शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात मृतांचा आकडा नऊशे पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 04:43 IST

ठाण्यात तब्बल ३६५ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल कल्याणमध्ये ३५८ रुग्ण आढळले.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा उच्चांकी संख्या गाठली. दिवसभरात १३३२ बाधितांसह ३० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २७ हजार ४७९ तर मृतांचा आकडा नऊशे (९११) पार झाला आहे. शुक्रवारी ठाण्यात तब्बल ३६५ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल कल्याणमध्ये ३५८ रुग्ण आढळले. यामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीत बाधितांची संख्या सात हजार ४५६ वर गेली असून ४ जणांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या २६८ झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ३५८ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या चार हजार ८७३ तर मृतांची ९६ इतकी झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत २२४ रु ग्णांची तर पाचजणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ८५३ तर मृतांची १९४ वर पोहोचली आहे. यापाठोपाठ भिवंडी महापालिका क्षेत्रात ९२ बाधीतांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार ५८८ तर मृतांची ९४ वर पोहोचली. मीरा-भार्इंदरमध्ये १२० रूग्णांसह पाच मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८५५ तर मृतांची १२९ झाली. उल्हासनगरात ६२ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४६८ तर दिवसभरात तीन जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३९ झाली आहे. अंबरनाथमध्ये १९ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४९६ तर एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या ३७ झाली आहे. बदलापूरमध्ये ११ रु ग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे बाधितांची संख्या ६६० तर मृतांची १५ झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ८१ रुग्णांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार २३० तर मृतांची ३९ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये दिवसभरात ३५८ नवीन रुग्णवसई-विरार शहरात शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक ३५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. त्याच वेळी उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका हद्दीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०४ झाली असून ११८ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. आता पालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारवर पोहचली आहे.वसई-विरारमध्ये शुक्रवारी एकाच दिवशी ३५८ रुग्ण आढळून आल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. आतापर्यंत दिवसभरात आढळलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. यात पुरुष २०४ तर १५४ महिला रुग्णांचा समावेश आहे.

नवी मुंबईत २२४ रूग्ण वाढलेशहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभरात २२४ रूग्ण वाढले असून एकूण रूग्णांची संख्या ५८५३ झाली आहे. नवी मुंबईत पाच दिवसात एक हजार रूग्ण वाढले आहेत. प्रतिदिन दोनशेपेक्षा जास्त रूग्ण वाढत आहेत. कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, घणसोली, ऐरोली परिसरात झपाट्याने रूग्ण वाढत आहेत. शुक्रवारी बेलापूरमध्ये २८, नेरूळमध्ये ३८, वाशीत १९, तुर्भेमध्ये १२, कोपरखैरणेमध्ये ३०, घणसोलीत २७, ऐरोलीत ५४ व दिघामध्ये १६ रूग्ण वाढले. शहरात पाच जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या १९४ झाली आहे. तर १० ६जण बरे होवून घरी परतल्याने एकूण ३२०४ जण कोरोनामुक्त झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस