शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

Coronavirus : ठाण्याच विलगीकरण कक्षाला वाढता विरोध, पालिकेची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 01:53 IST

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल असते तर ही वेळ आली असती का, असा सवाल करण्यात येत आहे.

ठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी श्रीनगरच्या विलगीकरण कक्षाला विरोध झाल्यानंतर कासारवडवली येथील बीएसयूपीच्या इमारतीत तो सुरू करण्यासही स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. आता पोलीस बंदोबस्तात या इमारतीचा ताबा घेतला असला, तरी ते अद्याप सुरू झालेले नाही. मात्र, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल असते तर ही वेळ आली असती का, असा सवाल करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी शहरातील अशक्य असलेली रस्ता रुंदीकरण मोहीम पार पाडली आहे. त्यामुळे ते असते तर प्रत्येक प्रभाग समितीत विलगीकरण कक्ष सुरू झाले असते, असा सूर काढला जात आहे.कासारवडवलीतील बीएसयूपीच्या इमारतीमध्ये हा कक्ष करण्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एक तर तो सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेतले नाही. दुसरीकडे ही इमारत कासारवडवली गावाला लागून असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याची शंका सिद्धार्थ ओवळेकर यांनी उपस्थित केली आहे. नागरिकांचा रोष बघून त्यांनी प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशीही चर्चा केल्यानंतर अखेर या ठिकाणी कक्ष सुरू करणार नसल्याचे पालिकेने तोंडी आश्वासन दिले. मात्र, लेखी आश्वासनासाठी गावकऱ्यांनी ठाणे महापालिकेला पत्र दिले आहे. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने कासारवडवली येथील विलगीकरण कक्षाचा ताबा महापालिकेने घेतला आहे. मात्र, स्थानिकांचा विरोध अद्यापही मावळलेला नाही.यापूर्वी झाला नाही विरोधयापूर्वी महापालिकेने कोणतीही मोहीम हाती घेतली, तरी तिला कधीही विरोध झाल्याचे दिसले नाही. रस्ता रुंदीकरणाची मोहीम असो किंवा फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचा प्रश्न असो, एकाही ठिकाणी कोणीच विरोध केला नाही. त्यामुळे आज ठाण्याचा चेहरामोहरा बदलला आहे. या मोहिमा यशस्वी झाल्या, त्या केवळ आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामुळेच. त्यामुळे आता पालिकेतील अधिकारीदेखील जयस्वाल यांची आज खरी गरज असल्याचे बोलत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका