर कामगारांना परत आणण्यासाठी सुद्धा पैसे दिले . 

कोरोना संसर्गाने स्टील व्यवसाय सुद्धा आर्थिक संकटात आणला . परंतु स्टील व्यापाऱ्यांनी आला व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले . हळूहळू तो रुळावर येत होता . लॉकडाऊन काळातले नुकसान भरून निघाले नसले तरी व्यवसाय पुन्हा सावरू लागला होता . 

 भाड्याने होते किंवा ज्यांच्या डोक्यावर कर्ज होते ते जास्त अडचणीत आले . दिलेल्या मालाची उधारी वसूल करणे सुद्धा अवघड झाले . ज्यांचे  होते त्यांना काहीसा दिलासा होता . पण व्यवसाय पूर्वपदावर येईल असे वाटत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने व्यावसायिक चिंतीत आहेत . त्यांच्या  पेक्षा जास्त चिंता रोजगार जाण्याच्या भीतीने कामगारांना सतावत आहे . 

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा निर्बंध आले आहेत . स्टील भांडी घेणारे देशभरातील व्यापारी सुद्धा लॉकडाउनच्या भीतीने माल उचलायला तयार नाहीत . तर माल दिल्यास त्याचे पैसे अडकले तर काय करायचे ? अशी चिंता उत्पादकांसह संबंधितांना लागली आहे . महाराष्ट्र शासनाने सरसकट लॉकडाऊन न करता सोमवार ते शुक्रवार व्यवसाय सुरु ठेऊन शनिवार आणि रविवार लॉकडाउनचा निर्णय घेतला तो स्वागताहार्य असल्याचे स्टील संघटनेचे राजेंद्र मित्तल म्हणाले . 

ReplyReply allForward

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसायMira Bhayanderमीरा-भाईंदर