शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

CoronaVirus News : ठाण्यात 800 हून अधिक मृत्यू कोरोनामुळे, किरीट सोमय्या यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 19:17 IST

CoronaVirus News : शुक्रवारी सोमय्या यांनी मुंब्य्रातील कब्रस्थानची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे , गटनेते संजय वाघुले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देठाकरे सरकार कोरोनाचे मृत्यू लपवित असल्याचा आरोप किरीट सोमय्या केला. ठाण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 800 हून अधिक मृत्यू झाले असून ही माहिती लपवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ठाणे  : कोरोनामुळे (कोविड-19) मृत्यूचे प्रमाण मोठ्या गतीने वाढत आहे. कब्रस्थानमधील जागा देखील कमी होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकाराने कब्रस्थानसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार अन्य जी काही ठिकाणे असतील त्याठिकाणी जागा वाढविली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. 

ठाकरे सरकार कोरोनाचे मृत्यू लपवित असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर मुंब्य्रात लॉकडाऊनच्या कालावधीत 953 मृत्यू झाले असून त्यातील 400 हून अधिक मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचा धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. तर ठाण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 800 हून अधिक मृत्यू झाले असून ही माहिती लपवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शुक्रवारी सोमय्या यांनी मुंब्य्रातील कब्रस्थानची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे , गटनेते संजय वाघुले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. येथील एका कब्रस्थानमध्येच आतापर्यंत 142 मृतदेह दफन करण्यात आले आहेत. परंतु पालिका प्रशासन म्हणते कोरोनामुळे केवळ 277 मृत्यू झाले आहेत. परंतु ही आकडय़ांची लपवा लपवी कशासाठी केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

केवळ ठाकरे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबईत ज्या प्रकारे सुरवातीला 2200 मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात तेथे 4400 मृत्यू झाल्याचे आता मान्य केले जात आहे. तीच परिस्थिती ठाण्यात देखील असून मृत्यूची संख्या लपविली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका आकडे लपवित असल्याने नागरीक बाहेर पडत असून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दफनभूमीची क्षमता संपूनही मुंब्य्रातील मंत्री गप्प : निरंजन डावखरेकोरोनाच्या संसर्गाने वाढत्या मृत्युमुळे मुंब्रा-कौसा येथील चार दफनभूमीपैंकी दोनची क्षमता संपली आहे. आणखी महिनाभरात दोन दफनभूमींमध्ये जागा राहणार नाही. त्यानंतर दफनविधी कुठे करायचे हा प्रश्न आहे. मात्र, या विषयावर मुंब्रावासियांचे प्रतिनिधीत्व करणारे मंत्री महोदय गप्प का आहेत, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या प्रश्नावर राज्य सरकार व महापालिकेवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे. मुंब्रावासियांसाठी तत्काळ दफनविधीसाठी मोठी जागा राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी डावखरे यांनी केली.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस