शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

CoronaVirus News : लॉकडाऊनचा अद्याप विचार नाही, आयुक्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 00:22 IST

CoronaVirus News : यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता अद्याप तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी पुन्हा १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन घ्या, अशी मागणी पालकमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत आमदारांनी केली होती. हा निर्णय आयुक्त घेतील, असा अंगुलीनिर्देश केला होता. यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता अद्याप तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.२४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर करणे हे काम पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासनाचे होते. तीन महिन्यांत काटेकोर पालन न झाल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार २०० पेक्षा जास्त झाली आहे. चार दिवसांत ९०० रुग्ण वाढले. लॉकडाऊन संपल्यावर अनलॉक-१ सुरू झाले. मात्र, कोरोना रुग्ण वाढत असल्याने ते रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची मागणी आमदारांनी पालकमंत्र्यांकडे केली. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांत शक्य झाले नाही, ते १५ दिवसांत काय शक्य होणार? १५ दिवसांत संपूर्ण आरोग्य यंत्रणा पुढील वाढणाऱ्या रुग्णांसाठी पुरी पडू शकते का, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.नागरिकांच्या मनातील भावनेला ‘लोकमत’च्या हॅलो ठाणे पुरवणीत स्थान मिळाले. ‘खबरदार लॉकडाऊन कराल तर’ या ठळक मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेकांनी याविषयी जोरदार चर्चा केली. लोकमत नेहमीच जनतेच्या बाजूने असल्याचे या बातमीतून पुन्हा स्पष्ट झाले. त्यामुळेच प्रशासनाला विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे, असे आयुक्तांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. अनलॉकमध्ये ज्या अटी-शर्ती घालून दिलेल्या आहेत, त्यांचेही काटेकोर पालन झाल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस