शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

coronavirus : ...म्हणून मुंब्र्यातील नागरिकांवर जितेंद्र आव्हाड भडकले, सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 13:15 IST

प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही मुंब्र्यात गर्दी करण्याचे प्रकार कमी होत नसल्याने प्रशासना समोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

ठाणे :  शुक्रवारी मुंब्र्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि मुंब्रा-कळवा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड कमालीचे संतप्त झाले आहेत. मुंब्र्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याने ही धोक्याची घंटा असून 'अभी उपरवाला भी आपको बचा नाही सकेगा' असे खडेबोलच जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्याच्या नागरिकांना सुनावले आहे. गेले अनेक दिवस मी घराच्या बाहेर पडू नका असे वारंवार सांगत आहे, मात्र याचे कोणालाच गांभीर्य नसून अशाच प्रकारे जर मस्ती सुरु राहिली तर या शहराला कोणीही वाचवू शकणार नाही असे त्यांनी खडसावून सांगितले आहे.  ठाणे आणि कळवा परिसरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी,मुंब्र्यात परवापर्यंत एकही कोरोना रुग्ण अढळला नव्हता. मात्र शुक्रवारी मुंब्य्रातील अमृतनगर परिसरात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या कोरोनाचे काही दिल्ली कनेक्शन आहे का ? या दृष्टीने देखील तपास सुरु करण्यात आला आहे . मात्र प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही मुंब्र्यात गर्दी करण्याचे प्रकार कमी होत नसल्याने प्रशासना समोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्र्याच्या नागरिकांची एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये चांगलीच कानउघडणी केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून मी तुम्हाला सांगत होतो कि घराच्या बाहेर पडू नका,मात्र कोणीही ऐकले नाही. मी या गोष्टी बोलणार नव्हतो मात्र आज या गोष्टी बोलायची वेळ आली असे सांगत तुम्हालाच तुमच्या जीवाचे परवा नसेल तर इतर कोणाला काय पडली आहे असे त्यांनी सांगितले. या शहराची मला चिंता आहे , कळवा आणि मुंब्र्यातील नागरिकांची मला काळजी आहे मात्र तुम्हालाच तुमची काळजी नसेल तर उपरवाला भी तुम्हे माफ नाही करेगा या शब्दात आव्हाड यांनी मुंब्र्याच्या जनतेला सुनावले असून आता मुंब्र्याची जनता हे किती गांभीर्याने घेणार आहे हे येणार यावर साशंकता आहे .

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्राCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस