शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

ठाणे जिल्ह्यात कोरोनाने सहा जणांचा मृत्यू ; नव्याने 182 रुग्ण सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 22:03 IST

शनिवारी जिल्ह्यात 184 रुग्ण आढळून आले असताना रविवारी ही 182 रुग्णांची नव्याने नोंद केली गेली आहे. यामध्ये 82 जण हे फक्त नवीमुंबईतील आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रविवारी ही ठाणे जिल्ह्यात 182 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ही 2,188 इतकी झाली असून रविवारी जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत रुग्णांची संख्या 58 वर पोहोचली आहे. तसेच नवीमुंबईत रविवारी सर्वाधिक 82 रुग्ण नोंदवले गेले आहेत.तर अंबरनाथमध्ये एकाच नव्या रुग्णांची नोंद केली गेली आहे. तसेच ठामपातील रुग्णांनी सातशे आणि नवीमुंबईने साडेसहाशेचा टप्पा पार केला आहे. भिवंडीत पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.              शनिवारी जिल्ह्यात 184 रुग्ण आढळून आले असताना रविवारी ही 182 रुग्णांची नव्याने नोंद केली गेली आहे. यामध्ये 82 जण हे फक्त नवीमुंबईतील आहेत.या नव्या रुग्णांमुळे नवीमुंबई ची रुग्ण संख्या 674 झाली आहे. त्याचबरोबर दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ही 14 वर गेला आहे. त्यापाठोपाठ ठामपामध्ये 41नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या 712 वर पोहोचली आहे. तसेच ठामपा हद्दीत ही दोघांचा मृत्यू झाला असून तेथील मृत संख्या 25 झाली आहे. केडीएमसी कार्यक्षेत्रात 16 रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्ण संख्या 321 झाली आहे.तसेच एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5 झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ही 17 नवे रुग्ण मिळून आल्याने रुग्ण संख्या 94 झाली आहे. तर मिराभाईंदर मध्ये 14 नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 256 वर गेली आहे. भिवंडी आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी 4 रुग्ण आढळून आले आहेत. तेथील अनुक्रमे रुग्ण 25 आणि 38 झाली आहे. मात्र भिवंडीत रविवारी पहिला कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. बदलापूर येथे 3 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 54 झाली आहे.तर एक रुग्ण नव्याने सापडलेल्या अंबरनाथची रुग्ण संख्या 14 झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

 रविवारी जिल्हा रुग्णालयातून 27 जणांना डिस्चार्जनव्या नियमावलीनुसार उपचार कालावधीत सुधारणा केली आहे. त्यानुसार रविवारी ठाणे जिल्हा सामान्य (कोविड) रुग्णालयातून 27 जणांना डिस्चार्ज दिला आहे. यामध्ये ठामपामधील 15, मिराभाईंदर-4, ठाणे ग्रामीण-6, नवीमुंबई आणि वसई- विरार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस