शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात एक हजार ९०९ नविन कोरोना बाधितांची भर: ४८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 01:25 IST

ठाणे जिल्हयात अवघ्या २४ तासांमध्ये गुरु वारी एक हजार ९०९ बाधित रुग्णांची तर ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८ तर मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना रुग्णाच्या संख्येत गुरु वारी देखिल वाढ झाल्याचे आढळले. अवघ्या २४ तासांमध्ये गुरु वारी एक हजार ९०९ बाधित रुग्णांची तर ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८ तर मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क्षेत्रात १६ जुलै रोजी देखिल पुन्हा सर्वाधिक ५२४ नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या १४ हजार ५९८ तर मृतांची संख्या २२५ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात ४१३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ८३२ तर मृतांची संख्या ५४३ वर गेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात २७३ रु ग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या दहा हजार ५४६ तर मृतांची संख्या ३२२ वर पोहचली आहे.मीरा भार्इंदरमध्ये १२५ रु ग्णांची नव्याने नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ७५ तर मृतांची संख्या २१३ इतकी झाली आहे. भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रामध्ये ६३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या ही दोन हजार ९६७ तर मृतांची संख्या १६७ वर पोहचली आहे. तसेच उल्हासनगरमध्येही गुरुवारी २०२ रुग्णांची नोंद झाली. सुदैवाने याठिकाणी गुरुवारी कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ४७ तर मृतांची संख्या ही ७४ अशी स्थिर राहिली आहे. अंबरनाथमध्येही नव्याने ४१ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ही दोन हजार ८७० इतकी झाली असून मृतांचा आकडाही १११ वर पोहचली आहे. त्याचबरोबर बदलापूरमध्ये ९० रुग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे बाधितांची संख्या ही एक हजार ७०३ इतकी झाली आहे. तर ठाणे ग्रामीणमध्ये १७८ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ग्रामीण भागात बाधितांची संख्या तीन हजार ७६० तर मृतांची संख्या ही ९९ वर पोहचली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य