शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

coronavirus: ठाणे ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:40 IST

Thane coronavirus: ठाणे जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तो वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कंबर कसली.

ठाणे - दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून या आजारातून पूर्णपणे बरे होऊन स्वगृही परतणाऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत घट होत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या १८ हजारांच्या वर गेली असून, त्यापैकी १६ हजार ५६२ जण काेरोनामुक्त झाले आहेत. त्यात मागील आठ दिवसांत अवघ्या ९६ रुग्णांची भर पडली असून, एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून जिल्ह्याचे आरोग्य सुधारत असल्याचे दिसत आहे.ठाणे जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तो वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कंबर कसली. बाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली होती. मात्र, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागावरील ताण वाढला होता. अशा परिस्थितीतदेखील जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन रुग्णांचे जीव वाचविले. त्याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यात ऑक्टोबरच्या अखेरीस रुग्णांच्या संख्येत होणारी घट, रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण, रुग्णालयातील रिक्त खाटा यांच्या रूपात दिसून येत आहे.ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्यांतील ग्रामीण क्षेत्रात ३० नोव्हेंबरला १८ हजार १७६ इतकी रुग्णांची संख्या असून, त्यात आठ दिवसांत १६३ नवीन रुग्णांची भर पडल्याने बाधित रुग्णांची संख्या १८ हजार ३६३ वर पोहोचली आहे. तर, या कालावधीत या आजाराने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे