शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

coronavirus: मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजुरांना मोफत एसटी बससेवा, पायी जाणाऱ्यांना दिलासा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 02:00 IST

लॉकडाउनमुळे परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि अन्य अडकून पडलेल्या नागरिकांवर लहान मुले, महिलांना घेऊन शेकडो किलोमीटरचे अंतर पायीच चालत गाठण्याची वेळ आली आहे. या लोकांसाठी राज्य शासनाने एसटी बस राज्याच्या सीमेपर्यंत मोफत सोडल्या आहेत.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर, मुंबईहून उत्तर भारतात पायी जाणाºया मजूर, कामगारांना राज्य शासनाच्या एसटी बस सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी सकाळपासून मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवरील अन्य राज्यांच्या हद्दीवरही प्रवाशांच्या संख्येनुसार ही सेवा देण्यात येणार आहे.लॉकडाउनमुळे परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि अन्य अडकून पडलेल्या नागरिकांवर लहान मुले, महिलांना घेऊन शेकडो किलोमीटरचे अंतर पायीच चालत गाठण्याची वेळ आली आहे. या लोकांसाठी राज्य शासनाने एसटी बस राज्याच्या सीमेपर्यंत मोफत सोडल्या आहेत.मीरा-भार्इंदर हद्दीतून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पायी चालणाºया मजुरांना शासनाच्या वतीने वरसावे नाका येथे फाउंटन हॉटेलजवळ मोफत एसटी बसची सुविधा सोमवारपासून सुरू केली आहे. एका बसमध्ये २२ प्रवाशांना घेऊन बस मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजुरांना सोडून येत आहे. सकाळी बस सोडतेवेळी अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, अप्पर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक संदीप कदम, तलाठी रोहन वैष्णव व अन्य पोलीस कर्मचारी, डॉक्टर आदी उपस्थित होते. याठिकाणी वैद्यकीय तपासणी व नोंदणीही केली जात आहे. तसेच, बसमधून जाणाºया प्रवाशांना जेवणाची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट, केळी आदी दिले जात आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार मध्य प्रदेश, गुजरात व अन्य राज्याच्या सीमेपर्यंत या मजुरांना नेण्यात येणार आहे.जव्हार येथून १७५ मजूर बसने रवानाजव्हार : लॉकडाउन काळात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची जय्यत तयारी सुरू असून जव्हार येथून १७५ मजुरांना एसटी महामंडळाच्या बसने शासनामार्फत मोफत विविध राज्यांत सोमवारी दुपारी सोडण्यात आले.जव्हार तालुक्यातील बोईसर, तारापूर एमआयडीसी व इतर ठिकाणांहून आलेले परप्रांतीय मजूर जव्हारमार्गे गावी चालत चालले होते. अशा मजुरांना मागील १३ दिवसांपासून जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठान व राधा विद्यालय येथे राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली होती. त्यांना रोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण देण्यात येत होते.उत्तर प्रदेशातील २४, बिहार येथील दोन अशा २६ मजुरांना पालघर येथून रेल्वेद्वारे घरी पाठविण्यात आले, तर यवतमाळ जिल्ह्यातील २१ मजूर, मध्य प्रदेशातील १३० मजुरांना मध्य प्रदेशच्या हद्दीपर्यंत एकूण आठ एसटीद्वारे सोमवारी मोफत सोडण्यात आले. दरम्यान, या मजुरांना गेले काही दिवस सलग खाण्याची व राहण्याची व मोफत बसची सोय केल्याबाबत मजुरांनी समाधान व्यक्तकेले. या वेळी सहायक जिल्हाधिकारी प्रजित नायर, जव्हार तहसीलदार संतोष शिंदे, गटविकास अधिकारी समीर वठारकर, नायब तहसीलदार धर्मराज पाटील, मंडळ अधिकारी देशमुख व सर्व तलाठी जव्हार बस परिवहन प्रमुख सरिता पाटील, सटाणेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे