शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

CoronaVirus News: लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजी मार्केट, किराणा दुकानांमध्ये गर्दी; सोशल डिस्टेंसिंगची एैशी तैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 18:18 IST

पोलिसांकडून या भागात गाडी फिरून नागरीकांना विनंती केली जात होती.

ठाणे: ठाणे  शहरात मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे अखेर 2 जुलै ते 12 जुलै या कालावधीत संपूर्ण ठाणे  शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी ठाणो शहरातील मुख्य भाजी मार्केट, किरणा मार्केट तसेच शहरातील इतर भागात असलेल्या दुकानांमध्ये नागरीकांची एकच गर्दी उडाली होती. लॉकडाऊन एकच्या वेळेस ज्या पध्दतीने गर्दी बाजारात दिसत होती. तेवढी नसली तरी देखील नागरीकांकडून सोशल डिस्टेसींगच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून आले.

पोलिसांकडून या भागात गाडी फिरून नागरीकांना विनंती केली जात होती. परंतु तरी देखील त्याकडे कानाडोळा होतांना दिसला. त्यात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असे पालिकेने काढलेल्या आदेशात म्हंटले असले तरी महापालिकेच्या वतीने भाजीवाल्यांना आणि दुकानदारांना बंदचे आवाहन करण्यात आल्याने मार्केटमध्ये गर्दी झाल्याचे दिसत होते.

ठाणे  शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजाराहून अधिक झाली आहे. तसेच मृतांची संख्या देखील 300 च्या घरात आली आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यासाठी दोन दिवसांच्या सावळ्या गोंधळा नंतर अखेर पुढील 10 दिवस संपूर्ण ठाणो शहर लॉक डाऊन करण्यात आले आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी महापालिकेने भाजी मार्केट, किराणा दुकाने व इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन केले आहे. भाजी मार्केटमधूनच कोरोनाचा अधिक प्रसार झाल्याचाही दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. परंतु त्यामुळेच बुधवारी जांभळी नाक्यावरील प्रमुख मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी नागरीकांची झुंबड उडाल्याचे दिसत होते.

सकाळी सात वाजल्यापासूनच नागरीकांनी येथे गर्दी केल्याचे दिसत होते. पुढील 10 दिवस बंद राहणार असल्याने जास्तीची भाजी खरेदी केली जात होती. आधीच तीन महिने हाल सुरु होते. आता कुठे पुन्हा नव्याने सुरवात असतांना, पालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत नाही, तर संताप व्यक्त करण्यात येत होता. किराणा मालांची दुकाने देखील सम- विषम तारखेला सुरु असल्याने बुधवारी जी दुकाने सुरु होती, त्याठिकाणी नागरीकांनी गर्दी केल्याचे दिसत होते. त्यामुळे सोशल डिस्टेसींगचे पालनही होतांना दिसले नाही, पोलिसांकडून वारंवार सुचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. दरम्यान आधी जवळ जवळ दोन महिने लॉकडाऊन घेण्यात आला होता. परंतु अनलॉक जाहीर झाल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.

आता देखील 10 दिवस लॉकडाऊन घेतल्यानंतर पुन्हा अनलॉक सुरु झाले तर त्यावेळेस कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच आज ज्यांनी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली त्यांना लागण होऊ शकत नाही का?, मग याला जबाबदार कोण असा सवालही आता उपस्थित झाला आहे. महापालिकेने अत्यावश्यक सेवा बंद करणो गरजेचे नव्हते. त्या सुरु ठेवण्याची गरज होती. असे मत नागरीक व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे मासळीची दुकाने, चिकण, मटण विक्रीची दुकाने येथेही बुधवारी अचानक मोठय़ा रांगा लागल्याचे दिसून आले. बुधवारी एकादशी असली तरी देखील शुक्रवार आणि रविवारसाठी स्टॉक करुन ठेवण्यासाठी नागरीकांनी येथे गर्दी केल्याचे दिसत होते. तसेच शहरातील इतर भागातील किराणा दुकानांबाहेरही नागरीकांच्या रांगा लागल्याचे दिसत होते.

पुन्हा 10 दिवस लॉकडाऊन होणार असल्याने मी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी आली आहे. पुढील 10 ते 12 दिवस पुरेल एवढी भाजी घेऊन जात आहे. मुळात आधीच लॉकडाऊनमध्ये आमचे हाल झाले आहेत, त्यात आता दुसरा अनलॉक जाहीर झाल्यानंतर पुन्हा लॉकडाऊनची गरज होती का? असा आमचा सवाल आहे. (मनीषा जाधव - गृहीणी, ठाणेकर).                                      

पुढील 10 लॉकडाऊन असल्याने मी देखील भाजी आणि किराणा खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आलो आहे. उलट आधी गर्दी होत नव्हती, मात्र आता पुन्हा लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्याने मार्केटमध्ये गर्दी झाली आहे. आता पुढील महिनाभर पुरेल एवढा किराणा भरुन ठेवणार आहे. तसेच 10 ते 12 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करण्यासाठी आलो आहे. (सुमीत गुप्ता - ग्राहक, ठाणेकर)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका