शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

coronavirus:हाताला काम नाही, खायलाही पैसे नाहीत! मुंबईत राहून करणार काय? पायी गाव गाठणाऱ्या मजुरांची उद्विग्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 02:29 IST

मुंबईतील शेकडो मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा गटा- गटाने पायीच परराज्यातील गाव गाठण्यासाठी प्रवास करीत आहेत. मुंबई ते उत्तर प्रदेश या सुमारे १५०० किलोमीटरच्या प्रवासाला किती काळ लागेल, हे माहिती नाही.

- जितेंद्र कालेकर  ठाणे -  हाताला काम नाही आणि दोन वेळचे खायलाही पैसे नाहीत... मग मुंबईत राहून करायचे काय? यदाकदाचित कोरोनासारखा आजार झालाच तर निदान आमच्या कुटुंबासमोर गावी मरण आले तरी चालेल, अशी उद्वीग्नता मुंबईतून ठाणेमार्गे पायीच उत्तरप्रदेशातील गाव गाठण्यासाठी निघालेल्या एका गटाने ‘लोकमत’जवळ शनिवारी रात्री व्यक्त केली.मुंबईतील शेकडो मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा गटा- गटाने पायीच परराज्यातील गाव गाठण्यासाठी प्रवास करीत आहेत. मुंबई ते उत्तर प्रदेश या सुमारे १५०० किलोमीटरच्या प्रवासाला किती काळ लागेल, हे माहिती नाही. पण, इथे होणाºया हालअपेष्टांपेक्षा पायी जाऊन, थोडे हाल आणखी सोसून आपले मूळ गाव गाठू, असे या मजुरांचे म्हणणे आहे. लिफ्टच्या फिटिंगचे काम करणारा राजू गौतम (२४, रा. मानखूर्द, मुंबई) हा त्यांच्यापैकीच एक. त्याचाच आणखी एक नातलग कप्तान गौतम (२४) हा पत्नी आशादेवी (२२) तसेच संध्या (३) आणि अंशू (२) ही दोन मुले आणि मनिषकुमार (२२) या भावासह हा प्रवास करीत आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे हाताला काम नाही. त्यात जवळचे सर्व पैसे संपले आहेत. काम शोधण्यासाठी बाहेर पडलो, तर पोलिसांचा मार खावा लागला, राजू आपली कैफियत मांडत होता. संसर्ग झालाच तर इथे मरण्यापेक्षा, तिकडे जाऊन आजाराशी लढा देत कुटूंबियांजवळ मरण आले तरी चालेल, असे मत कप्तान याने व्यक्त केले.एक दोन किलोचे धान्य सुरुवातीला काही दिवस काही सामाजिक संस्थांकडून मिळाले, पण त्यावरही किती दिवस काढणार? असाही प्रश्न आहे. गावीच काहीतरी कामधंदा करु, अशी भावना या कुटुंबियांनी व्यक्त केली.ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन मार्गावरुन नाशिकच्या दिशेने जाणाºया आणखी एका गटातील फुले रावत (२६, रा. रे रोड, मुळ रा. इटावा, उत्तर प्रदेश) म्हणाला, गेल्या दहा वर्षांपासून मुंबईत राहतो.मुंबईत कपड्याच्या मार्केटींगचे तो काम करतो. दोन महिने गावाहून पैसे मागवून आणि कर्ज काढून दिवस काढले. आता मिळकत काहीच नाही. मग जगणार कसे, असा त्याचा प्रश्न आहे. सूरजकुमार (३५, रा. दारुखाना, मुंबई, मूळ गोंडा (उत्तरप्रदेश) हा दहा वर्षांपासून टॅक्सी चालवितो. तो ७ मेपासून पायीच घराबाहेर पडला.सूरजकुमार तिवारी याच्यासह रामसुरेश तिवारी, उमाकांत तिवारी, रामदेव शुक्ला, हणमंतलाल तिवारी, शिवनाथ तिवारी अशा सहा जणांच्या गटाने प्रवास करीत आहेत.रोज १५ ते २० किलोमीटर प्रवासानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मार्गस्थ व्हायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे. केंद्र आणि राज्य शासनाने किमान लहान मुले, महिला आणि अपंग यांच्याकडे पाहून तरी आमच्या घरी जाण्यासाठी सुटसुटीत नियम करावेत.रीतसर गावी जाण्यासाठी शिवडी पोलिसांकडेही अर्ज केला. पण, जाचक नियमांमुळे काही उपयोग झाला नाही. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनेही या मजुरांना विनाअट स्वीकारले पाहिजे, अशीही माफक अपेक्षा या मजुरांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे