शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : प्रशासनाचा बेजबाबदारपणा, विलगीकरण कक्षातील नावे सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 02:17 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक कारवाई सुरू आहे.

अंबरनाथ : परदेशातून आलेल्या नागरिकांचा संपर्क इतरांशी होऊ नये, यासाठी त्या प्रवाशांना विलगीकरण करण्यात आले आहे. वैद्यकीय पथकाच्या नियंत्रणात हे प्रवासी आहेत. त्यांची ओळख उघड होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येत आहे. मात्र, अंबरनाथमध्ये सोशल मीडियावर १४ नागरिकांची एक यादी टाकली आहे. यात विलगीकरण केलेल्या प्रवाशांची नावे आणि त्यांचे पत्तेही दिले आहेत. वैद्यकीय आणि पालिकेच्या पथकामार्फतच ही यादी सोशल मीडियावर आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे विलगीकरण केलेले प्रवासी मानसिक तणावात आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक कारवाई सुरू आहे. परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला त्याच्या घरात किंवा विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. १४ दिवस हे प्रवासी वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत. विलगीकरण केलेल्या प्रवाशांचे नाव गुप्त ठेवण्यात येत आहे. मात्र, सरकारी यंत्रणेतील एका व्यक्तीनेच थेट या विलगीकरण केलेल्या प्रवाशांची यादी सोशल मीडियावर टाकली आहे. ही यादी काही क्षणांतच सर्वत्र गेली. या यादीत प्रवाशाचे नाव, त्याचा पत्ताही देण्यात आला आहे. तसेच तो कोणत्या देशातून आला आहे, याचीही माहिती देण्यात आली आहे.ही यादी प्रसिद्ध होताच त्या प्रत्येक प्रवाशाला आता चौकशीसाठी फोन केले जात आहेत. प्रत्येकजण चौकशी करत असल्याने त्यांची मानसिकता आणखी बिघडली आहे. सोबत, त्यांचा संतापही वाढत आहे.अनेक व्यक्ती चौकशीच्या नावावर त्या प्रवाशांना कोरोना झाला आहे का, असे विचारत आहेत. प्रत्येकाची समजूत काढण्यातच या प्रवाशांचा वेळ जात आहे. परदेशातून आल्यावर आधीच परिसरातील नागरिक संशयाने पाहत होते. त्यात आता आणखी ही भर पडली आहे. आता शहरातील नागरिकांचेही फोन येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आणि सरकारी यंत्रणेनेही दखल घेतली आहे. ही यादी कशी बाहेर पडली, याचा तपास करण्यात येत आहे.बदलापूरमध्ये  दोन व्यक्ती विलगीकरण कक्षातबदलापूर कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून, बदलापूरमध्ये परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींची संख्या आता ५६ वर गेली आहे. त्या पैकी दोन व्यक्तींना सोनिवली येथील विलगीकरण कक्षात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच जे नागरिक परदेशवारी करून आले आहेत, त्यांनी निरीक्षण कालावधी पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडू नये. याची खबरदारी त्या व्यक्तीने व त्याच्या कुटुंबांनी घेतली पाहिजे. नगरपालिका प्रशानाकडून त्यांचेही समपुदेशन सुरू आहे. अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण बदलापूरमध्ये आढळला नसला तरी परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींवर नगरपालिका, पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बार, बीअर शॉप, वाइनशॉप, पानटपऱ्या, चायनीज, वडापाव, लस्सी, सरबतच्या हातगाड्या, रस्त्यावरील विक्रेते, खाद्यपदार्थ गुरुवारी रात्री १२ पासून बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली.कोरोनाबाधित किंवा संशयित व्यक्तींची तसेच विलगीकरण केलेल्या प्रवाशांची यादी सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच या प्रवाशांना त्रास देणाºयांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल.- विनायक नराळे, सहायक पोलीस आयुक्ततो कोरोनाबाधित नाहीबदलापूरमध्ये बुधवारी एक कोरोना संशयित आढळल्याचा संदेश सोशल मीडियावर फिरत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या अनुषंगाने या व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्या २८ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथbadlapurबदलापूर