शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : लॉकडाऊनचा अद्याप विचार नाही, आयुक्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 00:22 IST

CoronaVirus News : यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता अद्याप तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी पुन्हा १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन घ्या, अशी मागणी पालकमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत आमदारांनी केली होती. हा निर्णय आयुक्त घेतील, असा अंगुलीनिर्देश केला होता. यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता अद्याप तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.२४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर करणे हे काम पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासनाचे होते. तीन महिन्यांत काटेकोर पालन न झाल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार २०० पेक्षा जास्त झाली आहे. चार दिवसांत ९०० रुग्ण वाढले. लॉकडाऊन संपल्यावर अनलॉक-१ सुरू झाले. मात्र, कोरोना रुग्ण वाढत असल्याने ते रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची मागणी आमदारांनी पालकमंत्र्यांकडे केली. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांत शक्य झाले नाही, ते १५ दिवसांत काय शक्य होणार? १५ दिवसांत संपूर्ण आरोग्य यंत्रणा पुढील वाढणाऱ्या रुग्णांसाठी पुरी पडू शकते का, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.नागरिकांच्या मनातील भावनेला ‘लोकमत’च्या हॅलो ठाणे पुरवणीत स्थान मिळाले. ‘खबरदार लॉकडाऊन कराल तर’ या ठळक मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेकांनी याविषयी जोरदार चर्चा केली. लोकमत नेहमीच जनतेच्या बाजूने असल्याचे या बातमीतून पुन्हा स्पष्ट झाले. त्यामुळेच प्रशासनाला विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे, असे आयुक्तांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. अनलॉकमध्ये ज्या अटी-शर्ती घालून दिलेल्या आहेत, त्यांचेही काटेकोर पालन झाल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस