शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

CoronaVirus News: भिवंडीत रुग्ण दुपट्टीचा कालावधी 130 दिवसांवर; आयुक्त पंकज आशिया यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 2:49 PM

शहरात 900 ऑक्सीजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे असे डॉ पंकज आशिया यांनी सांगितले .

भिवंडी: राज्यात कोरोना परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नसतांनाही भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणून रुग्ण दुपट्टीचा कालावधी तब्बल 130 दिवसांवर पोहचला असून ,राज्यात महानगरपालिका क्षेत्रात तो सर्वोत्तम असून भिवंडी शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती निवळण्यात प्रशासना सोबत शहरातील नागरीक ,पोलीस यंत्रणा ,सेवाभावी संस्था ,खाजगी डॉक्टर्स संघटना या सर्वांचे प्रयत्न कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे .

मुंबई ,पुणे पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना ठाणे ,कल्याण डोंबिवली , मीरा भाईंदर ,नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या व मृत्यु संख्या झपाट्याने वाढत असताना जुलै महिन्याच्या उत्तरार्थत नव्याने आयुक्त म्हणून रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ पंकज आशिया यांनी अवलंबिलेल्या चार सूत्री उपाययोजना कामी आल्या असल्याने शहरातील कोरोनावर सध्यातरी नियंत्रण मिळविण्यात मनपा प्रशासनांसह आरोग्य विभागाला यश आले असल्याची माहिती मनपा आयुक्त आशिया यांनी दिली आहे.

कोरोनची परिस्थिती शहरात बिकट झाल्याने सुरुवातीला रुग्णांसाठी रुग्णालय व रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वप्रथम पाऊले उचलल्या नंतर आयजीएम या शासकीय कोव्हिडं रुग्णालयात ऑक्सीजन टॅंक उभारणी करून सर्व बेड ऑक्सीजन लाईन ने जोडले गेले तर शहरातील दोन सांस्कृतिक सभागृहात महानगरपालिका वतीने तब्बल 260 ऑक्सीजन बेड ची व्यवस्था करून दिल्यावर त्या ठिकाणी मोफत उपचार होत असल्याचा विश्वास नागरीकांमध्ये  निर्माण करण्यात महानगरपालिका प्रशासन यशस्वी झाल्याने रुग्ण स्वतःहून तपासणी साठी पुढे आले.

शहरात सुरू केलेल्या 30 मोहल्ला क्लिनिक कडून मोहल्ल्या मोहल्ल्यात तर शिक्षक व महानगरपालिका कर्मचारी यांच्या 478 पथकांकडून घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात अनेक संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर तात्काळ त्यांची तपासणी तर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना आरोग्य विभागाने अलगिकरण केल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनास यश मिळाले असून सध्या शहरात कोविड रुग्णालयातील 90 टक्के बेड रिकामे असून शहरात 900 ऑक्सीजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे असे डॉ पंकज आशिया यांनी सांगितले .

भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात मालेगाव पॅटर्न अथवा मालेगाव काढा यांचा सहभाग किती या बाबत बोलताना डॉ पंकज आशिया यांनी कोरोना ला अटकाव फक्त प्रशासन करू शकत नसून राज्य केंद्र शासनाच्या आरोग्य विभागा कडून दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत असताना भिवंडी शहरातील नागरीकांचे सहकार्य ,धार्मिक गुरू ,स्वयंसेवी संस्था ,पोलीस प्रशासन व इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉक्टर्स मंडळीं या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळत असताना महानगरपालिका कर्मचारी यांनी घेतलेली दिवसरात्र मेहनत या सर्वांच्या सामुहीक प्रयत्नातून आपण भिवंडी शहरातील कोरोना परिस्थितीती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो आहोत अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली.

 कोरोना काळात खाजगी रुग्णालयातून रुग्णाची उपचार करताना आर्थिक पिळवणूक केली गेली असल्याची संपूर्ण राज्यात ओरड होत असताना आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी शहरातील सहा खाजगी किविड रुग्णालयात रुग्णांकडून वसूल केलेल्या बिलाची चौकशी टास्क फोर्स तर्फे करण्यात आली असून त्या बाबत संबंधित रुग्णालयां कडून खुलासा मागविल्या नंतर अनावश्यक असलेल्या बिलांचा परतावा संबंधित रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना देण्या बाबत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbhiwandiभिवंडी