शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

coronavirus: प्रभाग समित्यांमधूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 03:21 IST

Thane coronavirus: ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रभाग समित्यांमधूनही आता रुग्णांची आकडेवारी घसरत आहे.

ठाणे : ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रभाग समित्यांमधूनही आता रुग्णांची आकडेवारी घसरत आहे. एवढेच काय, जवळजवळ सहा महिन्यांपासून रुग्णसंख्येत आघाडीवर असलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतही रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, मागील सात दिवसांत या प्रभाग समितीमध्ये ३५४ रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत सर्वात कमी १९ रुग्ण मुंब्रा प्रभाग समितीत आढळले आहेत.शहरात कोरोनाची सुरुवात मार्चपासून झाली. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी आता ३०८ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९४.९५ टक्के झाले असून, मृत्युदरही कमी झाला आहे. शहरात आजच्या घडीला प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १,४४९ एवढी असून, आतापर्यंत ४६ हजार २ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १,१९६ रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाने झोपडपट्टी भागात शिरकाव केल्याने त्याला रोखायचे कसे, असा पेच निर्माण झाला होता, परंतु मुंब्य्राने यात प्रथम बाजी मारली. या भागात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या विविध उपाययोजनांमुळे कमी झाली. त्यामुळे संपूर्ण ठाण्यात मुंब्रा पॅर्टनची चर्चा होऊ लागली. त्याच वेळी लोकमान्यनगर आणि वागळे येथील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांमध्येही कोरोनाने शिरकाव केला. सोबतच माजिवडा मानपाडा, वर्तकनगर, कळवा, नौपाडा कोपरी, दिवा आदी भागांतील झोपडपट्ट्यांतही कोरोनाने शिरकाव केला. पालिकेच्या उपाययाेजनांमुळे झोपडपट्ट्यांतूनही कोरोना हळूहळू हद्दपार होत आहे. घरोघरी जाऊन तपासणी केल्याने फायदाठाणे : ठाण्यातील झोपडपट्टी भागांमध्ये सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची वाढती संख्या महापालिकेसाठी तापदायक ठरत होती. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पालिकेने एका रुग्णामागे ४५ जणांना क्वारंटाइन करण्यास सुरुवात केली, तसेच या भागातील घराघरात जाऊन प्रत्येकाची तपासणी करण्यासाठी ताप क्लिनिक सुरू करण्यात आले. त्यामुळे हळूहळू का होईना, झोपडपट्टी भागांतून कोरोना हद्दपार होताना दिसत आहे. पूर्वी कळवा, लोकमान्यनगर आणि वागळे इस्टेटमध्ये ७० ते १०० रुग्ण दिवसाला आढळून येत होते. जवळपास असेच प्रमाण माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतही होते, परंतु आता या भागांमध्ये नव्याने रुग्ण आढळण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. पूर्वी येथे ८० ते १०० रुग्ण रोज आढळत होते. आता हे प्रमाण दिवसाकाठी केवळ १५ ते २० रूग्णांवर आले आहे. त्यामुळे पालिकेनेही काहीसा सुस्कारा सोडला आहे. मुंब्य्रात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. माजिवडा मानपाडा भागातही नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून, कळव्यालाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे