शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Coronavirus : प्रशासनाचा बेजबाबदारपणा, विलगीकरण कक्षातील नावे सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 02:17 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक कारवाई सुरू आहे.

अंबरनाथ : परदेशातून आलेल्या नागरिकांचा संपर्क इतरांशी होऊ नये, यासाठी त्या प्रवाशांना विलगीकरण करण्यात आले आहे. वैद्यकीय पथकाच्या नियंत्रणात हे प्रवासी आहेत. त्यांची ओळख उघड होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येत आहे. मात्र, अंबरनाथमध्ये सोशल मीडियावर १४ नागरिकांची एक यादी टाकली आहे. यात विलगीकरण केलेल्या प्रवाशांची नावे आणि त्यांचे पत्तेही दिले आहेत. वैद्यकीय आणि पालिकेच्या पथकामार्फतच ही यादी सोशल मीडियावर आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे विलगीकरण केलेले प्रवासी मानसिक तणावात आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक कारवाई सुरू आहे. परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला त्याच्या घरात किंवा विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. १४ दिवस हे प्रवासी वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत. विलगीकरण केलेल्या प्रवाशांचे नाव गुप्त ठेवण्यात येत आहे. मात्र, सरकारी यंत्रणेतील एका व्यक्तीनेच थेट या विलगीकरण केलेल्या प्रवाशांची यादी सोशल मीडियावर टाकली आहे. ही यादी काही क्षणांतच सर्वत्र गेली. या यादीत प्रवाशाचे नाव, त्याचा पत्ताही देण्यात आला आहे. तसेच तो कोणत्या देशातून आला आहे, याचीही माहिती देण्यात आली आहे.ही यादी प्रसिद्ध होताच त्या प्रत्येक प्रवाशाला आता चौकशीसाठी फोन केले जात आहेत. प्रत्येकजण चौकशी करत असल्याने त्यांची मानसिकता आणखी बिघडली आहे. सोबत, त्यांचा संतापही वाढत आहे.अनेक व्यक्ती चौकशीच्या नावावर त्या प्रवाशांना कोरोना झाला आहे का, असे विचारत आहेत. प्रत्येकाची समजूत काढण्यातच या प्रवाशांचा वेळ जात आहे. परदेशातून आल्यावर आधीच परिसरातील नागरिक संशयाने पाहत होते. त्यात आता आणखी ही भर पडली आहे. आता शहरातील नागरिकांचेही फोन येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आणि सरकारी यंत्रणेनेही दखल घेतली आहे. ही यादी कशी बाहेर पडली, याचा तपास करण्यात येत आहे.बदलापूरमध्ये  दोन व्यक्ती विलगीकरण कक्षातबदलापूर कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून, बदलापूरमध्ये परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींची संख्या आता ५६ वर गेली आहे. त्या पैकी दोन व्यक्तींना सोनिवली येथील विलगीकरण कक्षात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच जे नागरिक परदेशवारी करून आले आहेत, त्यांनी निरीक्षण कालावधी पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडू नये. याची खबरदारी त्या व्यक्तीने व त्याच्या कुटुंबांनी घेतली पाहिजे. नगरपालिका प्रशानाकडून त्यांचेही समपुदेशन सुरू आहे. अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण बदलापूरमध्ये आढळला नसला तरी परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींवर नगरपालिका, पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बार, बीअर शॉप, वाइनशॉप, पानटपऱ्या, चायनीज, वडापाव, लस्सी, सरबतच्या हातगाड्या, रस्त्यावरील विक्रेते, खाद्यपदार्थ गुरुवारी रात्री १२ पासून बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली.कोरोनाबाधित किंवा संशयित व्यक्तींची तसेच विलगीकरण केलेल्या प्रवाशांची यादी सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच या प्रवाशांना त्रास देणाºयांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल.- विनायक नराळे, सहायक पोलीस आयुक्ततो कोरोनाबाधित नाहीबदलापूरमध्ये बुधवारी एक कोरोना संशयित आढळल्याचा संदेश सोशल मीडियावर फिरत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या अनुषंगाने या व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्या २८ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथbadlapurबदलापूर