शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : शिवसेना-भाजपच्या अपयशाची शिक्षा लोकांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 00:15 IST

या शहरातील वैद्यकीय व्यवस्था सक्षम करण्यात येथील लोकप्रतिनिधींना यश आले असते तर लॉकडाऊनच्या आड लपण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया या दोन्ही शहरांतील नागरिक व्यक्त करीत आहेत.

प्रशांत माने कल्याण : कल्याण-डोंबिवली या शहरांतील १७ लाखांच्या लोकसंख्येकरिता गेल्या २० वर्षांत पाच ते दहा हजार बेडचे सुसज्ज इस्पितळ उभारण्यात अपयशी ठरलेले सर्वपक्षीय नेते कोरोना वाढत असल्याचे निमित्त करुन लॉकडाऊनची भाषा करीत असून आयुक्तांच्या गळ््यात निर्णयाचे घोंगडे अडकवत आहेत. या शहरातील वैद्यकीय व्यवस्था सक्षम करण्यात येथील लोकप्रतिनिधींना यश आले असते तर लॉकडाऊनच्या आड लपण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया या दोन्ही शहरांतील नागरिक व्यक्त करीत आहेत.कोरोनाच्या महामारीत परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत असताना केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रूग्णांना बेडही मिळू नये ही शरमेची बाब आहे. एकीकडे खाजगी रूग्णालयांकडून लूट सुरू असताना दुसरीकडे महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये उपचारासाठी धाव घेणाऱ्या रूग्णांचे उपचाराअभावी बळी जात आहेत. महापालिकेत २० वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगणाºया शिवसेना आणि भाजप बरोबरच विरोधी पक्षांचेही हे अपयश आहे. गेल्या काही वर्षात कल्याण- डोंबिवली क्षेत्रातील १७ लाख लोकसंख्येसाठी एखादे मोठे सरकारी रूग्णालय ते उभारु शकले नाहीत. हे अपयश झाकण्यासाठीच येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची भाषा करून आयुक्तांवर दबाव आणत आहेत. लॉकडाऊन हा पर्याय नाही. केवळ पुढील महापालिका निवडणुका डोळ््यासमोर ठेवून आपले अपयश झाकण्यासाठीच लॉकडाऊनची मागणी करून अपयशाचे खापर प्रशासनावर फोडण्याची खेळी लोकप्रतिनिधींनी खेळली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.केडीएमसीची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर अशी दोन मोठी रूग्णालये तर १३ आरोग्य केंद्रासह चार छोटी रूग्णालये आहेत. सद्यस्थितीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रीनगर रूग्णालय कोविड रूग्णालय म्हणून चालविले जात आहे. आरोग्य केंद्रांमध्ये तापाचे दवाखाने सुरु आहेत. आधीच आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची वानवा असताना कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी बहुतांश कर्मचारी वर्ग दिला आहे. त्यामुळे रुक्मिणीबाई रूग्णालयावर ताण पडला आहे. आजच्याघडीला शास्त्रीनगर रूग्णालयात बेडची संख्या ६२ आहे तर रुक्मिणीबाई रुग्णालयात १२० बेड असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. व्हेंटिलेटर सुविधा असल्याचे सांगितले जात असले तरी शास्त्रीनगर रूग्णालयात अतिदक्षता विभागाची सुविधा नाही.लॉकडाऊनचा निर्णय आयुक्तांच्या गळ््यात घालून लोकप्रतिनिधी मोकळे झाले आहेत. आयुक्तांना आपल्या सेवापुस्तिकेत लाल शेरा नको असल्याने ते लोकप्रतिनिधींची मागणी अमलात आणून मोकळे होतील. मात्र त्याची शिक्षा ही सर्वसामान्यांना मिळणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. खासदारांनी वेळोवेळी रूग्णालयांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन ती सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या सूचना अंमलबजावणीअभावी कागदावरच राहिल्या आहेत. परंतु या सर्व अपयशाची शिक्षा लॉकडाऊन करुन नागरिकांना का देणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.>आनंदीबाई जोशींचावारसा कसला सांगता?कल्याणमधील आनंदीबाई जोशी या देशातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. त्याचा सार्थ अभिमान असल्याचे आपण सांगतो. पण, त्यांच्याच शहरात महापालिकेचे एखादे मोठे सुसज्ज रूग्णालय नाही, ही सत्ताधाºयांबरोबरच विरोधी पक्षांसाठीही लाजिरवाणी बाब आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्य केंद्रांमध्ये तापाचे दवाखाने सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस