शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: सकस आहाराच्या सेवनामुळे आदिवासी कोरोनापासून कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:33 IST

सेंद्रिय खतांचा वापर; रानभाज्या खाण्यावर भर, आयुष्यभर कष्टाची सवय

- जनार्दन भेरेभातसानगर : मागील चार महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून नागरिकांचे आयुष्यच बदलून गेले आहे. घड्याळाच्या काट्यावर चालणारी शहरे एकाएकी शांत झाली, व्यवहार ठप्प झाले. परदेशांतील कोरोनाने आपल्या घरात कधी प्रवेश केला, हे कळलेसुद्धा नाही. ग्रामीण भागातही त्याने हातपाय पसरले, मात्र सुदैवाने जिल्ह्यातील आदिवासी भागांत त्याचा शिरकाव झालेला नाही, याचे कारण त्यांचा सकस आहार. यातील घटकांमुळे त्यांच्यातील प्रतिकारशक्तीने कोरोनासारख्या महामारीला दूरच ठेवले आहे.अंगमेहनत, कष्टाची सवय असल्याने शरीर मजबूत होते. शहरातील नागरिक जंकफूडपासून ते अगदी रासायनिक खतांवर पिकवलेल्या भाज्यांचे सेवन करतात. मात्र, आदिवासी हे सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेल्या भाज्यांचा वापर जेवणात करतात. परिस्थितीमुळे ९० टक्के आदिवासींना रासायनिक खते घेणे परवडत नाही. तसेच पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचा ते अधिकाधिक वापर करतात. त्या अत्यंत गुणकारी असतात. आज ही आदिवासी मंडळी भेंडी किंवा अन्य भाजीपाल्यांची लागवड ही सेंद्रिय खतांचा वापर करूनच करतात. सकस आहारामुळेच शहापूर तालुक्यातील आदिवासीपाडे हे कोरोनापासून लांब आहेत.शहरात आज लहानांपासून मोठ्यांना कोरोना होत आहे. पण, आदिवासीपाड्यांवरील मुले, त्यांचे पालक हे कोरोनामुक्त आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर होताच तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केले. आज तालुक्यात मुलींची दोन, तर मुलांची सहा वसतिगृहे आहेत.प्रत्येक वसतिगृहात ७५ विद्यार्थ्यांची क्षमता असते. त्यानुसार, १५० मुली आणि ४५० मुले या वसतिगृहांत राहतात. सध्या ती बंद आहेत.ज्यावेळेस सरकार शाळा सुरू करायला परवानगी देईल, तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही तयारी केली असल्याचे सांगण्यात आले. सॅनिटायझरचा वापर तसेच विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी केली जाईल. एखादा आजारी वाटल्यास त्याला तातडीने शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जाईल. शहरात आॅनलाइन अभ्यासक्रम शिकवला जात आहे, मात्र ग्रामीण खासकरून आदिवासी भागांत ही सोय नसल्याने शिक्षकच विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना मार्गदर्शन करत आहेत.१५ दिवसांनी होते तपासणीजेव्हा या आदिवासी शाळा सुरू असतात, तेव्हा दर १५ दिवसांनी या विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी केली जाते. त्यासाठी चार जणांच्या पथकाची नेमणूक केलेली असते. यात डॉक्टर, परिचारिका आदींचा समावेश असतो. या तपासणीत एखादा विद्यार्थी आजारी वाटल्यास त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करतात किंवा अधिक उपचाराची गरज असल्यास ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेले जाते. या सर्वांचा खर्च सरकार करते, असे संबंधितांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या