शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

Coronavirus : ठाण्याच विलगीकरण कक्षाला वाढता विरोध, पालिकेची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 01:53 IST

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल असते तर ही वेळ आली असती का, असा सवाल करण्यात येत आहे.

ठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी श्रीनगरच्या विलगीकरण कक्षाला विरोध झाल्यानंतर कासारवडवली येथील बीएसयूपीच्या इमारतीत तो सुरू करण्यासही स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. आता पोलीस बंदोबस्तात या इमारतीचा ताबा घेतला असला, तरी ते अद्याप सुरू झालेले नाही. मात्र, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल असते तर ही वेळ आली असती का, असा सवाल करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी शहरातील अशक्य असलेली रस्ता रुंदीकरण मोहीम पार पाडली आहे. त्यामुळे ते असते तर प्रत्येक प्रभाग समितीत विलगीकरण कक्ष सुरू झाले असते, असा सूर काढला जात आहे.कासारवडवलीतील बीएसयूपीच्या इमारतीमध्ये हा कक्ष करण्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एक तर तो सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेतले नाही. दुसरीकडे ही इमारत कासारवडवली गावाला लागून असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याची शंका सिद्धार्थ ओवळेकर यांनी उपस्थित केली आहे. नागरिकांचा रोष बघून त्यांनी प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशीही चर्चा केल्यानंतर अखेर या ठिकाणी कक्ष सुरू करणार नसल्याचे पालिकेने तोंडी आश्वासन दिले. मात्र, लेखी आश्वासनासाठी गावकऱ्यांनी ठाणे महापालिकेला पत्र दिले आहे. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने कासारवडवली येथील विलगीकरण कक्षाचा ताबा महापालिकेने घेतला आहे. मात्र, स्थानिकांचा विरोध अद्यापही मावळलेला नाही.यापूर्वी झाला नाही विरोधयापूर्वी महापालिकेने कोणतीही मोहीम हाती घेतली, तरी तिला कधीही विरोध झाल्याचे दिसले नाही. रस्ता रुंदीकरणाची मोहीम असो किंवा फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचा प्रश्न असो, एकाही ठिकाणी कोणीच विरोध केला नाही. त्यामुळे आज ठाण्याचा चेहरामोहरा बदलला आहे. या मोहिमा यशस्वी झाल्या, त्या केवळ आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामुळेच. त्यामुळे आता पालिकेतील अधिकारीदेखील जयस्वाल यांची आज खरी गरज असल्याचे बोलत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका