शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

coronavirus: कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे भाईंदरमधील स्टील उद्योग चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 21:51 IST

coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रासह देशात कोरोनाने पुन्हा कहर माजवल्याने स्टील उद्योगावर अवलंबून असलेले व्यावसायिक व कामगार पुन्हा चिंतेत सापडले आहेत .

मीरारोड - भाईंदर मधील स्टील उद्योग हा देशभरात प्रसिद्ध आहे .  वर्षी कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा हळूहळू रुळावर येऊ पहात होता . परंतु महाराष्ट्रा सह देशात कोरोनाने पुन्हा कहर माजवल्याने स्टील उद्योगावर अवलंबून असलेले व्यावसायिक व कामगार पुन्हा चिंतेत सापडले आहेत . 

भाईंदर मधील स्टील उद्योग हा देशातील सर्वात मोठा स्टील उद्योग म्हणून ओळखला जात होता . परंतु मुंबईला लागून असल्याने वाढत्या शहरीकरणासह स्टील उद्योगाच्या वसाहतीं कडे पालिका व राजकारण्यांसह लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष चालवले . जेणे करून अनेक उद्योजक हे वसई व त्या पुढे थेट गुजरात पर्यंत स्थलांतरित झाले . 

भाईंदर मध्ये स्टीलची  पासून त्याचे बफिंग पोलीस करणे व त्याची घाऊक विक्री करणारे असे  सुमारे ३ हजार व्यावसायिक आहेत . ह्या स्टील व्यवसायात काम करणारे सुमारे २५ हजार कामगार आहेत . येथून देशभरात जाणाऱ्या स्टील भांड्यांच्या विक्री व्यवसायावर सुद्धा हजारो व्यापारी व कामगार अवलंबून आहेत . 

गेल्यावर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात स्टील उद्योग सुद्धा अडचणीत सापडला . लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांनी त्यांच्या कडील कामगारांना आपापल्या परीने  त्यांना शक्य तेवढा पगार दिला . त्यांना गावी जाण्यासाठी पैसे दिले . सप्टेंबर पासून पुन्हा व्यवसाय सुरु  झाल्या नंतर कामगारांना परत आणण्यासाठी सुद्धा पैसे दिले . 

कोरोना संसर्गाने स्टील व्यवसाय सुद्धा आर्थिक संकटात आणला . परंतु स्टील व्यापाऱ्यांनी आला व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले . हळूहळू तो रुळावर येत होता . लॉकडाऊन काळातले नुकसान भरून निघाले नसले तरी व्यवसाय पुन्हा सावरू लागला होता . 

 भाड्याने होते किंवा ज्यांच्या डोक्यावर कर्ज होते ते जास्त अडचणीत आले . दिलेल्या मालाची उधारी वसूल करणे सुद्धा अवघड झाले . ज्यांचे  होते त्यांना काहीसा दिलासा होता . पण व्यवसाय पूर्वपदावर येईल असे वाटत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने व्यावसायिक चिंतीत आहेत . त्यांच्या  पेक्षा जास्त चिंता रोजगार जाण्याच्या भीतीने कामगारांना सतावत आहे . 

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा निर्बंध आले आहेत . स्टील भांडी घेणारे देशभरातील व्यापारी सुद्धा लॉकडाउनच्या भीतीने माल उचलायला तयार नाहीत . तर माल दिल्यास त्याचे पैसे अडकले तर काय करायचे ? अशी चिंता उत्पादकांसह संबंधितांना लागली आहे . महाराष्ट्र शासनाने सरसकट लॉकडाऊन न करता सोमवार ते शुक्रवार व्यवसाय सुरु ठेऊन शनिवार आणि रविवार लॉकडाउनचा निर्णय घेतला तो स्वागताहार्य असल्याचे स्टील संघटनेचे राजेंद्र मित्तल म्हणाले . 

ReplyReply allForward

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसायMira Bhayanderमीरा-भाईंदर