शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

Coronavirus : ठाण्याच विलगीकरण कक्षाला वाढता विरोध, पालिकेची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 01:53 IST

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल असते तर ही वेळ आली असती का, असा सवाल करण्यात येत आहे.

ठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी श्रीनगरच्या विलगीकरण कक्षाला विरोध झाल्यानंतर कासारवडवली येथील बीएसयूपीच्या इमारतीत तो सुरू करण्यासही स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. आता पोलीस बंदोबस्तात या इमारतीचा ताबा घेतला असला, तरी ते अद्याप सुरू झालेले नाही. मात्र, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल असते तर ही वेळ आली असती का, असा सवाल करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी शहरातील अशक्य असलेली रस्ता रुंदीकरण मोहीम पार पाडली आहे. त्यामुळे ते असते तर प्रत्येक प्रभाग समितीत विलगीकरण कक्ष सुरू झाले असते, असा सूर काढला जात आहे.कासारवडवलीतील बीएसयूपीच्या इमारतीमध्ये हा कक्ष करण्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एक तर तो सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेतले नाही. दुसरीकडे ही इमारत कासारवडवली गावाला लागून असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याची शंका सिद्धार्थ ओवळेकर यांनी उपस्थित केली आहे. नागरिकांचा रोष बघून त्यांनी प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशीही चर्चा केल्यानंतर अखेर या ठिकाणी कक्ष सुरू करणार नसल्याचे पालिकेने तोंडी आश्वासन दिले. मात्र, लेखी आश्वासनासाठी गावकऱ्यांनी ठाणे महापालिकेला पत्र दिले आहे. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने कासारवडवली येथील विलगीकरण कक्षाचा ताबा महापालिकेने घेतला आहे. मात्र, स्थानिकांचा विरोध अद्यापही मावळलेला नाही.यापूर्वी झाला नाही विरोधयापूर्वी महापालिकेने कोणतीही मोहीम हाती घेतली, तरी तिला कधीही विरोध झाल्याचे दिसले नाही. रस्ता रुंदीकरणाची मोहीम असो किंवा फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचा प्रश्न असो, एकाही ठिकाणी कोणीच विरोध केला नाही. त्यामुळे आज ठाण्याचा चेहरामोहरा बदलला आहे. या मोहिमा यशस्वी झाल्या, त्या केवळ आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामुळेच. त्यामुळे आता पालिकेतील अधिकारीदेखील जयस्वाल यांची आज खरी गरज असल्याचे बोलत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका