शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

coronavirus:हाताला काम नाही, खायलाही पैसे नाहीत! मुंबईत राहून करणार काय? पायी गाव गाठणाऱ्या मजुरांची उद्विग्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 02:29 IST

मुंबईतील शेकडो मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा गटा- गटाने पायीच परराज्यातील गाव गाठण्यासाठी प्रवास करीत आहेत. मुंबई ते उत्तर प्रदेश या सुमारे १५०० किलोमीटरच्या प्रवासाला किती काळ लागेल, हे माहिती नाही.

- जितेंद्र कालेकर  ठाणे -  हाताला काम नाही आणि दोन वेळचे खायलाही पैसे नाहीत... मग मुंबईत राहून करायचे काय? यदाकदाचित कोरोनासारखा आजार झालाच तर निदान आमच्या कुटुंबासमोर गावी मरण आले तरी चालेल, अशी उद्वीग्नता मुंबईतून ठाणेमार्गे पायीच उत्तरप्रदेशातील गाव गाठण्यासाठी निघालेल्या एका गटाने ‘लोकमत’जवळ शनिवारी रात्री व्यक्त केली.मुंबईतील शेकडो मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा गटा- गटाने पायीच परराज्यातील गाव गाठण्यासाठी प्रवास करीत आहेत. मुंबई ते उत्तर प्रदेश या सुमारे १५०० किलोमीटरच्या प्रवासाला किती काळ लागेल, हे माहिती नाही. पण, इथे होणाºया हालअपेष्टांपेक्षा पायी जाऊन, थोडे हाल आणखी सोसून आपले मूळ गाव गाठू, असे या मजुरांचे म्हणणे आहे. लिफ्टच्या फिटिंगचे काम करणारा राजू गौतम (२४, रा. मानखूर्द, मुंबई) हा त्यांच्यापैकीच एक. त्याचाच आणखी एक नातलग कप्तान गौतम (२४) हा पत्नी आशादेवी (२२) तसेच संध्या (३) आणि अंशू (२) ही दोन मुले आणि मनिषकुमार (२२) या भावासह हा प्रवास करीत आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे हाताला काम नाही. त्यात जवळचे सर्व पैसे संपले आहेत. काम शोधण्यासाठी बाहेर पडलो, तर पोलिसांचा मार खावा लागला, राजू आपली कैफियत मांडत होता. संसर्ग झालाच तर इथे मरण्यापेक्षा, तिकडे जाऊन आजाराशी लढा देत कुटूंबियांजवळ मरण आले तरी चालेल, असे मत कप्तान याने व्यक्त केले.एक दोन किलोचे धान्य सुरुवातीला काही दिवस काही सामाजिक संस्थांकडून मिळाले, पण त्यावरही किती दिवस काढणार? असाही प्रश्न आहे. गावीच काहीतरी कामधंदा करु, अशी भावना या कुटुंबियांनी व्यक्त केली.ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन मार्गावरुन नाशिकच्या दिशेने जाणाºया आणखी एका गटातील फुले रावत (२६, रा. रे रोड, मुळ रा. इटावा, उत्तर प्रदेश) म्हणाला, गेल्या दहा वर्षांपासून मुंबईत राहतो.मुंबईत कपड्याच्या मार्केटींगचे तो काम करतो. दोन महिने गावाहून पैसे मागवून आणि कर्ज काढून दिवस काढले. आता मिळकत काहीच नाही. मग जगणार कसे, असा त्याचा प्रश्न आहे. सूरजकुमार (३५, रा. दारुखाना, मुंबई, मूळ गोंडा (उत्तरप्रदेश) हा दहा वर्षांपासून टॅक्सी चालवितो. तो ७ मेपासून पायीच घराबाहेर पडला.सूरजकुमार तिवारी याच्यासह रामसुरेश तिवारी, उमाकांत तिवारी, रामदेव शुक्ला, हणमंतलाल तिवारी, शिवनाथ तिवारी अशा सहा जणांच्या गटाने प्रवास करीत आहेत.रोज १५ ते २० किलोमीटर प्रवासानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मार्गस्थ व्हायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे. केंद्र आणि राज्य शासनाने किमान लहान मुले, महिला आणि अपंग यांच्याकडे पाहून तरी आमच्या घरी जाण्यासाठी सुटसुटीत नियम करावेत.रीतसर गावी जाण्यासाठी शिवडी पोलिसांकडेही अर्ज केला. पण, जाचक नियमांमुळे काही उपयोग झाला नाही. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनेही या मजुरांना विनाअट स्वीकारले पाहिजे, अशीही माफक अपेक्षा या मजुरांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे