शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात मृतांचा आकडा नऊशे पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 04:43 IST

ठाण्यात तब्बल ३६५ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल कल्याणमध्ये ३५८ रुग्ण आढळले.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा उच्चांकी संख्या गाठली. दिवसभरात १३३२ बाधितांसह ३० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २७ हजार ४७९ तर मृतांचा आकडा नऊशे (९११) पार झाला आहे. शुक्रवारी ठाण्यात तब्बल ३६५ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल कल्याणमध्ये ३५८ रुग्ण आढळले. यामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीत बाधितांची संख्या सात हजार ४५६ वर गेली असून ४ जणांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या २६८ झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ३५८ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या चार हजार ८७३ तर मृतांची ९६ इतकी झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत २२४ रु ग्णांची तर पाचजणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ८५३ तर मृतांची १९४ वर पोहोचली आहे. यापाठोपाठ भिवंडी महापालिका क्षेत्रात ९२ बाधीतांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार ५८८ तर मृतांची ९४ वर पोहोचली. मीरा-भार्इंदरमध्ये १२० रूग्णांसह पाच मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८५५ तर मृतांची १२९ झाली. उल्हासनगरात ६२ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४६८ तर दिवसभरात तीन जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३९ झाली आहे. अंबरनाथमध्ये १९ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४९६ तर एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या ३७ झाली आहे. बदलापूरमध्ये ११ रु ग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे बाधितांची संख्या ६६० तर मृतांची १५ झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ८१ रुग्णांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार २३० तर मृतांची ३९ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये दिवसभरात ३५८ नवीन रुग्णवसई-विरार शहरात शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक ३५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. त्याच वेळी उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका हद्दीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०४ झाली असून ११८ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. आता पालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारवर पोहचली आहे.वसई-विरारमध्ये शुक्रवारी एकाच दिवशी ३५८ रुग्ण आढळून आल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. आतापर्यंत दिवसभरात आढळलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. यात पुरुष २०४ तर १५४ महिला रुग्णांचा समावेश आहे.

नवी मुंबईत २२४ रूग्ण वाढलेशहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभरात २२४ रूग्ण वाढले असून एकूण रूग्णांची संख्या ५८५३ झाली आहे. नवी मुंबईत पाच दिवसात एक हजार रूग्ण वाढले आहेत. प्रतिदिन दोनशेपेक्षा जास्त रूग्ण वाढत आहेत. कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, घणसोली, ऐरोली परिसरात झपाट्याने रूग्ण वाढत आहेत. शुक्रवारी बेलापूरमध्ये २८, नेरूळमध्ये ३८, वाशीत १९, तुर्भेमध्ये १२, कोपरखैरणेमध्ये ३०, घणसोलीत २७, ऐरोलीत ५४ व दिघामध्ये १६ रूग्ण वाढले. शहरात पाच जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या १९४ झाली आहे. तर १० ६जण बरे होवून घरी परतल्याने एकूण ३२०४ जण कोरोनामुक्त झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस