शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

CoronaVirus News : ठाण्यात 800 हून अधिक मृत्यू कोरोनामुळे, किरीट सोमय्या यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 19:17 IST

CoronaVirus News : शुक्रवारी सोमय्या यांनी मुंब्य्रातील कब्रस्थानची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे , गटनेते संजय वाघुले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देठाकरे सरकार कोरोनाचे मृत्यू लपवित असल्याचा आरोप किरीट सोमय्या केला. ठाण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 800 हून अधिक मृत्यू झाले असून ही माहिती लपवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ठाणे  : कोरोनामुळे (कोविड-19) मृत्यूचे प्रमाण मोठ्या गतीने वाढत आहे. कब्रस्थानमधील जागा देखील कमी होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकाराने कब्रस्थानसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार अन्य जी काही ठिकाणे असतील त्याठिकाणी जागा वाढविली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. 

ठाकरे सरकार कोरोनाचे मृत्यू लपवित असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर मुंब्य्रात लॉकडाऊनच्या कालावधीत 953 मृत्यू झाले असून त्यातील 400 हून अधिक मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचा धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. तर ठाण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 800 हून अधिक मृत्यू झाले असून ही माहिती लपवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शुक्रवारी सोमय्या यांनी मुंब्य्रातील कब्रस्थानची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे , गटनेते संजय वाघुले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. येथील एका कब्रस्थानमध्येच आतापर्यंत 142 मृतदेह दफन करण्यात आले आहेत. परंतु पालिका प्रशासन म्हणते कोरोनामुळे केवळ 277 मृत्यू झाले आहेत. परंतु ही आकडय़ांची लपवा लपवी कशासाठी केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

केवळ ठाकरे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबईत ज्या प्रकारे सुरवातीला 2200 मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात तेथे 4400 मृत्यू झाल्याचे आता मान्य केले जात आहे. तीच परिस्थिती ठाण्यात देखील असून मृत्यूची संख्या लपविली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका आकडे लपवित असल्याने नागरीक बाहेर पडत असून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दफनभूमीची क्षमता संपूनही मुंब्य्रातील मंत्री गप्प : निरंजन डावखरेकोरोनाच्या संसर्गाने वाढत्या मृत्युमुळे मुंब्रा-कौसा येथील चार दफनभूमीपैंकी दोनची क्षमता संपली आहे. आणखी महिनाभरात दोन दफनभूमींमध्ये जागा राहणार नाही. त्यानंतर दफनविधी कुठे करायचे हा प्रश्न आहे. मात्र, या विषयावर मुंब्रावासियांचे प्रतिनिधीत्व करणारे मंत्री महोदय गप्प का आहेत, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या प्रश्नावर राज्य सरकार व महापालिकेवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे. मुंब्रावासियांसाठी तत्काळ दफनविधीसाठी मोठी जागा राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी डावखरे यांनी केली.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस