शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात १७९३ बाधितांसह सर्वाधिक ५० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 23:37 IST

ठाणे जिल्हयात गुरु वारी कोरोनाच्या एक हजार ७९३ रुग्णांची नोंद झाली. तर ५० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाभर बाधितांची संख्या आता ४८ हजार ८५६ तर मृतांची संख्या एक हजार ४५४ इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कासारवडवली पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या मृत्युमुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलिसांच्या मृत्युची संख्याही पाचवर पोहचली आहे.

ठळक मुद्देपोलीस हवालदाराचाही मृत्यू केडीएमसीमध्ये बाधितांची संख्या झाली दहा हजार ९३१ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात ३४८ नवे रुग्ण तर १६जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हयातील बहुतांश भागात लॉकडाऊन केले आहे. तरीही गुरु वारी २४ तासांमध्ये जिल्ह्यात एक हजार ७९३ कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. तर ५० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाभर बाधितांची संख्या ४८ हजार ८५६ तर मृतांची संख्या एक हजार ४५४ इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी सर्वाधिक ५८० रुग्ण दाखल झाले तर सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या ही दहा हजार ९३१ तर मृत्यूची संख्या १६४ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात ३४८ नवे रुग्ण नोंदविले गेले असून १६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या १२ हजार तर मृतांची संख्या ४६५ वर पोहचली आहे. त्याचबरोबरच नवी मुंबईमध्ये २३९ रुग्ण दाखल झाले. तर नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. इथे आता आठ हजार ५९८ इतकी बाधितांची संख्या झाली असून मृतांची संख्या २७८ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १८५ रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आता चार हजार ९९३ तर १७६ इतकी मृतांची संख्या झाली. भिवंडी महापालिका क्षेत्रामध्ये ५१ बाधितांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे दोन हजार ५८३ बाधितांची तर मृतांची संख्या १३४ वर पोहचली आहे. उल्हासनगरमध्ये नव्याने १६४ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने याठिकाणी बाधितांची तीन हजार ४२४ तर मृतांची संख्या ६१ झाली. अंबरनाथमध्ये ५० रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ४२८ तर मृतांची संख्या ८४ वर पोहचली आहे. बदलापूरमध्ये ३६ नवे रुग्ण दाखल झाले. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार १९४ तर मृतांची संख्या २० झाली. त्याचप्रमाणे ठाणे ग्रामीण भागात १४० रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूमुळे बाधितांची संख्या दोन हजार ७३२ तर मृतांची संख्या ७२ वर पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली............................* आयुक्तालयात आणखी एका पोलिसांचा गेला बळीठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यातील ५३ वर्षीय पोलीस हवालदाराचा कोरोनावरील उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आयुक्तालयात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ८ जुलै रोजी दोन अधिकाऱ्यांसह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयातील चौघांना क्वॉरंटाईन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य