शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

CoronaVirus: रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्यानं मजुरांच्या अपेक्षा पल्लवित; पण मार्ग सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 14:47 IST

योग्य माहिती मिळत नसल्याने कामगार गोंधळात

- अनिकेत घमंडीडोंबिवली: देशभरातील लॉकडाऊन केंद्र सरकारने वाढवला असल्याने ठिकठिकाणी अडकलेल्या मजूर, कामगारांच्या गावी जाण्याच्या अपेक्षेवर सपशेल पाणी फिरले आहे. काहिही करा आणि आम्हाला आमच्या मूळ गावी सोडा अशी विनंती ते पोलीस, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीना करत आहेत. नाशिक येथून रेल्वे सुटल्याची माहिती मिळताच शहरातील अनेक अडकलेले मजूर सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने पोलीस ठाणे, प्रशासन गाठून गावाला सोडण्याची विनंती केली. मात्र यंत्रणेकडून नेमके मार्गदर्शन मिळत नसल्याने कामगारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

शहरात आयरे गाव, शेलार नाका, पाथरली, आजदे, सोनारपाडा, तसेच नजीकच्या दावडी, गोळवली, सुचक नाका या सर्व ठिकाणी मजूर अडकेलेले आहेत. शेलार नाक्याजवळील कामगारांनी शनिवार। सकाळपासूनच गावाला जाण्यासाठी रांग लावत आम्हाला फॉर्म द्या, अशी विनवणी केली. त्यानुसार एका ठिकाणी जाणाऱ्या तेलंगणामधील 40 अडकलेल्या बिगारी काम करणाऱ्या मजुरांनी फॉर्म मिळवून त्यावर नाव, फोन नंबर आणि आधार कार्ड नंबर लिहून तो पोलीस ठाण्यात देण्यासाठी प्रयत्न केले. फॉर्म भरण्यासाठी ते रामनगरला एकत्र आले. परंतु तेथे त्यांना पोलिसांनी हटकल्याने त्यांची पांगापांग झाली. अखेरीस सगळ्यांची नावे, मिळतील त्यांचे फोन नंबर, आधार सगळं नमूद केले. ते भरण्यासाठी त्यांना परिसरात असलेल्या दक्ष नागरिकांनी सहकार्य केले. मास्क लावा असे नागरिकांनी सांगितल्यावर रुमाल आहे चालतील का, असे म्हणत त्यांनी रुमाल तोंडाला बांधले.

अशाच प्रकारे पाथरली परिसरातही कामगार एकत्र आले असून त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु आमच्याकडे कोणताही फॉर्म नाही, महापालिकेशी संपर्क साधा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी नगरसेवक निलेश म्हात्रे याना संपर्क केला. त्यांनी त्याबाबाबत विचारणा करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना फोन केला. परंतु ते काम लोकप्रतिनिधी म्हणून करावे असे त्यांना सांगण्यात आल्याने रामनगरला फॉर्म घेत असून टिळकनगरला नाही असे का असा सवाल नगरसेवक म्हात्रे यांनी केला. त्यांनी त्याबाबत महापालिका सचिवानाही कॉल करून तोडगा काढण्यासाठी विनंती केली. त्यामुळे नेमके आदेश काय आहेत हे न समजल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण दिसून येत होते.

आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्या, दीड महिना झाला हाताला काम नाही, काय करावे सुचत नाही. त्यामुळे आम्हाला तेलंगणा येथे जाऊ द्यावे. आम्ही 40 जण अडकले असून नगरसेवकाने किंवा महापालिकेने दिलेले किती दिवस खायचे, आता आमचे पैसेही संपत आले आहेत, आम्हाला घरी जाऊ द्या, बस, रेल्वे कशानेही जाऊ द्या. पोलीस ठाण्यात आम्ही फॉर्म भरून देत आहोत. - रेड्डीनायक चौहान

जे कामगार रेड झोन मध्ये नाहीत अशांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगारांची नोंद घेण्यात येत आहे, ते प्रभाग अधिकऱ्यांना दिले जाईल. त्यानंतर त्या कामगारांची मेडिकल होईल, त्यानंतर प्रमाणपत्र मिळेल आणि नंतर अंतिम निर्णय नोडल अधिकारी घेतील. - सुरेश आहेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस