शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

CoronaVirus News : लॉकडाऊनचा अद्याप विचार नाही, आयुक्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 00:22 IST

CoronaVirus News : यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता अद्याप तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी पुन्हा १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन घ्या, अशी मागणी पालकमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत आमदारांनी केली होती. हा निर्णय आयुक्त घेतील, असा अंगुलीनिर्देश केला होता. यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता अद्याप तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.२४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर करणे हे काम पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासनाचे होते. तीन महिन्यांत काटेकोर पालन न झाल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार २०० पेक्षा जास्त झाली आहे. चार दिवसांत ९०० रुग्ण वाढले. लॉकडाऊन संपल्यावर अनलॉक-१ सुरू झाले. मात्र, कोरोना रुग्ण वाढत असल्याने ते रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची मागणी आमदारांनी पालकमंत्र्यांकडे केली. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांत शक्य झाले नाही, ते १५ दिवसांत काय शक्य होणार? १५ दिवसांत संपूर्ण आरोग्य यंत्रणा पुढील वाढणाऱ्या रुग्णांसाठी पुरी पडू शकते का, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.नागरिकांच्या मनातील भावनेला ‘लोकमत’च्या हॅलो ठाणे पुरवणीत स्थान मिळाले. ‘खबरदार लॉकडाऊन कराल तर’ या ठळक मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेकांनी याविषयी जोरदार चर्चा केली. लोकमत नेहमीच जनतेच्या बाजूने असल्याचे या बातमीतून पुन्हा स्पष्ट झाले. त्यामुळेच प्रशासनाला विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे, असे आयुक्तांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. अनलॉकमध्ये ज्या अटी-शर्ती घालून दिलेल्या आहेत, त्यांचेही काटेकोर पालन झाल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस