शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

CoronaVirus: रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्यानं मजुरांच्या अपेक्षा पल्लवित; पण मार्ग सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 14:47 IST

योग्य माहिती मिळत नसल्याने कामगार गोंधळात

- अनिकेत घमंडीडोंबिवली: देशभरातील लॉकडाऊन केंद्र सरकारने वाढवला असल्याने ठिकठिकाणी अडकलेल्या मजूर, कामगारांच्या गावी जाण्याच्या अपेक्षेवर सपशेल पाणी फिरले आहे. काहिही करा आणि आम्हाला आमच्या मूळ गावी सोडा अशी विनंती ते पोलीस, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीना करत आहेत. नाशिक येथून रेल्वे सुटल्याची माहिती मिळताच शहरातील अनेक अडकलेले मजूर सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने पोलीस ठाणे, प्रशासन गाठून गावाला सोडण्याची विनंती केली. मात्र यंत्रणेकडून नेमके मार्गदर्शन मिळत नसल्याने कामगारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

शहरात आयरे गाव, शेलार नाका, पाथरली, आजदे, सोनारपाडा, तसेच नजीकच्या दावडी, गोळवली, सुचक नाका या सर्व ठिकाणी मजूर अडकेलेले आहेत. शेलार नाक्याजवळील कामगारांनी शनिवार। सकाळपासूनच गावाला जाण्यासाठी रांग लावत आम्हाला फॉर्म द्या, अशी विनवणी केली. त्यानुसार एका ठिकाणी जाणाऱ्या तेलंगणामधील 40 अडकलेल्या बिगारी काम करणाऱ्या मजुरांनी फॉर्म मिळवून त्यावर नाव, फोन नंबर आणि आधार कार्ड नंबर लिहून तो पोलीस ठाण्यात देण्यासाठी प्रयत्न केले. फॉर्म भरण्यासाठी ते रामनगरला एकत्र आले. परंतु तेथे त्यांना पोलिसांनी हटकल्याने त्यांची पांगापांग झाली. अखेरीस सगळ्यांची नावे, मिळतील त्यांचे फोन नंबर, आधार सगळं नमूद केले. ते भरण्यासाठी त्यांना परिसरात असलेल्या दक्ष नागरिकांनी सहकार्य केले. मास्क लावा असे नागरिकांनी सांगितल्यावर रुमाल आहे चालतील का, असे म्हणत त्यांनी रुमाल तोंडाला बांधले.

अशाच प्रकारे पाथरली परिसरातही कामगार एकत्र आले असून त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु आमच्याकडे कोणताही फॉर्म नाही, महापालिकेशी संपर्क साधा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी नगरसेवक निलेश म्हात्रे याना संपर्क केला. त्यांनी त्याबाबाबत विचारणा करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना फोन केला. परंतु ते काम लोकप्रतिनिधी म्हणून करावे असे त्यांना सांगण्यात आल्याने रामनगरला फॉर्म घेत असून टिळकनगरला नाही असे का असा सवाल नगरसेवक म्हात्रे यांनी केला. त्यांनी त्याबाबत महापालिका सचिवानाही कॉल करून तोडगा काढण्यासाठी विनंती केली. त्यामुळे नेमके आदेश काय आहेत हे न समजल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण दिसून येत होते.

आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्या, दीड महिना झाला हाताला काम नाही, काय करावे सुचत नाही. त्यामुळे आम्हाला तेलंगणा येथे जाऊ द्यावे. आम्ही 40 जण अडकले असून नगरसेवकाने किंवा महापालिकेने दिलेले किती दिवस खायचे, आता आमचे पैसेही संपत आले आहेत, आम्हाला घरी जाऊ द्या, बस, रेल्वे कशानेही जाऊ द्या. पोलीस ठाण्यात आम्ही फॉर्म भरून देत आहोत. - रेड्डीनायक चौहान

जे कामगार रेड झोन मध्ये नाहीत अशांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगारांची नोंद घेण्यात येत आहे, ते प्रभाग अधिकऱ्यांना दिले जाईल. त्यानंतर त्या कामगारांची मेडिकल होईल, त्यानंतर प्रमाणपत्र मिळेल आणि नंतर अंतिम निर्णय नोडल अधिकारी घेतील. - सुरेश आहेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस